शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
4
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
5
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
6
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
7
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
8
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
9
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
10
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
11
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
12
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
13
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
14
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
15
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
16
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
17
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
18
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
19
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!

कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 09:54 IST

Onion Prices Hike: मागच्या काही महिन्यांपासून देशभरात कांद्याच्या किमती चढ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट बिघडलेलं आहे. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या किमतींबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.

मागच्या काही महिन्यांपासून देशभरात कांद्याच्या किमती चढ्या राहिल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं महिन्याचं बजेट बिघडलेलं आहे. दरम्यान, कांद्याच्या वाढत्या किमतींबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवली आहे. तसेच निर्यात शुल्क हे ४० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी केलं आहे. त्यामुळे कांद्याच्या किमतीत वाढ झाली आहे, असे शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले. 

गतवर्षी डिसेंबर २०२३ मध्ये केंद्र सरकारने अनियमित पावसामुळे जीवनावश्यक अन्नपदार्थांच्या  संभाव्य टंचाईचं कारण देत कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लादले होते. हे निर्बंध पुढे २०२४ च्या मार्च महिन्यापर्यंत वाढवण्यात आले होते. मात्र मे महिन्यात सरकारने निर्यातीवरील हे निर्बंध हटवले होते. मात्र काही नवे निर्बंध लागू करण्यात आले होते.  

मे महिन्यामधील आदेशांनुसार कांद्याची कमी किमतीमध्ये निर्यात केली जाऊ नये, यासाठी केंद्र सरकारने ५५५ डॉलरचं किमान निर्यात मूल्य लावण्यात आलं होतं. त्यासोबतच ४० टक्के निर्यात शुल्कही लागू करण्यात आलं होतं. पुढे सप्टेंबर महिन्यात निर्यात शुल्कामध्ये कपात करून ते निम्म्यावर आणण्यात आलं होतं. 

यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी सोयाबिनच्या कोसळलेल्या किमतीवरही भाष्य केले. ते म्हणले की, मलेशिया आणि इंडोनेशियामधून पाम तेल हे शून्य टक्के शुल्काने आयात केलं जातं. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसतो. शेतकऱ्यांना सोयाबीनची योग्य किंमत मिळावी यासाठी केंद्र सरकारने २७.५ टक्के आयात शुल्क लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला एमएसपीवर सोयाबीन खरेदी करण्याची परवानगी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :onionकांदाInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकारshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान