शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

समलिंगी विवाहात नवरा कोण, बायको कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 12:26 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सध्या समलिंगी विवाहाला मान्यता द्यायची की नाही? हा यक्षप्रश्न आहे.

ॲड. श्रीनिवास पटवर्धन

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सध्या समलिंगी विवाहाला मान्यता द्यायची की नाही? हा यक्षप्रश्न आहे. तो सोडवताना सर्वोच्च न्यायालयाला केवळ एकाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा विचार करावा लागेल. भविष्यात जर सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली, तर त्या निर्णयाचा देशभर परिणाम होणार आहे. या विवाहाला मान्यता दिली, तर जवळपास १५८ कायद्यांत सुधारणा करावी लागेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. हे सगळे कायदे बदलणे, म्हणावे तितके सोपे नाही. त्यातून अनेक कायदेशीर गुंतागुंत निर्माण होईल त्याची कल्पना न केलेली बरी!

समलिंगी विवाहासारख्या जटिल समस्येचे निराकरण करण्यासाठी कायदे बदलणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे आम्ही या विवाहास मान्यता देणारच नाही, अशी टोकाची भूमिका सरकार घेऊ शकत नाही. समाजाची बदलती प्रवृत्ती विचारात घेऊन त्यावर हळूहळू का होईना तोडगा काढणे अपरिहार्य आहे. आपण गृहित धरू या की, सर्वोच्च न्यायालयाने या विवाहाला मान्यता दिली आणि या विवाहात नवरा कोण? बायको कोण? असे लिहून देण्यास सांगितले तरी ही समस्या सुटण्यासारखी नाही. कारण भारतीय दंड संहितेमध्ये पुरुष व स्त्रीची व्याख्या स्पष्ट आहे. मुळात त्यातच सरकारला बदल करावा लागेल. पुढे हिंंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, दत्तक कायदा व अशा अनेक मुख्य कायद्यांमध्ये सुधारणा करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानुसार एखाद्याने आपण या विवाहात ‘स्त्री’ असल्याचे म्हटले, तर त्या व्यक्तीला निवडणुकीत स्त्रियांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून उभे राहण्याची परवानगी देऊ शकतो का? काही कायद्यांनी एखाद्या पुरुषाला स्त्रियांचे अधिकार देणे आणि काही कायद्यांनी ते नाकारणे शक्य नाही.

यावर एकच तोडगा म्हणजे, या समाजासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणणे. ते दिसते तितके सोपे काम नाही. या विवाहातून भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करून कायदा अस्तित्वात आणावा लागेल. विशेषत: या स्वतंत्र कायद्यामुळे अन्य कायद्यांवर त्याचा परिणाम होणार नाही, अशी तरतूद स्वतंत्र कायद्यात करावी लागेल. अशा तरतुदी बंधनकारक कराव्या लागतील.

संसदेलाही सहृदयतेने निर्णय घ्यावा लागेल

 सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र कायदा निर्माण करण्याचे आदेशच सरकारला दिले किंवा सरकारने पुढाकार घेतला तर या प्रक्रियेत सर्वांत आधी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

१४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अगदी मूठभर लोकांनी समलैंगिकता म्हणजे काय हे समजून घेतले आहे. त्यामुळे  आधी जागृती निर्माण करावी लागेल.  या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईलच. संसदेलाही अत्यंत विचारपूर्वक आणि सहृदयतेने निर्णय घ्यावा लागेल.

मानसिकता बदलली तर काय?

आणखी एक भीती अशी आहे की, भविष्यात एखाद्या जोडीदाराची मानसिकता बदलली आणि त्याने त्याच्या मूळ स्वरूपाचा स्वीकार केला तर मग दुसऱ्या जोडीदाराचे काय? कारण समलैंगिकता ही एक मानसिकता आहे. ही मानसिकता बदलूही शकते.

विवाहास संमती न देता सामाजिक लाभ ?

विवाहाचा मुद्दा थोडा बाजूला करत या समाजातील लोकांच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कॅबिनेट सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे आता सर्व लक्ष या समितीकडे आहे.

(शब्दांकन : दीप्ती देशमुख)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय