शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

निवडणूक निकालांवर सट्टाबाजार तेजीत; पंतप्रधानपदासाठी कोणाला दिली पसंती? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 11:47 IST

गुजरातमधील एका अंदाजावरुन लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 200 कोटींपेक्षा अधिक सट्टा लावण्यात आला आहे.

अहमदाबाद - देशातील लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर सर्वांचे लक्ष्य निवडणुकींच्या निकालाकडे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या निकालांवरुन सट्टाबाजारही तेजीत आलेला आहे. गुजरातच्या पाच शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जातो. ऊंझा, मेहसाणा, अहमदाबाद, राजकोट आणि सुरत या शहरांमध्ये सट्टा खेळला जातो. 

निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर सट्टाबाजारात निवडणुकीच्या निकालांबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. गुजरातमध्ये सट्टाबाजारात निकालांच्या जागेवरुन वेगवेगळे दर लावले आहेत. 21 जागांसाठी 27 पैसे, 22 जागांसाठी 60 पैसे तर 23 जागांसाठी 1 पैसे असे दर ठरलेले आहेत. तसेच 24 जागांसाठी एक रुपया 80 पैशाच्या बदल्यात 2 रुपये 20 पैसे दर सुरु आहे. गुजरातमधील 26 जागांसाठी 7 पैशाच्या बदल्यात 8 रुपये 50 दर लावण्यात आला आहे. 

पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरुन सट्टाबाजारात नरेंद्र मोदी यांच्यावर 14 पैसे दर लावण्यात आला आहे तर राहुल गांधी पंतप्रधान बनतील यावर 5 रुपये दर सुरु आहे. सट्टाबाजारात ज्यांचे दर कमी त्यांची जिंकण्याची संधी जास्त असते असं मानलं जातं. 

गुजरातमधील एका अंदाजावरुन लोकसभा निवडणुकीसाठी आत्तापर्यंत 200 कोटींपेक्षा अधिक सट्टा लावण्यात आला आहे. दरम्यान 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत हे कमी आहे. गुजरातमध्ये 2014 लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर 500 कोटी रुपये सट्टा लागला होता अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर बुकीने दिली.  त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर सर्व सामान्यांप्रमाणेच सट्टाबाजाराचेही लक्ष्य लागून राहिले आहे. 

सध्या सट्टाबाजारात भाजपाला पसंती मिळताना पाहायला मिळत आहे मात्र मागील निवडणुकीच्या तुलनेत त्यांची कामगिरी घसरण्याचा दावाही केला जात आहे. भाजपानेतृत्वातील एनडीएला सरकार बनविण्यासाठी बहुमत मिळणं कठीण आहे तर काँग्रेस आणि युपीएची स्थितीत जास्त सुधारणा नाही. सट्टाबाजारात समाजवादी पक्ष-बहुजन समाज पार्टी, आरएलडी आघाडी, डीएमके, तृणमूल काँग्रेस, वाईएसआर काँग्रेस आणि तेलंगणा राष्ट्र समितीची कामगिरी सुधारेल. सट्टाबाजारात उत्तर प्रदेशात भाजपाला मोठ्या प्रमाणात फटका बसेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच बंगालमध्ये भाजपाला ताकद मिळेल असंही सांगितलं आहे सोबत ओडिशामध्येही भाजपाला चांगले यश मिळेल. मात्र बहुमताला घेऊन एनडीएमध्ये चिंतेचे वातावरण आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधी