शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा? - नावीद अंतुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 06:57 IST

‘माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा’ असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांचे चिरंजीव नावीद अंतुले यांनी केला आहे.

ठळक मुद्दे

- आविष्कार देसाईअलिबाग : ‘माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा मी का प्रचार करायचा’ असा घणाघाती हल्ला माजी केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांचे चिरंजीव नावीद अंतुले यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.माझ्या वडिलांनीच तटकरे यांना बोट धरून राजकारण शिकवले. याचा विसर त्यांना पडला आहे. सध्याचे राजकारण हे समाजापेक्षा स्वत:च्या आणि आपल्या कुटुंबाच्या विकासासाठीच आहे, असा आरोप त्यांनी केला.रायगड जिल्ह्यामध्ये पर्यटन आणि कृषी विकासावर भर देणारे रोजगार उभारले पाहिजेत. यासाठी बॅरिस्टर अंतुले यांनी तब्बल ४० वर्षांपूर्वीच रायगड जिल्ह्यामध्ये ३८ रिसॉर्ट उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे कृषी क्षेत्राला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आखल्या होत्या. हे उद्योग रायगड जिल्ह्यात आले असते तर आजचा तरुण रोजगारासाठी मुंबई, दुबईसारख्या ठिकाणी गेला नसता. नोकरीनिमित्ताने बाहेर असल्याने श्रीवर्धन तालुक्यातील ७० टक्के घरे कायम बंद असतात. ग्रामीण भागात ७६ टक्के लोक राहतात. त्याचे रोजगाराचे प्रमुख साधन हे शेती आहे. मात्र योग्य नियोजन नसल्याने शेतीमधून केवळ २१ टक्केच उत्पादन घेतले जाते. हे सत्ताधारी आणि विरोधक यांचेच अपयश असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.वांद्रे-कुर्ला कॉम्लेक्स, वांद्रे-वरळी सीलिंक, कोस्टल रोड, उरण येथे मंत्रालय, पनवेल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ याचे नियोजन बॅरिस्टर अंतुले यांनी ७० च्या दशकात केले होते. पाच वर्षे त्यांना मुख्यमंत्री म्हणून काम करायला मिळाले असते तर, त्यांनी कोकणाचा नक्कीच कॅलिफोर्निया केला असता. आताच्या नेत्यांनी फक्त घराणेशाही करून राजकारण केले आहे. मुलगा आमदार, मुलगी जिल्हा परिषद अध्यक्ष, पुतण्या आमदार, महत्त्वाची पदे यांच्याच घरात मग कार्यकर्त्यांनी काय फक्त पक्षाचे झेंडे आणि खुर्च्याच उचलायच्या का असा प्रश्नही त्यांनी तटकरे यांचे नाव न घेता केला.आजवरचा कौल२००९ साली लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे अनंत गीते यांना श्रीवर्धन मतदार संघात ५२ हजार ८०८, तर काँग्रेसचे बॅ.ए.आर.अंतुले यांना ४८ हजार ७४२ मते मिळाली होती. २०१४ साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदार संघ वाटाघाटीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे केला. त्यावेळी तगडा उमेदवार नसल्याने काँग्रेसला हा मतदार संघ सोडावा लागला होता. त्यावेळी शिवसेनेचे अनंत गीते यांना श्रीवर्धन मतदार संघात ५८ हजार ६७४, तर सुनील तटकरे यांना ७२ हजार १६७ मते मिळाली होती.२०१४ साली विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अवधूत तटकरे यांना ६१ हजार ३८, शिवसेनेचे रवि मुंढे यांना ६० हजार ९६१ आणि काँग्रेसला तीन हजार ९६० मते मिळाली होती. तर २००६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेतून नारायण राणे सोबत आलेल्या श्याम सावंत यांना उमेदवारी दिली होती. सावंत यांना ४६ हजार २४०, शिवसेनेचे तुकाराम सुर्वे यांना ६१ हजार ९६५ मते मिळाली होती.श्रीवर्धन लढवणारमी एकदा श्रीवर्धनमध्ये प्रचाराला गेलो होतो. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले मला बोलले, बेटा तू क्यू यहा आया है.. यहा सब देखने के लिये सुनील हैना...आपल्याला राजकारणात घराणेशाही आणायची नाही. त्यामुळे तू गप्प घरी जा असे बॅरिस्टर अंतुले यांनी सुनावल्याची आठवण नावीद यांनी सांगितली. श्रीवर्धनसाठी कोणीच काही केलेले नाही. त्यामुळे श्रीवर्धनच्या विकासाची जबाबदारी मलाच घ्यायची असल्याने ‘मुझे श्रीवर्धन चाहिये..’ असे सांगून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत नावीद यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक