शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील...", आपचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:49 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. बरेच दिवस उलटूनही अजून दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड झाली नाही. यावरून आम आदमी पक्षाने(आप) भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. 

या बैठकीनंतर आपने भाजपवर निशाणा साधला. १० दिवस उलटून गेले, दिल्लीत नवीन सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. मागील भाजप सरकारप्रमाणेच पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील आणि दिल्लीत अस्थिर सरकार स्थापन होईल. त्यामुळे आप एक मजबूत विरोधी पक्षाची भूमिका बजावेल आणि निवडणुकीत भाजपद्वारे देण्यात आलेली आश्वासने पूर्ण करण्यास भाग पाडेल, असे आपने म्हटले आहे.

माजी मंत्री आणि आपचे नेते गोपाल राय यांनी बैठकीत सांगितले की, दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिल्लीतील जनतेने आपला ४३ टक्के आणि भाजपला ४५.६ टक्के मते दिली. दिल्लीत भाजपने उघडपणे निवडणूक आयोगाचे उल्लंघन केले, त्यामुळे भाजपला आप पेक्षा २ टक्के जास्त मते मिळाली. तरीही दिल्लीतील जनतेने केजरीवाल आणि आपवरील दबाव नाकारला आणि ४३ टक्के मतदारांनी ते केजरीवालांसोबत असल्याचे दाखवून दिले. ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे.

पुढे गोपाल राय म्हणाले, १० दिवस उलटून गेले आहेत आणि भाजप दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होईल? हे ठरवू शकत नाही. त्यांच्याकडे कालही मुख्यमंत्री नव्हता आणि आजही नाही. पंतप्रधान परदेशातून परतल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतला जाईल, असे भाजपने म्हटले. परंतु आता एकामागून एक तारखा दिल्या जात आहेत. यावरून असे दिसून येते की, जेव्हा पहिल्यांदा सत्ता बदलली होती, तेव्हा ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले होते.

दिल्लीला पुढील ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलताना दिसत आहेत. दिल्लीत अस्थिर सरकार राहील. अशा परिस्थितीत आपला विरोधी पक्षात बसण्याची जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे आप सभागृहात विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. तसेच, आज आम्ही संघटनेची पुनर्रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गोपाल राय यांनी सांगितले.

नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २० फेब्रुवारीलादरम्यान, भाजपकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत होणार आहे. आज होणारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. आता बुधवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्यानंतर २० फेब्रुवारी रोजी मोठा शपथविधी समारंभ होईल. शपथविधी सोहळा दिल्लीतील रामलीला मैदानावर होणार आहे.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकAAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली