शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सहाराचे २५ हजार कोटी कोणाचे?; सेबीकडे रक्कम पडून, पैसे मागण्यासाठी कुणी येईना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 10:15 IST

अनेक आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अनेक वर्षे ते तुरुंगातच होते.

नवी दिल्ली : सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या निधनानंतर सेबीकडे पडून असलेल्या २५ हजार कोटी रुपयांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सुब्रतो रॉय यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी मुंबईत मंगळवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले. अनेक आर्थिक घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अनेक वर्षे ते तुरुंगातच होते.

२०११ मध्ये शेअर बाजार नियामक सेबीने सहारा समूहाची कंपनी सहारा रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लि. आणि सहारा हाउसिंग इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांना त्यांनी ३ कोटी गुंतवणूकदारांकडून बाँडच्या माध्यमातून उभे केलेले पैसे परत करण्याचे आदेश दिले. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर सेबीने आदेशात म्हटले होते की, कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करून निधी उभारला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ ऑगस्ट २०१२ रोजी सेबीचे निर्देश कायम ठेवले. कंपन्यांना जमा केलेले पैसे १५ टक्के व्याजासह परत करण्यास आदेश दिले. 

अहवाल काय सांगतो?

सेबीने सहारा समूहाच्या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना ११ वर्षांत १३८.०७ कोटी रुपये परत केले. विशेषत: परतफेडीसाठी उघडलेल्या बँक खात्यांमधील ठेवी २५ हजार कोटींहून अधिक झाल्या आहेत. सहाराच्या दोन कंपन्यांच्या बहुतेक बॉण्डधारकांनी याबाबत कोणताही दावा केला नाही व गेल्या आर्थिक वर्षात रक्कम ७ लाख रुपयांनी वाढली. सेबी-सहारा परतफेड खात्यांमधील शिल्लक रक्कम १,०८७ कोटी रुपयांनी वाढली. सेबीला ३१ मार्च २०२३ पर्यंत ५३,६८७ खात्यांसाठीचे १९,६५० अर्ज प्राप्त झाले. यापैकी  ४८,३२६ खात्यांशी संबंधित १७,५२६ अर्जांच्या बदल्यात ६७ कोटी रुपयांच्या व्याजासह एकूण १३८.०७ कोटी परत करण्यात आले.

पैसे परत करा!यानंतर सहाराला गुंतवणूकदारांना पैसे परत करण्यासाठी सेबीकडे अंदाजे २४ हजार कोटी रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. मात्र, समूहाने सांगितले की, त्यांनी आधीच ९५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूकदारांना थेट पैसे दिले आहेत.

टॅग्स :SEBIसेबी