शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

AIADMK नं भाजपसोबतची युती का तोडली? तामिळनाडूच्या माजी मंत्र्यानं स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 17:45 IST

एआयएडीएमकेने 25 सप्टेंबरला भाजपसोबतची युती संपुष्टात आणण्याची घोषणा करत स्वतःला एनडीएपासून वेगळे केले आहे. हा पक्ष गेल्या चार वर्षांपासून ...

एआयएडीएमकेने 25 सप्टेंबरला भाजपसोबतची युती संपुष्टात आणण्याची घोषणा करत स्वतःला एनडीएपासून वेगळे केले आहे. हा पक्ष गेल्या चार वर्षांपासून भाजपसोबत युतीत होता. आता एआयएडीएमकेच्या एका माजी मंत्र्याने युती तुटण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील इरोड येथे एआयएडीएमकेचे माजी मंत्री केसी करुप्पनन म्हणाले, ''भाजप 2026 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तामिळनाडूतील भाजप नेते के अन्नामलाई यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून स्वीकार करण्यासाठी दबाव टाकत होते, यामुळे एआयएडीएमकेने भाजपसोबतची युती तोडली."

केसी करुप्पनन यांनी तामिळनाडूतील भाजप अध्यक्ष के अन्नामलाई यांच्यावर निशाना साधत, ''के अन्नामलाई यांनी दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर टीका केली. आम्ही आमच्या पक्षाच्या संस्थात्मक नेत्यांवरील टीका कशी सहन करू शखतो? यामुळे एआयएडीएमकेने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडत आहोत. या निर्णयावर आम्ही ठाम आहोत.''

एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व्यक्त केला आनंद - एआयएडीएमकेचे प्रमुख ईके पलामिस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली चेन्नईतील पक्षाच्या मुख्यालयात 25 सप्टेंबरला एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी, तसेच अधिकाऱ्यांनी युतीच्या मुद्द्यावर चर्चा केली आणि भाजपपासून वेगळे होण्याचा ठराव मंजूर केला. एवढेच नाही, तर भाजपपासून वेगळे झाल्याचा एआयएडीएमकेच्या कार्यकर्त्यांनीही आनंद साजरा करत पक्षाच्या मुख्यालयाबाहेर फटाकेही फोडले होते.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूBJPभाजपाPoliticsराजकारण