शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

समलिंगी विवाहात नवरा कोण, बायको कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 12:26 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सध्या समलिंगी विवाहाला मान्यता द्यायची की नाही? हा यक्षप्रश्न आहे.

ॲड. श्रीनिवास पटवर्धन

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे सध्या समलिंगी विवाहाला मान्यता द्यायची की नाही? हा यक्षप्रश्न आहे. तो सोडवताना सर्वोच्च न्यायालयाला केवळ एकाचा नाही, तर संपूर्ण समाजाचा विचार करावा लागेल. भविष्यात जर सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिली, तर त्या निर्णयाचा देशभर परिणाम होणार आहे. या विवाहाला मान्यता दिली, तर जवळपास १५८ कायद्यांत सुधारणा करावी लागेल, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. हे सगळे कायदे बदलणे, म्हणावे तितके सोपे नाही. त्यातून अनेक कायदेशीर गुंतागुंत निर्माण होईल त्याची कल्पना न केलेली बरी!

समलिंगी विवाहासारख्या जटिल समस्येचे निराकरण करण्यासाठी कायदे बदलणे हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे आम्ही या विवाहास मान्यता देणारच नाही, अशी टोकाची भूमिका सरकार घेऊ शकत नाही. समाजाची बदलती प्रवृत्ती विचारात घेऊन त्यावर हळूहळू का होईना तोडगा काढणे अपरिहार्य आहे. आपण गृहित धरू या की, सर्वोच्च न्यायालयाने या विवाहाला मान्यता दिली आणि या विवाहात नवरा कोण? बायको कोण? असे लिहून देण्यास सांगितले तरी ही समस्या सुटण्यासारखी नाही. कारण भारतीय दंड संहितेमध्ये पुरुष व स्त्रीची व्याख्या स्पष्ट आहे. मुळात त्यातच सरकारला बदल करावा लागेल. पुढे हिंंदू विवाह कायदा, हिंदू वारसा हक्क कायदा, घरगुती हिंसाचार कायदा, दत्तक कायदा व अशा अनेक मुख्य कायद्यांमध्ये सुधारणा करावी लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयानुसार एखाद्याने आपण या विवाहात ‘स्त्री’ असल्याचे म्हटले, तर त्या व्यक्तीला निवडणुकीत स्त्रियांसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातून उभे राहण्याची परवानगी देऊ शकतो का? काही कायद्यांनी एखाद्या पुरुषाला स्त्रियांचे अधिकार देणे आणि काही कायद्यांनी ते नाकारणे शक्य नाही.

यावर एकच तोडगा म्हणजे, या समाजासाठी स्वतंत्र कायदा अस्तित्वात आणणे. ते दिसते तितके सोपे काम नाही. या विवाहातून भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांचा बारकाईने अभ्यास करून कायदा अस्तित्वात आणावा लागेल. विशेषत: या स्वतंत्र कायद्यामुळे अन्य कायद्यांवर त्याचा परिणाम होणार नाही, अशी तरतूद स्वतंत्र कायद्यात करावी लागेल. अशा तरतुदी बंधनकारक कराव्या लागतील.

संसदेलाही सहृदयतेने निर्णय घ्यावा लागेल

 सर्वोच्च न्यायालयाने स्वतंत्र कायदा निर्माण करण्याचे आदेशच सरकारला दिले किंवा सरकारने पुढाकार घेतला तर या प्रक्रियेत सर्वांत आधी समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे.

१४० कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अगदी मूठभर लोकांनी समलैंगिकता म्हणजे काय हे समजून घेतले आहे. त्यामुळे  आधी जागृती निर्माण करावी लागेल.  या सर्व गोष्टींचा विचार करून सर्वोच्च न्यायालय निर्णय घेईलच. संसदेलाही अत्यंत विचारपूर्वक आणि सहृदयतेने निर्णय घ्यावा लागेल.

मानसिकता बदलली तर काय?

आणखी एक भीती अशी आहे की, भविष्यात एखाद्या जोडीदाराची मानसिकता बदलली आणि त्याने त्याच्या मूळ स्वरूपाचा स्वीकार केला तर मग दुसऱ्या जोडीदाराचे काय? कारण समलैंगिकता ही एक मानसिकता आहे. ही मानसिकता बदलूही शकते.

विवाहास संमती न देता सामाजिक लाभ ?

विवाहाचा मुद्दा थोडा बाजूला करत या समाजातील लोकांच्या सामाजिक समस्या सोडविण्यासाठी कॅबिनेट सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला दिली. त्यामुळे आता सर्व लक्ष या समितीकडे आहे.

(शब्दांकन : दीप्ती देशमुख)

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय