शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

कृषी कायद्यावरून बळीराजा का रागावला? जाणून घ्या, दिल्लीतील आंदोलनामागची पार्श्वभूमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:25 IST

कायदे शेतकरी हिताचे की अहिताचे?

२०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणेचा सातत्याने पुनरुच्चार करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने नुकत्याच झालेल्या संसद अधिवेशनात शेतकऱ्यांच्या हिताचे तीन विधेयके मंजूर करत त्यांचे कायद्यात रुपांतर केले. मात्र, हे तीनही कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, असे बळीराजाचे म्हणणे आहे. म्हणूनच या कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. कायदे शेतकरी हिताचे की अहिताचे, ही चर्चा त्यानिमित्ताने सुरू झाली आहे. काय आहेत हे कायदे? बळीराजा का रागावला आहे? पाहू या...

कृषी उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सरळीकरण) कायदा  या कायद्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाची वा धान्याची खुली विक्री करण्याचे स्वातंत्र्यम्हणजे त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्रीसाठी नेण्याची गरज नाहीविपणन आणि वाहतूक खर्चात बचत होणारराज्यांतर्गत तसेच दोन राज्यांत शेतीविषयक व्यापार वाढीस लागणार

शेतकऱ्यांचा आक्षेप१. पिकांची आधारभूत किंमत पद्धत लयाला जाईल.२. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येईल.३. ‘ई-नाम’सारख्या सरकारी पोर्टल्सचे काय होईल?सरकारचा दावा १. आधारभूत किंमत पद्धत पूर्वीसारखीच चालू राहणार.२. बाजार समित्यांचे अस्तित्व धोक्यात येणार नाही.३. शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांना पर्याय उपलब्ध होईल ४. ई-नाम सुरूच राहणार

जीवनावश्यक वस्तू कायदा धान्य, डाळी, तेलबिया, खाद्य तेल, कांदा-बटाटा यांना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून हटविणारशेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची योग्य किंमत मिळेल आणि बाजारात स्पर्धा वाढेल

शेतकऱ्यांचा आक्षेप१. मोठ्या कंपन्या जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी करतील२. त्यामुळे काळाबाजार वाढेल

सरकारचा दावा १. पिकांच्या नासाडीची चिंता मिटेल२. कांदा-बटाट्याचे उत्पादन शेतकरी बिनधास्त करू शकतील३. कांदा-बटाट्याच्या किमतींबाबत शेतकरी निश्चिंत राहतील

पिकांच्या किमतींबाबत आश्वासन आणि कृषिसेवा करार कायदा  शेतीविषयक कंत्राट-करारांसंदर्भातील राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांची तरतूदशेतमालाची विक्री, शेतीविषयक अन्य सेवा, कृषीउद्योगातील संस्था, घाऊक व किरकोळ विक्रेते आणि निर्यातदार शेतकऱ्यांशी संलग्न होणारशेतकऱ्यांना सर्वोत्तम बियाण्याचा पुरवठा, पिकांच्या आरोग्याची सातत्याने पाहणीकर्जाची सुविधा आणि पीक विमा योजना

शेतकऱ्यांचा आक्षेप१. कंत्राटीपद्धतीमुळे शेतकऱ्यांची बाजू लंगडी होईल.२. पिकांच्या किमती शेतकरी ठरवू शकणार नाहीत३. लहान शेतकरी कंत्राटी शेती करू शकणार नाहीत४. मोठ्या कंपन्यांनाच फायदा जास्त होईल

सरकारचा दावा १. कंत्राटी शेती करावी की नाही, हे ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्यांना२. पिकांची किंमत ठरविण्याचे अधिकारही शेतकऱ्यांकडेच राहणार३. देशात १० हजार फार्म प्रोड्युसर ग्रुप्स तयार केले जाणार४. या ग्रुप्सच्या माध्यमातून छोट्या शेतकऱ्यांचे संघटन होणार५. त्यातून पिकांच्या किंमत निश्चितीबाबतचे धोरण ठरणार

टॅग्स :FarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार