शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना का सोडावे लागले मुख्यमंत्रीपद? जाणून घ्या,  पंजाबमधील राजीनामानाट्यामागची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 10:08 IST

अमरिंदर सिंग यांचा विराट कोहली झाला? स्वाभिमान दुखावला? पाच कारणे.. जे ठरले सिनेमाचे मुख्य प्लॉट...

पवन देशपांडे -

कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणजे राजेशाही थाट... हवेलीस्टाईल बाज आणि ठाकूरस्टाईल वागणूक... तुम्ही असाल कोणीही... मी मुख्यमंत्री आहे... हा रुबाब... असा त्यांचा वावरच त्यांच्या राजीनाम्यामागील एक कारण बनले... अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्यामुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला... हा या पंजाबी सिनेमाचा क्लायमॅक्स असला तरी त्याची स्क्रिप्ट तशी लिहिल्या जाण्यालाही खुद्द कॅप्टनच जबाबदार असल्याचे बोलले जाते. 

अमरिंदर सिंग यांचा विराट कोहली झाला?- निवडीवरून मदभेद, कोणाचं डिमोशन करायचं, कोणाला वरती आणायचं... असा जो काही खेळ सध्या क्रिकेट टीम इंडियामध्ये सुरू आहे, तोच खेळ पंजाबमध्ये पाहायला मिळाला. या खेळात कॅप्टन विराट कोहलीचीच विकेट गेली आणि त्याने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडले. (किंवा सोडावे लागले.) - हाच संपूर्ण डाव पंजाब काँग्रेसमध्येही गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. विराट कोहली ज्या भूमिकेत त्याच कॅप्टन अमरिंदर सिंगही होते. अंतर्गत कलह आणि राजकीय डावपेचांमध्ये सिद्धू कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर भारी पडले. - या सामन्यात सिद्धू यांनी विजय मिळवल्याचे दिसत असले तरी चक्र काय फिरतील, हे काळच ठरवेल.

स्वाभिमान दुखावला? दोन महिन्यांत तीन वेळा आमदारांची बैठक बोलवण्यात आली आणि आपण सरकार चालवण्यास सक्षम नसल्याचा संशय घेतला गेला, असं मत कॅप्टन अमरिंदर यांनी राजीनाम्यानंतर व्यक्त केलं. त्यातून हेच दिसून आले की गेल्या काही दिवसांपासून पंजाब काँग्रेसमधील घडामोडींमुळे कॅप्टन दुखावले गेले. त्याचा कडेलोट झाला, तेव्हा त्यांनी पद सोडले. जाता जाता त्यांनी राजकीय 'पर्याय' उपलब्ध असल्याचे स्पष्ट करून नवी मेख मारली आहे. 

पाच कारणे.. जे ठरले सिनेमाचे मुख्य प्लॉट -- पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटणे त्यांनी कायम टाळले, असा त्यांच्यावर आरोप आहे. - ते विरोधकांशी मिळालेले आहेत, अशी शंकाही कायम घेतली गेली. - कॅप्टन बहुतेक वेळा महाराजा स्टाइलने काम करतात, त्यांच्यापर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संपर्क करणेही अवघड झाले होते. - आमदारांचं म्हणणे ऐकण्याऐवजी त्यांनी अनेकदा सल्लागारांचे ऐकले, हाही आरोप त्यांच्यावर ठेवला गेला. - सर्वांत महत्त्वाचे म्हणजे नवज्योतसिंग सिद्धू यांची एंट्री. त्यांनी कॅप्टन सिंग यांचा पूर्णच गेम पलटवला. 

सिद्धूंची एंट्री आणि पंजाब काँग्रेसमध्ये झाले मोठे बदल... -नवज्योत सिंग सिद्धू यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यापासून पंजाब काँग्रेसमध्ये धुसपूस सुरू झाली आहे. सिद्धू सेलिब्रिटी आहेत, त्यांचा पक्षाला फायदा होईल असे तेथील आमदारांनाही वाटू लागले आहे. सिद्धू यांना अमरिंदर सिंग यांनी कॅबिनेटमंत्रीपद दिले होते, पण त्यावर ते खुश नव्हते. 

त्यांनी विरोधाची धार तीव्र केल्यानंतर अमरिंदर सिंग यांच्यावर नाराज असेलेल पक्षातीलच नेते आणि आमदार सिद्धू यांच्या टीममध्ये दाखल झाले. त्यांनी अमरिंदर सिंग यांच्या विरोधाला हवा देण्यास सुरूवात केली. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर अमरिंदर सिंग नाराज होते. त्यानंतर या दोघांमधील महत्त्वाकांक्षेचे युद्ध टोकाला पोहोचले. 

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबChief Ministerमुख्यमंत्री