शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:55 IST

Patiala Violence: पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत त्यांचं सरकार राज्यामधील शांतता आणि सद्भावनेची परिस्थिती बिघडू देणार नाही. राज्यातील लोक शांतता आणि धार्मिक सद्भावनेवर विश्वास ठेवणारे आहेत. तसेच सरकार कुठल्याही परिस्थिती तो कायम ठेवेल.

मान यांनी सांगितले की, त्यांचे सरकार स्थानिकांमध्ये सद्भाव निर्माण करण्यासाठी विश्वास-निर्माणासह सर्व आवश्यक पावले उचलत आहे. त्यांनी सांगितले की, कालच्या तणावामुळे निर्माण झालेला प्रश्न सुटला आहे. शिवसेनेचे काही सदस्य होते, काही भाजपाचे सदस्य होते, त्यांचे जिल्हाध्यक्ष होते. तर दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते होते. हा दोन राजकीय पक्षांमधील संघर्ष होता. तो सांप्रदायिक तणाव नव्हता, असे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.

मान यांनी पुढे सांगितले की, पंजाबचे लोक शांतता आणि सद्भावनेमध्ये विश्वास ठेवतात. आम्ही पंजाबमध्ये कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण होऊ देणार नाही. आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू देणार नाही. पंजाब हे सरहद्दीवरील राज्य आहे. तसेच पतियाळामधील परिस्थिती आहा सामान्य आहे.

दरम्यान, आज सकाळी मान यांनी हिंसाचारप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यामध्ये पोलीस महासंचालक (पतियाळा रेंज), पतियाळाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवक्त्य़ांनी सांगितले की,  मुखविंदर सिंह चिन्ना यांची पतियाळा रेंजचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान