शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

दिल्लीला धुरक्याचा विळखा का पडतो? फटाके आणि गाड्यांपेक्षा धोकादायक काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 11:41 IST

कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये धुरके (स्मोग) चा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होते. राजधानी क्षेत्रामध्ये गाड्यांमुळे होणारे प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचे वरवर वाटत असले तरी याची मुख्य कारणे वेगळीच आहेत.

ठळक मुद्देदिल्लीमध्ये 66 लाख 48 हजार 73 नोंदणी झालेल्या दुचाकी आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार वाहनांच्या प्रदुषणात 46 टक्के वाटा ट्रक्सद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे तर दुचाकीचा वाटा 33 टक्के इतका आहे. दिल्लीमधील कचराभूमींमध्ये अनेक आठवडे आग धूमसत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी कचरा अपघाताने किंवा मुद्दामही पेटवला जातो

नवी दिल्ली- कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये धुरके (स्मोग) चा त्रास नागरिकांना होऊ लागला आहे. धूर आणि धुके एकमेकांमध्ये मिसळले की या प्रकारचे धुरके तयार होते. राजधानी क्षेत्रामध्ये गाड्यांमुळे होणारे प्रदूषण यासाठी कारणीभूत असल्याचे वरवर वाटत असले तरी याची मुख्य कारणे वेगळीच आहेत.

1) दिल्ली राजधानी क्षेत्र हे राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यांनी वेढलेले आहे. या राज्यांमध्ये नवे पिक घेण्यासाठी शेतजमिनीवरच आधीच्या पिकाचे पाचट आणि इतर तण जाळले जातात. यामुळे मोठ्या प्रमाणात धूर होतो आणि परिणामी सर्वच क्षेत्राची हवा प्रदुषित होते. मागील वर्षी दिल्ली हायकोर्टाने या राज्यांना ही शेतजमिनीवर गवत, पाचट जाळण्याची पद्धती बंद करावी अशा अत्यंत कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या होत्या. त्याचे पालन न झाल्यास संबंधित राज्याच्या मुख्य सचिवाला जबाबदार धरू असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. यावरुनच दिल्लीची हवा प्रदुषित करण्यामध्ये याचा किती मोठा हात आहे ते समजते. दिल्लीमधील वाहने प्रदुषणास हातभार लावतात हे खरे असले तरी त्यापेक्षाही जास्त प्रदुषण हे शेतजमिनीवर गवत जाळण्यामुळे होते. या शेतकऱ्यांना गवत, पाचट जाळण्यापासून परावृत्त केले तरच दिल्लीच्या हवेमध्ये सुधारणा होऊ शकते.

2) राजधानी दिल्लीचे क्षेत्र झपाट्याने विस्तारत आहे. रस्ते, मेट्रो तसेच गृहप्रकल्पांची येथे सतत बांधणी सुरु असते. या प्रकल्पांमध्ये खोदकाम तसेच जमिनीखाली होणारे बांधकाम (बोगदे काढणे) यांचाही समावेश आहे. त्यामुळे सतत बारिक धूळ निर्माण होऊन नव्या प्रदुषकांची निर्मिती होत राहते.

3) जमिनी जाळणे, बांधकाम यांच्याबरोबर प्रदुषणात भर घालणारे एक कारण म्हणजे कचराभूमी (डम्पिंग ग्राऊंड). दिल्ली शहरामध्ये दररोज लाखो टन कचरा तयार होतो. त्यात औद्योगिक, घरगुती, हिरवा, वैद्यकीय, जैविक, रासायनिक कचऱ्याचा समावेश असतो. या कचऱ्यातून अनेक प्रकारचे वायू बाहेर पडतात. तसेच रसायनांमुळे कचऱ्याचे तापमान वाढून आग लागण्याचा धोका संभवतो. कचऱ्यामध्ये मिथेन वायू तयार होतो आणि तो ज्वलनशील असल्यामुळे कचरा पेटतो. दिल्लीमधील कचराभूमींमध्ये अनेक आठवडे आग धूमसत असल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी कचरा अपघाताने किंवा मुद्दामही पेटवला जातो. त्यामुळे शहराच्या सीमावर्ती प्रदेशात असणाऱ्या कचराभूमींमधून सतत प्रदुषणाची निर्मिती होत राहते.

4) दिल्ली परिक्षेत्राची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. लाखो लोक दररोज शहराच्या या भागातून दुसऱ्या भागात कामासाठी प्रवास करतात. मात्र मुंबईप्रमाणे दिल्लीमधील लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत नाहीत. किंबहुना मुंबईसारखी सार्वजनिक वाहतूक विकसित नसल्यामुळे तेथे लोक चारचाकी व दुचाकीचा वापर मोठ्या संख्येने करतात. यामुळे प्रदुषणात भर पडते. जानेवारी 2017 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये 66 लाख 48 हजार 73 नोंदणी झालेल्या दुचाकी आहेत. आयआयटी कानपूरच्या अभ्यासानुसार वाहनांच्या प्रदुषणात 46 टक्के वाटा ट्रक्सद्वारे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे तर दुचाकीचा वाटा 33 टक्के इतका आहे. ऑड इव्हन या योजनेत दुचाकींना सूट देण्यात आली होती. यासर्व कारणांमुळे सध्या फटाक्यांचे प्रदुषण नसले तरीही दिल्लीमध्ये इतर अनेक कारणे मोठ्या प्रमाणात प्रदूषणात भर घालत आहेत.

टॅग्स :Indiaभारत