शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

"दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील...", आपचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:49 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. बरेच दिवस उलटूनही अजून दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झाली नाही. यावरून आम आदमी पक्षाने(आप) भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

या बैठकीनंतर आपने भाजपवर निशाणा साधला. १० दिवस उलटून गेले, दिल्लीत नवीन सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मागील भाजप सरकारप्रमाणेच पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील आणि दिल्लीत अस्थिर सरकार स्थापन होईल. त्यामुळे आप एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावेल आणि निवडणुकीत भाजपद्वारे देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यास भाग पाडेल, असे आपने म्हटले आहे.

माजी मंत्री आणि आपचे नेते गोपाल राय यांनी बैठकीत सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील जनतेने आपला ४३ टक्के आणि भाजपला ४५.६ टक्के मते दिली. दिल्लीत भाजपने उघडपणे निवडणूक आयोगाचे उल्लंघन केले, त्यामुळे भाजपला आप पेक्षा २ टक्के जास्त मते मिळाली. तरीही दिल्लीतील जनतेने केजरीवाल आणि आपवरील दबाव नाकारला आणि ४३ टक्के मतदारांनी ते केजरीवालांसोबत असल्याचे दाखवून दिले. ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.

पुढे गोपाल राय म्हणाले, १० दिवस उलटून गेले आहेत आणि भाजप दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल? हे ठरवू शकत नाही. त्यांच्याकडे कालही मुख्यमंत्री नव्हता आणि आजही नाही. पंतप्रधान परदेशातून परतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपने म्हटले. परंतु आता एकामागून एक तारखा दिल्या जात आहेत. यावरून असे दिसून येते की, जेव्हा पहिल्यांदा सत्ता बदलली होती, तेव्हा ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले होते.

दिल्लीला पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलताना दिसत आहेत. दिल्लीत अस्थिर सरकार राहील. अशा परिस्थितीत आपला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आप सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. तसेच, आज आम्ही संघटनेची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गोपाल राय यांनी सांगितले.

नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २० फेब्रुवारीलादरम्यान, भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. आज होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मोठा शपथविधी समारंभ होईल. शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली