शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:32 IST

इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडी बनवली आहे. या आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होण्याची शक्यता आहे. याआधी विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा आणि दुसरी बैठक बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती.

मुंबईत विरोधी पक्षांची बैठक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. परंतु काही नेत्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली. सूत्रांनुसार, इंडिया आघाडीची पुढील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३१ ऑगस्टला विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनर आयोजित केले आहे. तर १ सप्टेंबर रोजी सकाळी विविध विषयांवर चर्चा होईल त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली जाईल.

ही बैठक पवईच्या एका हॉटेलमध्ये होईल. इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही. ही बैठक महाविकास आघाडीकडून आयोजित केली जाईल. ज्यात काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी असेल. मुंबईत होणारी ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे कारण त्यात आघाडीच्या निमंत्रकांच्या नावावर निर्णय होऊ शकतो. त्याशिवाय एक समन्वय समिती स्थापन केली जाऊ शकते. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत रुपरेषा तयार केली जाऊ शकते. आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

१७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये झाली होती बैठक

याआधी १७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये बैठक झाली होती. काँग्रेसनं बोलावलेल्या या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी होते. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव युपीए बदलून इंडिया असं ठेवण्यात आले. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लूसिव्ह असा त्याचा अर्थ आहे. ही लढाई विरोधी पक्षविरुद्ध भाजपा नाही तर भाजपाची विचारधारेविरुद्ध आहे. ही विचारधारा देशावर हल्ला करतेय, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे ही लढाई देशासाठी असल्याने इंडिया नाव ठेवण्यात आले आहे. तसेच INDIA आघाडी नाव ठेवल्यानंतर आता टॅगलाईन जितेगा भारत असं ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईBJPभाजपा