शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

वारंवार भूकंप का होताहेत? भारतात कुठे आहे सर्वाधिक धोका, धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 18:18 IST

Earthquake : गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत भारतातील उत्तर भाग भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरत आहे. आज पुन्हा एकदा दिल्ली एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. हे धक्के बऱ्याच वेळापर्यंत जाणवत राहिले. दरम्यान, या भागात वारंवार भूकंपाचे धक्के का जाणवत आहेत, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? भारतातील कुठले भाग हे भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत, हे आपण जाणून घेऊयात.

जेव्हा टेक्टोनिक प्लेट्सच्या परिस्थितीमध्ये परिवर्तन होते. पृथ्वीवर १२ टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स एकमेकांवर आदळल्यावर जी उर्जा बाहेर पडते, त्यालाच भूकंप म्हटलं जातं. या प्लेट्स खूप संथगतीने फिरत असतात. तसेच दरवर्षी आपल्या जागेवरून ४ ते ५ मिमीपर्यंत सरकतात. अशा परिस्थितीत कुठली तरी प्लेट कुठल्या तरी प्लेटपासून दूर जाते किंवा कुठल्यातरी प्लेटच्या खाली सरकते. या प्रक्रियेदरम्यान प्लेट्स आदळल्याने भूकंप येतो.

गेल्या काही दशकांपासून भारतही भूकंपाचं केंद्र बनत चालला आहे. एका संशोधनानुसार भूकंपाचा धोका देशात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळेच धोक्याच्या हिशेबाने देशाची अनेक विभागांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यात झोन-१, झोन-२, झोन-३, झोन-४ आणि झोन ५ अशी विभागणी झालेली आहे. त्यापैकी झोन २ म्हणजे सर्वात कमी धोका आणि झोन ५ म्हणजे सर्वाधिक धोका असे निश्चित करण्यात आले आहे. भूकंपाच्यादृष्टीन झोन ५ हा सर्वाधिक धोकादायक असतो.

झोन ५ - भारतामधील झोन ५ मध्ये संपूर्ण पूर्वोत्तर भारत, जम्मू काश्मीरचा काही भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरातमधील कच्छचं रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश आहे. या भागात भूकंपाचे धक्के साततत्याने जाणवत असतात. झोन ४ - झोन-४ मध्ये जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे इतर भाग, दिल्ली, सिक्किम, उत्तर प्रदेशचा उत्तर भाग, बिहार आणि पश्चिम बंगाल, गुजरातचा काही भाग, पश्चिम किनाऱ्यावरील महाराष्ट्राच्या काही भागाचा आणि राजस्थानचा समावेश होतो.झोन ३ - यामध्ये केरळ, बिहार, पश्चिम राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र उत्तर प्रदेश, पूर्व गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागाचा समावेश होतो. झोन २ - झोन २ मध्ये राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेशचा काही भाग, पश्चिम बंगाल आणि हरियाणा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. झोन १ - भूकंपाच्या दृष्टीने सर्वात कमी धोका असलेला झोन म्हणजे झोन-१ यामध्ये पश्चिम मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पूर्व महाराष्ट्र आणि ओदिशा यांचा समावेश होतो.

मागच्या काही वर्षांचा इतिहास पाहिल्यास भारतामध्ये दिल्ली आणि एनसीआर परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के सातत्याने जाणवत आहेत. तज्ज्ञांच्या मते हा चिंतेचा विषय आहे. तसेच त्यावर सातत्याने अभ्यास सुरू आहे.  

टॅग्स :EarthquakeभूकंपIndiaभारत