शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

बॅलेट पेपरने मतदान झालेल्या भागात भाजपाचा निकाल इतका खराब का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2017 5:48 PM

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

ठळक मुद्देज्या भागात बॅलेट पेपरने मतदान झाले तिथे भाजपाने फक्त 15 टक्के जागा जिंकल्या. दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडले. 

लखनऊ - समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्या सूरात सूर मिसळत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या (ईव्हीएम) विश्वसनीयतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बसपा सुप्रीमो मायावती यांनी शनिवारी बॅलेट पेपरने मतदान घेण्याची मागणी केली. त्यानंतर लगेचच अखिलेश यांनी काल जाहीर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक निकालाचा डाटा टि्वटरवर शेअर केला आणि मायावतींच्या मागणीचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले. 

ज्या भागात बॅलेट पेपरने मतदान झाले तिथे भाजपाने फक्त 15 टक्के जागा जिंकल्या आणि ईव्हीएम मशीनचा वापर झालेल्या भागात भाजपाने 46 टक्के जागा जिंकल्या असे अखिलेश यांनी टि्वटमध्ये म्हटले होते. या दोन्ही नेत्यांनी अप्रत्यक्षपणे उत्तर प्रदेशच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर फोडले. 

 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपरने मतदान झाले तर भाजपाचा पराभवच होईल असा दावा मायावती यांनी केला. जनता आपल्यासोबत आहे असा भाजपाचा दावा असेल तर त्यांनी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक लढवावी. 2019 सालची लोकसभेची निवडणूक बॅलेट पेपरवर झाली तर मला पूर्ण विश्वास आहे कि, भाजपा सत्तेवर येणार नाही असे मायावती म्हणाल्या. 

उत्तर प्रदेशात मोदी लाट कायम, अयोध्या-आग्र्यात भाजपाची बाजीउत्तर प्रदेश स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची जादू कायम आहे. महापौरपदाच्या 16 जागांपैकी अयोध्या आणि आग्र्यातील जागेवर भाजपाचा कब्जा केला आहे, तर इतर 12 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे आहे. बीएसपीनं अलिगड आणि मेरठमध्ये मोठ्या मताधिक्क्यानं विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजपानं एकूण 14 जागांवर विजय संपादन करत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दबदबा कायम ठेवला आहे.

गोरखपूरमधल्या वॉर्ड क्रमांक 68च्या भाजपा उमेदवार माया त्रिपाठी निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत. या जागेवरून अपक्ष उमेदवार नादिर यांचा विजय झाला आहे. या वॉर्डातच गोरखनाथ मंदिर आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठीत भाजपाला विजय मिळाला आहे. नगर पंचायत निवडणुकीतही भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. पहिल्यांदाच चार नगरपालिकेत कमळ उमललं आहे. 

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवmayawatiमायावती