शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:56 IST

Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: मी एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की 'मला दोन माता आहेत', ते सोनियाजींना आवडले नव्हते, असा किस्साही त्यांनी सांगितला.

Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक प्रचारासाठी आज रायबरेली येथे पोहोचले. तिथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यंदाच्या लोकसभेसाठी राहुल गांधीरायबरेली आणि वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. येथील सभेला संबोधित करताना त्यांनी यंदा रायबरेलीची निवड करण्याचे कारण सांगितले. रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी आहे, त्यामुळे मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे. राहुल गांधी म्हणाले की, मला दोन माता आहेत. एक सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी. रायबरेलीत माझ्या दोन्ही मातांनी काम केले आहे. त्यामुळेच मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे.

'मला दोन माता आहेत' म्हटले ते सोनियाजींना आवडले नाही!

राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीशी माझे जुने नाते आहे आणि येथे आल्याने मला खूप आनंद होत आहे. रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी असल्याने मी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे. एक किस्सा सांगताना राहुल गांधी म्हणाले की, मी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की मला दोन माता आहेत, एक इंदिराजी आणि एक सोनियाजी. माझ्या आईला हे आवडले नाही आणि ती म्हणाली- तुला दोन माता कशा असू शकतात? मी माझ्या आईला सांगितले की इंदिराजी यांनी माझे रक्षण केले आणि मला योग्य मार्ग दाखवला. तू देखील माझा सांभाळ करून मला चांगला मार्ग दाखवलास. म्हणूनच मला दोन माता आहेत.

लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाले?

रायबरेलीतील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, आता लवकरच लग्न करावे लागेल. लोकांमधून कोणीतरी राहुल गांधींना लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाकडे राहुल गांधींनी आधी दुर्लक्ष केले आणि म्हणाले की, माझी बहीण प्रियंका गांधी इथे मला मदत करण्यासाठी आपला घाम गाळत आहे. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींचे लक्ष लग्नाच्या प्रश्नाकडे वेधले आणि म्हणाल्या- आधी या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यावेळी राहुल गांधी हसत-हसत म्हणाले, आता लवकर करावंच लागेल!

काँग्रेस सत्तेत आल्यावर काय-काय करणार?

राहुल म्हणाले की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच कर्जमाफी हे पहिले काम असेल, असे राहुल गांधी म्हणाले. दुसरे काम शेतकऱ्यांसाठी कायदेशीर आधारभूत किंमत आणण्याचे असेल. तर तिसरे काम म्हणजे ३० दिवसांच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देणे असेल. त्यावेळी त्यांना लग्नाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की आता लग्न लवकरच करावे लागेल. भाजपवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी निवडणुका जिंकल्या तर संविधान बदलू, असे स्पष्टपणे सांगितले आहे. संविधानाऐवजी अदानी आणि अंबानी यांचे सरकार असेल. आरक्षण आणि तुम्हाला जे काही मिळाले आहे ते नाहीसे होईल. तुमचे मार्ग संविधान रद्द करून संपतील. हा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. हा लढा शेतकरी आणि गरिबांच्या रक्षणासाठी आहे.

जनतेबाबत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्ष सामान्य जनतेला करोडपती करेल. भारतातील करोडो महिलांच्या खात्यात लाखो रुपये येतील. दर महिन्याला महिलांच्या खात्यात पैसे येतील. तसेच १५ ऑगस्टपर्यंत तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. भारतातील आघाडी सरकार कंत्राटी पद्धती बंद करेल. पेन्शनसह नोकरी मिळेल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीrae-bareli-pcरायबरेलीPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधीIndira Gandhiइंदिरा गांधी