शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभेचे उपाध्यक्ष... कोण आहेत हरिवंश?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 13:24 IST

नवनियुक्त राज्यसभा उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभा उपसभापती पदापर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आणि अनेकांना प्रेरणा देणार आहे.

नवी दिल्ली - राज्यसभा उपसभापतीपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार हरिवंश यांनी बाजी मारली. संयुक्त जनता दल पक्षाचे नेते असलेले हरिवंश नारायण सिंह यांचा गरीब शेतकऱ्याचा मुलगा, बँक अधिकारी, पत्रकार ते राज्यसभा उपसभापती पदापर्यंतचा प्रवास हा अनेक चढउतारांनी भरलेला आणि अनेकांना प्रेरणा देणार आहे.   हरिवंश नारायण सिंह यांचा जन्म एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला होता. हरिवंश नारायण सिंह हे लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे गाव असलेल्या सिताब दियारा गावातील रहिवासी आहेत. हरिवंश यांच्या लहानपणी त्यांच्या कुटुंबाने आपली शेती गंगा नदीच्या प्रवाहामुळे गमावली होती.  जिद्दीने शिक्षण पूर्ण करून अर्थशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी एक हिंदी वृत्तपत्र धर्मयुगमधून पत्रकारितेस सुरुवात केली. त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सरकारी अधिकारी म्हणून काही काळ काम करून ते पुन्हा एकदा पत्रकारितेत आले. 1989 मध्ये त्यांनी रांची येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक प्रभात खबर वृत्तपत्रात नोकरी सुरू केली. पुढे ते या वृत्तपत्राचे संपादक देखील झाले. 2014 साली जेडीयूकडून राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्यांनी संपादकपदाचा राजीनामा दिला.  राज्यसभा सदस्य बनण्यापूर्वी हरिवंश यांनी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे राजकीय सल्लागार म्हणून काम पाहिले होते. चंद्रशेखर यांचे सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी त्यांनी प्रभात खबर या वृत्तपत्रातील आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. मात्र चंद्रशेखर यांचे सरकार पडल्यानंतर ते पुन्हा एकदा याच वृत्तपत्रात रुजू झाले होते.  साधेपणाने जीवन व्यतित करणारे हरिवंश हे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचेन निकटवर्तीय मानले जातात. मात्र त्यांनी आपले संबंध कधीही सार्वजनिक होऊ दिले नाहीत. नितीश कुमार यांची राज्यात चांगली प्रतिमा निर्माण करण्यामध्ये हरिवंश यांचा हात असल्याचे म्हटले जाते. हरिवंश यांच्या राज्यसभा उपसभापतीपदी झालेल्या नियुक्तीमुळे भाजपा आणि जेडीयूमधील संबंध अधिक दृढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हरिवंश यांनी खासदार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेसाठी बिहारमधील रोहतास जिल्ह्यातील बहुआरा गाव दत्तक घेतले होते. तसेच त्यांच्या खासदार निधीमधील मोठी रक्कम बिहारमधील आर्यभट्ट ज्ञान विश्वविद्यालयाती संशोधनावर खर्च होतो.  

टॅग्स :Harivansh Narayan Singhहरिवंश नारायण सिंहRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा