शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

भाजपाला लवकरच सारा देश नाकारेल - चंद्राबाबू नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:41 IST

आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.

नवी दिल्ली/ अमरावती  - आंध्र प्रदेशातील लोकांनी भाजपाला या आधीच नाकारायला सुरुवात केली आहे, पण लवकरच एक दिवस असा येईल की, जेव्हा संपूर्ण देशच भाजपाला नाकारेल, असा दावा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री व तेलगू देसमचे अध्यक्ष व आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी केला.नायडू यांनी टेलिकॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पक्षाच्या खासदारांशी शुक्रवारी संवाद साधला. ते म्हणाले की, संसदेत कामकाज वारंवार तहकूब करून, भाजपा व मोदी सरकारने आंध्र प्रदेशच्या प्रश्नापासून पळ काढला. भाजपा या प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब करीत आहे. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळेपर्यंत आणि राज्यसभेत सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होईपर्यंत आपल्याला लढावे लागणार आहे.तेलगू देसमच्या खासदारांनी राज्यसभेमध्ये गुरुवारी निदर्शने केली, त्या वेळी वायएसआर काँग्रेसचे खासदार त्यात सहभागी झाले नाहीत. पूर्वी ब्रिटिशांबरोबर काही एतद्देशीय लोक हातमिळवणी करायचे, तसेच सध्या भाजपा व वायएसआर काँग्रेसचे नाते आहे, असा आरोप त्यांनी केला.आंध्रला विशेष दर्जा मिळावा, या मागणीसाठी तेलगू देसमच्या नेते व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी राजधानी अमरावतीमध्ये सायकल मोर्चा काढला. या सहा किलोमीटरच्या सायकल मोर्चात स्वत: नायडू हेही सायकल चालविताना दिसत होते.काँग्रेसचा हक्कभंग ठरावसोनिया व राहुल गांधी यांच्यामुळे लोकसभेत वारंवार गदारोळ होत असून त्यामुळे लोकसभेचे कामकाज पार पाडणे अशक्य झाले आहे असे विधान करून, सभागृहाची दिशाभूल केल्याबद्दल केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी हक्कभंग ठराव आणला आहे. बँकिंग घोटाळा तसेच अविश्वास ठराव अशा अनेक मुद्द्यांवर सभागृहात चर्चा व्हावी, अशी काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांची इच्छा होती. पण केंद्र सरकारलाच ते नको आहे, असे ते म्हणाले.वायएसआर काँग्रेसच्या खासदारांचेही राजीनामाआंध्र प्रदेशला केंद्राने विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ वायएसआर काँग्रेसच्या लोकसभेतील पाच सदस्यांनी शुक्रवारी आपले राजीनामे लोकसभाध्यक्षांकडे सुपूर्द केले. त्या पक्षाचे आता राज्यसभेत विजयसाई रेड्डी हे एकमेव खासदार आहेत. त्यांनी मात्र अद्याप राजीनामा दिलेला नाही.

टॅग्स :Chandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारण