शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

भाजपाला लवकरच सारा देश नाकारेल - चंद्राबाबू नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:41 IST

आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.

नवी दिल्ली/ अमरावती  - आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.नायडू यांनी टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्षाच्या खासदारांशी शुक्रवारी संवाद साधला. ते म्हणाले की, संसदेत कामकाज वारंवार तहकूब करून, भाजपा व मोदी सरकारने आंध्र प्रदेशच्या प्रश्नापासून पळ काढला. भाजपा या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करीत आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आणि राज्यसभेत सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होईपर्यंत आपल्याला लढावे लागणार आहे.तेलगू देसमच्या खासदारांनी राज्यसभेमध्ये गुरुवारी निदर्शने केली, त्या वेळी वायएसआर काँग्रेसचे खासदार त्यात सहभागी झाले नाहीत. पूर्वी ब्रिटिशांबरोबर काही एतद्देशीय लोक हातमिळवणी करायचे, तसेच सध्या भाजपा व वायएसआर काँग्रेसचे नाते आहे, असा आरोप त्यांनी केला.आंध्रला विशेष दर्जा मिळावा, या मागणीसाठी तेलगू देसमच्या नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राजधानी अमरावतीमध्ये सायकल मोर्चा काढला. या सहा किलोमीटरच्या सायकल मोर्चात स्वत: नायडू हेही सायकल चालविताना दिसत होते.काँग्रेसचा हक्कभंग ठरावसोनिया व राहुल गांधी यांच्यामुळे लोकसभेत वारंवार गदारोळ होत असून त्यामुळे लोकसभेचे कामकाज पार पाडणे अशक्य झाले आहे असे विधान करून, सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी हक्कभंग ठराव आणला आहे. बँकिंग घोटाळा तसेच अविश्वास ठराव अशा अनेक मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांची इच्छा होती. पण केंद्र सरकारलाच ते नको आहे, असे ते म्हणाले.वायएसआर काँग्रेसच्या खासदारांचेही राजीनामाआंध्र प्रदेशला केंद्राने विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसच्या लोकसभेतील पाच सदस्यांनी शुक्रवारी आपले राजीनामे लोकसभाध्यक्षांकडे सुपूर्द केले. त्या पक्षाचे आता राज्यसभेत विजयसाई रेड्डी हे एकमेव खासदार आहेत. त्यांनी मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण