शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
4
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
5
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
6
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
7
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
8
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
9
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
10
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
11
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
12
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
13
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
14
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
15
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
16
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
17
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
18
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
19
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
20
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी

वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा? - नावीद अंतुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:57 IST

‘माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा’ असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांचे चिरंजीव नावीद अंतुले यांनी केला आहे.

ठळक मुद्दे

- आविष्कार देसाईअलिबाग : ‘माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा’ असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांचे चिरंजीव नावीद अंतुले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.माझ्या वडिलांनीच तटकरे यांना बोट धरून राजकारण शिकवले. याचा विसर त्यांना पडला आहे. सध्याचे राजकारण हे समाजापेक्षा स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या विकासासाठीच आहे, असा आरोप त्यांनी केला.रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटन आणि कृषी विकासावर भर देणारे रोजगार उभारले पाहिजेत. यासाठी बॅरिस्टर अंतुले यांनी तब्बल ४० वर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्यामध्ये ३८ रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. हे उद्योग रायगड जिल्ह्यात आले असते तर आजचा तरुण रोजगारासाठी मुंबई, दुबईसारख्या ठिकाणी गेला नसता. नोकरीनिमित्ताने बाहेर असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील ७० टक्के घरे कायम बंद असतात. ग्रामीण भागात ७६ टक्के लोक राहतात. त्याचे रोजगाराचे प्रमुख साधन हे शेती आहे. मात्र योग्य नियोजन नसल्याने शेतीमधून केवळ २१ टक्केच उत्पादन घेतले जाते. हे सत्ताधारी आणि विरोधक यांचेच अपयश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स, वांद्रे-वरळी सीलिंक, कोस्टल रोड, उरण येथे मंत्रालय, पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे नियोजन बॅरिस्टर अंतुले यांनी ७० च्या दशकात केले होते. पाच वर्षे त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करायला मिळाले असते तर, त्यांनी कोकणाचा नक्कीच कॅलिफोर्निया केला असता. आताच्या नेत्यांनी फक्त घराणेशाही करून राजकारण केले आहे. मुलगा आमदार, मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष, पुतण्या आमदार, महत्त्वाची पदे यांच्याच घरात मग कार्यकर्त्यांनी काय फक्त पक्षाचे झेंडे आणि खुर्च्याच उचलायच्या का असा प्रश्नही त्यांनी तटकरे यांचे नाव न घेता केला.आजवरचा कौल२००९ साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना श्रीवर्धन मतदार संघात ५२ हजार ८०८, तर काँग्रेसचे बॅ.ए.आर.अंतुले यांना ४८ हजार ७४२ मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघ वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे केला. त्यावेळी तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसला हा मतदार संघ सोडावा लागला होता. त्यावेळी शिवसेनेचे अनंत गीते यांना श्रीवर्धन मतदार संघात ५८ हजार ६७४, तर सुनील तटकरे यांना ७२ हजार १६७ मते मिळाली होती.२०१४ साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे यांना ६१ हजार ३८, शिवसेनेचे रवि मुंढे यांना ६० हजार ९६१ आणि काँग्रेसला तीन हजार ९६० मते मिळाली होती. तर २००६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेतून नारायण राणे सोबत आलेल्या श्याम सावंत यांना उमेदवारी दिली होती. सावंत यांना ४६ हजार २४०, शिवसेनेचे तुकाराम सुर्वे यांना ६१ हजार ९६५ मते मिळाली होती.श्रीवर्धन लढवणारमी एकदा श्रीवर्धनमध्ये प्रचाराला गेलो होतो. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले मला बोलले, बेटा तू क्यू यहा आया है.. यहा सब देखने के लिये सुनील हैना...आपल्याला राजकारणात घराणेशाही आणायची नाही. त्यामुळे तू गप्प घरी जा असे बॅरिस्टर अंतुले यांनी सुनावल्याची आठवण नावीद यांनी सांगितली. श्रीवर्धनसाठी कोणीच काही केलेले नाही. त्यामुळे श्रीवर्धनच्या विकासाची जबाबदारी मलाच घ्यायची असल्याने ‘मुझे श्रीवर्धन चाहिये..’ असे सांगून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत नावीद यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक