शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार भूकंप का होताहेत? भारतात कुठे आहे सर्वाधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:18 IST

Earthquake : गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत भारतातील उत्तर भाग भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के बऱ्याच वेळापर्यंत जाणवत राहिले. दरम्यान, या भागात वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवत आहेत, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? भारतातील कुठले भाग हे भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

जेव्हा टेक्टोनिक प्लेट्सच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन होते. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर जी उर्जा बाहेर पडते, त्यालाच भूकंप म्हटलं जातं. या प्लेट्स खूप संथगतीने फिरत असतात. तसेच दरवर्षी आपल्या जागेवरून ४ ते ५ मिमीपर्यंत सरकतात. अशा परिस्थितीत कुठली तरी प्लेट कुठल्या तरी प्लेटपासून दूर जाते किंवा कुठल्यातरी प्लेटच्या खाली सरकते. या प्रक्रियेदरम्यान प्लेट्स आदळल्याने भूकंप येतो.

गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यात झोन-१, झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन ५ अशी विभागणी झालेली आहे. त्यापैकी झोन २ म्हणजे सर्वात कमी धोका आणि झोन ५ म्हणजे सर्वाधिक धोका असे निश्चित करण्यात आले आहे. भूकंपाच्यादृष्टीन झोन ५ हा सर्वाधिक धोकादायक असतो.

झोन ५ - भारतामधील झोन ५ मध्ये संपूर्ण पूर्वोत्तर भारत, जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचं रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश आहे. या भागात भूकंपाचे धक्के साततत्याने जाणवत असतात. झोन ४ - झोन-४ मध्ये जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे इतर भाग, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, बिहार आणि पश्चिम बंगाल, गुजरातचा काही भाग, पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्राच्या काही भागाचा आणि राजस्थानचा समावेश होतो.झोन ३ - यामध्ये केरळ, बिहार, पश्चिम राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र उत्तर प्रदेश, पूर्व गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागाचा समावेश होतो. झोन २ - झोन २ मध्ये राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेशचा काही भाग, पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. झोन १ - भूकंपाच्या दृष्टीने सर्वात कमी धोका असलेला झोन म्हणजे झोन-१ यामध्ये पश्चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व महाराष्ट्र आणि ओदिशा यांचा समावेश होतो.

मागच्या काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास भारतामध्ये दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के सातत्याने जाणवत आहेत. तज्ज्ञांच्या मते हा चिंतेचा विषय आहे. तसेच त्यावर सातत्याने अभ्यास सुरू आहे.  

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारत