शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:55 IST

Patiala Violence: पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत त्यांचं सरकार राज्यामधील शांतता आणि सद्भावनेची परिस्थिती बिघडू देणार नाही. राज्यातील लोक शांतता आणि धार्मिक सद्भावनेवर विश्वास ठेवणारे आहेत. तसेच सरकार कुठल्याही परिस्थिती तो कायम ठेवेल.

मान यांनी सांगितले की, त्यांचे सरकार स्थानिकांमध्ये सद्भाव निर्माण करण्यासाठी विश्वास-निर्माणासह सर्व आवश्यक पावले उचलत आहे. त्यांनी सांगितले की, कालच्या तणावामुळे निर्माण झालेला प्रश्न सुटला आहे. शिवसेनेचे काही सदस्य होते, काही भाजपाचे सदस्य होते, त्यांचे जिल्हाध्यक्ष होते. तर दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते होते. हा दोन राजकीय पक्षांमधील संघर्ष होता. तो सांप्रदायिक तणाव नव्हता, असे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.

मान यांनी पुढे सांगितले की, पंजाबचे लोक शांतता आणि सद्भावनेमध्ये विश्वास ठेवतात. आम्ही पंजाबमध्ये कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण होऊ देणार नाही. आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू देणार नाही. पंजाब हे सरहद्दीवरील राज्य आहे. तसेच पतियाळामधील परिस्थिती आहा सामान्य आहे.

दरम्यान, आज सकाळी मान यांनी हिंसाचारप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यामध्ये पोलीस महासंचालक (पतियाळा रेंज), पतियाळाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवक्त्य़ांनी सांगितले की,  मुखविंदर सिंह चिन्ना यांची पतियाळा रेंजचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान