शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

कोण असेल INDIA आघाडीचे निमंत्रक?; ३१ ऑगस्ट, १ सप्टेंबरला मुंबईत होणार तिसरी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 08:32 IST

इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडी बनवली आहे. या आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होण्याची शक्यता आहे. याआधी विरोधी पक्षांची पहिली बैठक पाटणा आणि दुसरी बैठक बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आली होती.

मुंबईत विरोधी पक्षांची बैठक ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती. परंतु काही नेत्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांनी या बैठकीत उपस्थित राहण्याबाबत साशंकता व्यक्त केली. सूत्रांनुसार, इंडिया आघाडीची पुढील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी होणार आहे. ३१ ऑगस्टला विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनर आयोजित केले आहे. तर १ सप्टेंबर रोजी सकाळी विविध विषयांवर चर्चा होईल त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली जाईल.

ही बैठक पवईच्या एका हॉटेलमध्ये होईल. इंडिया आघाडीची बैठक पहिल्यांदाच अशा राज्यात होणार आहे जिथे या आघाडीतील कुठल्याही पक्षाची सत्ता नाही. ही बैठक महाविकास आघाडीकडून आयोजित केली जाईल. ज्यात काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी असेल. मुंबईत होणारी ही बैठक यासाठी महत्त्वाची आहे कारण त्यात आघाडीच्या निमंत्रकांच्या नावावर निर्णय होऊ शकतो. त्याशिवाय एक समन्वय समिती स्थापन केली जाऊ शकते. या बैठकीत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत रुपरेषा तयार केली जाऊ शकते. आपापसातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.

१७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये झाली होती बैठक

याआधी १७-१८ जुलैला बंगळुरूमध्ये बैठक झाली होती. काँग्रेसनं बोलावलेल्या या बैठकीत २६ पक्षाचे नेते सहभागी होते. या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीचे नाव युपीए बदलून इंडिया असं ठेवण्यात आले. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इंक्लूसिव्ह असा त्याचा अर्थ आहे. ही लढाई विरोधी पक्षविरुद्ध भाजपा नाही तर भाजपाची विचारधारेविरुद्ध आहे. ही विचारधारा देशावर हल्ला करतेय, बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे ही लढाई देशासाठी असल्याने इंडिया नाव ठेवण्यात आले आहे. तसेच INDIA आघाडी नाव ठेवल्यानंतर आता टॅगलाईन जितेगा भारत असं ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईBJPभाजपा