शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

हरयाणाच्या रणांगणात ‘दंगल’ कोण जिंकणार? भाजपपुढे पुनरावृत्तीचे आव्हान; काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी

By राकेशजोशी | Updated: May 25, 2024 13:12 IST

राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल.

चंडीगड : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरयाणात घडलेल्या राजकीय उलथापालथी, प्रचारावेळी अनेक ठिकाणी झालेला विरोध पाहता यंदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला २०१९ प्रमाणे विजयाची पुनरावृत्ती करण्याचे आव्हान आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षाला मुसंडी मारण्याची संधी आहे. जननायक जनता पक्ष (जेजेपी)ही रिंगणात आहे. राज्यात १० जागांवर १६ महिलांसह एकूण २२३ उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. २५ मे रोजी मतदान होणाऱ्या या राज्याची ‘दंगल’ कोण जिंकणार, कोणत्या पक्षाची सरशी होणार हे ४ जून रोजी कळेल.

२०१९ च्या निवडणुकीत भाजपने सर्वच्या सर्व १० जागा जिंकल्या होत्या. निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपापुढे आव्हानांचा डोंगर कायम राहिला. शेतकरी आंदोलनाची हाताळणी, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या कुस्तीपटूंच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले वादळ, निवडणूक तोंडावर आली असताना मनोहरलाल खट्टर यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा अशा गर्तेत अडकलेल्या भाजपला गेल्या निवडणुकीसारखी कामगिरी यंदाही करता येईल का, याचीच उत्सुकता आहे. 

जातीय समीकरण महत्त्वाचे२०१९ च्या निवडणुकीत गैर-जाट सवर्णांची ७४ टक्के मते भाजपला गेली. काँग्रेसला १८ टक्के मते मिळाली. ५० टक्के जाट मतदारांनी भाजपला आणि ३३ टक्के काँग्रेसला मतदान केले. मुस्लीम मतांबद्दल बोलायचे झाले तर या समाजाची १४ टक्के मते भाजपकडे गेली.

‘जेजेपी’ आणि ‘आयएनएलडी’च्या कामगिरीकडे लक्षnहरयाणा एक असे राज्य आहे जिथे २०१४ नंतरच भाजप विधानसभा आणि लोकसभेच्या जागांवर मजबूत स्थितीत आला; परंतु काळाच्या ओघात परिस्थिती बदलली आहे. शेतकरी आंदोलन हे त्याचे सर्वांत मोठे उदाहरण आहे.nत्यामुळे जननायक जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय लोक दल निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका बजावतात हे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

या विषयांवर होतेय निवडणूकयावेळची निवडणूक अनेक अंगांनी बदलली आहे. शेतकरी आंदोलन, अग्निवीर योजनेला विरोध, याचे परिणाम निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. तरुणांच्या संतापाचे मतांमध्ये रूपांतर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हरयाणात काँग्रेस आणि आप यांची युती आहे. आप कुरुक्षेत्रामधून नशीब आजमावित आहे. अनेक जागांवर काँग्रेस भाजपला टक्कर देण्याच्या प्रयत्नात आहे. रोहतक, सिरसा आणि सोनिपतमध्ये भाजप नेत्यांना घाम गाळावा लागत आहे. कर्नाल, गुरुग्राम आणि फरिदाबाद या जागा काँग्रेससाठी आव्हानात्मक आहेत. अंबाला, हिसार, भिवानी-महेंद्रगड येथे चुरशीच्या लढतीची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :haryana lok sabha election 2024हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४Haryanaहरयाणाcongressकाँग्रेसBJPभाजपा