शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:06 IST

PM Modi English Speech, Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांना आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढू, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Modi English Speech, Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधाननरेंद्र मोदी गुरुवारी बिहारमधील मधुबनी येथे पोहोचले. येथे त्यांनी पहिल्यांदा हिंदीत भाषण केले. पण त्यानंतर जाणीवपूर्वक इंग्रजी भाषेतही थोडेसे भाषण केले. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्यांना त्यांनी स्पष्ट संदेश दिला. त्यांच्या भाषणातून त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, लवकरच दहशतवाद्यांवर मोठी कारवाई होईल. बिहारच्या जनतेसमोर बोलताना पंतप्रधान मोदी इंग्रजीत का बोलले, असा प्रश्न अनेकांना पडला होता. त्यामागे एक खास कारण असल्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय जाणकारांचे मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी इंग्रजीतून बोलताना म्हणाले-

"Today, From the soil of Bihar, I say to the whole world that India will identify and punish every terrorist and their backers. We will pursue them to the ends of the earth. India's spirit will never be broken by terrorism. Terrorism will not go unpunished. Every effort will be made to ensure justice is done. The entire nation stands firm in this resolve. Everyone who believes in humanity is with us. I thank the people of various countries and leaders who stood with us."

याचा अर्थ...

"बिहारच्या मातीतून, मी संपूर्ण जगाला सांगतो की भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या पाठीराख्यांना शोधून काढेल आणि कडक शासन करेल. आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारतीयांचा आत्मा कधीही खचणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. संपूर्ण राष्ट्र या निर्धारावर ठाम आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. या कठीण काळात आपल्यासोबत उभ्या राहिलेल्या विविध देशांतील जनतेचे आणि नेत्यांचे मी आभार मानतो."

पंतप्रधान मोदी इंग्रजीतून का बोलले?

पंतप्रधान मोदींनी बिहारमध्ये इंग्रजीत भाषण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याचे कारणही बऱ्याच प्रमाणात स्पष्ट आहे. भारत आता जगाला दहशतवादाबद्दल स्पष्ट संदेश देत आहे. पंतप्रधान मोदींचे भाषण हे एक संकेत म्हणून पाहिले जात आहे की भारत यापुढे असे हल्ले खपवून घेणार नाही. त्याचे परिणाम इतरांना भोगावे लागतील. पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना हा इशारा दिला आहे. आपल्या इंग्रजी भाषणात पंतप्रधानांनी युरोपियन युनियन, अमेरिका, इस्रायल, रशिया आणि चीन सारख्या देशांचेही आभार मानले आहेत. या देशांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादाच्या मुद्द्यावर ते भारतासोबत उभे राहिले आहेत. त्यामुळे बिहारच्या धरतीवरून थेट जगाला संदेश देण्यासाठी मोदींनी इंग्रजी भाषेचा पर्याय निवडला असल्याचे सांगितले जात आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी