शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 17:56 IST

Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: मी एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की 'मला दोन माता आहेत', ते सोनियाजींना आवडले नव्हते, असा किस्साही त्यांनी सांगितला.

Rahul Gandhi at Raebareli, Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी निवडणूक प्रचारासाठी आज रायबरेली येथे पोहोचले. तिथे त्यांनी जाहीर सभेला संबोधित केले. यंदाच्या लोकसभेसाठी राहुल गांधीरायबरेली आणि वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. येथील सभेला संबोधित करताना त्यांनी यंदा रायबरेलीची निवड करण्याचे कारण सांगितले. रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी आहे, त्यामुळे मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे. राहुल गांधी म्हणाले की, मला दोन माता आहेत. एक सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी. रायबरेलीत माझ्या दोन्ही मातांनी काम केले आहे. त्यामुळेच मी येथून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे.

'मला दोन माता आहेत' म्हटले ते सोनियाजींना आवडले नाही!

राहुल गांधी म्हणाले की, रायबरेलीशी माझे जुने नाते आहे आणि येथे आल्याने मला खूप आनंद होत आहे. रायबरेली ही माझ्या दोन्ही मातांची कर्मभूमी असल्याने मी रायबरेलीतून निवडणूक लढवण्यासाठी आलो आहे. एक किस्सा सांगताना राहुल गांधी म्हणाले की, मी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते की मला दोन माता आहेत, एक इंदिराजी आणि एक सोनियाजी. माझ्या आईला हे आवडले नाही आणि ती म्हणाली- तुला दोन माता कशा असू शकतात? मी माझ्या आईला सांगितले की इंदिराजी यांनी माझे रक्षण केले आणि मला योग्य मार्ग दाखवला. तू देखील माझा सांभाळ करून मला चांगला मार्ग दाखवलास. म्हणूनच मला दोन माता आहेत.

लग्नाच्या प्रश्नावर काय म्हणाले?

रायबरेलीतील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांना त्यांच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, आता लवकरच लग्न करावे लागेल. लोकांमधून कोणीतरी राहुल गांधींना लग्नाबाबत प्रश्न विचारला. त्या प्रश्नाकडे राहुल गांधींनी आधी दुर्लक्ष केले आणि म्हणाले की, माझी बहीण प्रियंका गांधी इथे मला मदत करण्यासाठी आपला घाम गाळत आहे. त्यावेळी प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींचे लक्ष लग्नाच्या प्रश्नाकडे वेधले आणि म्हणाल्या- आधी या प्रश्नाचं उत्तर द्या. त्यावेळी राहुल गांधी हसत-हसत म्हणाले, आता लवकर करावंच लागेल!

काँग्रेस सत्तेत आल्यावर काय-काय करणार?

राहुल म्हणाले की, काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच कर्जमाफी हे पहिले काम असेल, असे राहुल गांधी म्हणाले. दुसरे काम शेतकऱ्यांसाठी कायदेशीर आधारभूत किंमत आणण्याचे असेल. तर तिसरे काम म्हणजे ३० दिवसांच्या आत शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देणे असेल. त्यावेळी त्यांना लग्नाचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की आता लग्न लवकरच करावे लागेल. भाजपवर हल्लाबोल करताना राहुल गांधी म्हणाले की, भाजपा नेत्यांनी निवडणुका जिंकल्या तर संविधान बदलू, असे स्पष्टपणे सांगितले आहे. संविधानाऐवजी अदानी आणि अंबानी यांचे सरकार असेल. आरक्षण आणि तुम्हाला जे काही मिळाले आहे ते नाहीसे होईल. तुमचे मार्ग संविधान रद्द करून संपतील. हा लढा संविधान वाचवण्यासाठी आहे. हा लढा शेतकरी आणि गरिबांच्या रक्षणासाठी आहे.

जनतेबाबत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस पक्ष सामान्य जनतेला करोडपती करेल. भारतातील करोडो महिलांच्या खात्यात लाखो रुपये येतील. दर महिन्याला महिलांच्या खात्यात पैसे येतील. तसेच १५ ऑगस्टपर्यंत तरुणांना ३० लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील. भारतातील आघाडी सरकार कंत्राटी पद्धती बंद करेल. पेन्शनसह नोकरी मिळेल.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rahul Gandhiराहुल गांधीrae-bareli-pcरायबरेलीPriyanka Gandhiप्रियंका गांधीSonia Gandhiसोनिया गांधीIndira Gandhiइंदिरा गांधी