शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राहुल गांधींच्या नागरिकत्वावर भाजपाकडून प्रश्नचिन्ह, प्रियंका गांधी म्हणाल्या बकवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 15:33 IST

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजपाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरून थेट लक्ष्य केले होते.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अधिकाधिक धारदार आणि वैयक्तिक पातळीवर पोहोचला आहे. भाजपाने आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या नागरिकत्वाच्या प्रश्नावरून थेट लक्ष्य केले होते.  कुठले राहुल गांधी खरे आहेत, लंडनमधले की लुटियन्समधले? सवाल भाजपाने उपस्थित केला. दरम्यान, राहुल गांधींच्या भगिनी प्रियंका गांधी यांनी भाजपाला जोरदार प्रत्युत्त देताना भाजपाने केलेले आरोप म्हणजे निव्वळ बकवास आहे, असा टोला लगावला आहे. नागरिकत्वाच्या प्रश्नावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून राहुल गांधींवर आरोपांच्या फैरी झाडल्या.  2003 मध्ये बॅकअप्स नावाच्या कंपनीची इंग्लंडमध्ये नोंदणी करण्यात आली होती. राहुल गांधी हे या कंपनीचे संचालक आणि सचिव होते. या कंपनीच्या कागदपत्रांमध्ये राहुल गांधी यांनी स्वत: ब्रिटिश नागरिक असल्याचे म्हटले होते. या कागदपत्रांच्या आधारावरच गृहमंत्रालयाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच ही कागदपत्रे स्वत: राहुल गांधी यांना सत्यापित केली आहेत, असा दावाही पात्रा यांनी केला. मात्र प्रियंका गांधी यांनी राहुल गांधींवरील हे आरोप फेटाळून लावले आहेत. ''हे आरोप निखालस खोटे आहेत. राहुल गांधी याचा जन्म भारतातच झाला. तसेच त्यांचे संगोपनही येथेच झाले. राहुल गांधी हे भारतीच आहेत हे संपूर्ण देश जाणतो, असे प्रियंका गांधी म्हणाल्या.  याआधी राहुल गांधी यांनी ब्रिटनचे नागरिकत्व घेतल्याचा दावा करत त्यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी तक्रार अमेठी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार ध्रुव लाल यांचे वकील रवी प्रकाश यांनी रिटर्निंग अधिकाऱ्याकडे केली होती. मात्र, यावेळी राहुल गांधी यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला होता. ब्रिटनमधील रजिस्ट्रेशन असलेल्या एका कंपनीच्या कागदपत्रांच्या आधारे रवी प्रकाश यांनी हा दावा केला होता. याच बरोबरच राहुल गांधी यांच्या शैक्षणिक पात्रतेबाबतही त्यांनी आरोप केले होते.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक