शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

"पदवी रद्द करून माझं भविष्य का बिघडवलं?’’, विद्यार्थ्याने कुलगुरूंना सर्वांसमोर विचारला जाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:45 IST

Rajasthan News: राजस्थानमधील भरतपूर येथील महाराजा सूरजमल बृज विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. येथे एका विद्यार्थ्याने विद्यापीठाचे कुलगुरू रमेशचंद्र यांना मध्येच अडवून आपली पदवी रद्द करण्यामागचं कारण विचारलं.

राजस्थानमधील भरतपूर येथील महाराजा सूरजमल बृज विद्यापीठामध्ये एका कार्यक्रमादरम्यान घडलेल्या घटनेमुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. येथे एका विद्यार्थ्याने विद्यापीठाचे कुलगुरू रमेशचंद्र यांना मध्येच अडवून आपली पदवी रद्द करण्यामागचं कारण विचारलं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांतीय संमेलनादरम्यान, ही घटना घडली. या कार्यक्रमाला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  

कुलगुरूंना जाब विचारणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव विष्णू खैमरा असून, तो अभाविपचा कार्यकर्ता आणि विद्यार्थी नेता आहे. कुलगुरू रमेशचंद्र यांनी व्यक्तिगत द्वेषामुळे त्याची पदवी रद्द केली, असा आरोप त्याने केला. विष्णू याने सांगितलं की, मी २०२० मध्ये माझं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मात्र विद्यापीठामधील भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या मागणीबाबत केलेल्या आंदोलनामुळे माझ्याविरोधात कट रचण्यात आला. मी नेहमीच विद्यार्थ्यांच्या हितासाठी आवाज उठवला आहे. फीवाढ आणि विद्यापीठ प्रशासनामध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवल्यामुळेच माझी पदवी रद्द करण्यात आली. मी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की, मला न्याय देण्यात यावा.  

या वादादरम्यान, पोली प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप केला. तसेच विद्यार्थ्यांना शांत करून तिथून हटवले. तर कुलगुरू रमेशचंद्र हे कुठलीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले. कुलगुरू रमेशचंद्र यांच्याविरोधात आधीही अनेक आमदार आणि विद्यार्थ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तसेच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली गेली होती. मात्र आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्र