शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

"...तो आणखी कट्टर असेल"! PM मोदींनंतर कुणाकडे असेल BJPचं नेतृत्व? PK स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 16:28 IST

"आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण..."

निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी भाजपसंदर्भात मोठे भाष्य केले आहे. "आज भाजप सर्व निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बळावर जिंकत आहे. ही भाजपची मोठी ताकद आहे, पण हीच भाजपची सर्वात मोठी समस्याही आहे. कारण भाजपची सर्वात मोठी समस्या ही आहे की, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अधिक अवलंबून आहे,' असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर भाजपचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न विचारला असता? पीके म्हणाले, त्यांच्यानंतर हायकमांड कोण असेल हे माहीत नाही, पण जो कोणी असेल तो त्यांच्यापेक्षाही कट्टर असेल.

यावेळी प्रशांत किशोर यांनी भाजपा आणि जेडीयू यांच्यावरही भाष्य केले. पीके म्हणाले, विरोधकांचे ऐक्य मोडीत काढण्यासाठी भाजपने नितीश यांना आपल्यासोबत घेतले आहे. भाजपने तर यापूर्वीच जेडीयूला गिळंकृत केले आहे. हे नितीश यांनाही माहीत आहे. मात्र, जे काही शिल्लक आहे, त्याच्या सहाय्याने आणखी काही वेळ त्यांना मुख्यमंत्री पदावर राहायचे आहे. ते गत 18 वर्षांपासून बिहारचे मुख्यमंत्री आहेत आणि हा त्यांच्या कारकिर्दीतील अखेरचा टप्प आहे. 

राहुल गांधींच्या यात्रेवरही उपस्थित केलं प्रश्नचिन्ह -प्रशांत किशोर म्हणाले, नरेंद्र मोदी सातत्याने आपली छबी बदलतात, यामुळेच त्यांना निवडणुकांमध्ये यश मिळत आहे. यावेळी पीके यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "मी सातत्याने काँग्रेसला नव्या अवतारात येण्याचा सल्ला देत आलो आहे. ते कधी राफेलबद्दल बोलता तर कधी हिंदुत्वावर बोलतात. असे करून चालणार नाही. तुम्हाला एक मुद्दा घ्यावा लागेल आणि संदेश द्यावा लागेल. 

टॅग्स :Prashant Kishoreप्रशांत किशोरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस