शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

Patiala Violence: पतियाळा हिंसाचाराला जबाबदार कोण? पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, दिली धक्कादायक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 17:55 IST

Patiala Violence: पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे.

नवी दिल्ली - पंजाबमधील पतियाशा शहरामध्ये काल दोन समुदायांमध्ये हिंसाचार उफाळल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या हिंसाचाराबाबत मोठं विधान केलं आहे. त्यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत त्यांचं सरकार राज्यामधील शांतता आणि सद्भावनेची परिस्थिती बिघडू देणार नाही. राज्यातील लोक शांतता आणि धार्मिक सद्भावनेवर विश्वास ठेवणारे आहेत. तसेच सरकार कुठल्याही परिस्थिती तो कायम ठेवेल.

मान यांनी सांगितले की, त्यांचे सरकार स्थानिकांमध्ये सद्भाव निर्माण करण्यासाठी विश्वास-निर्माणासह सर्व आवश्यक पावले उचलत आहे. त्यांनी सांगितले की, कालच्या तणावामुळे निर्माण झालेला प्रश्न सुटला आहे. शिवसेनेचे काही सदस्य होते, काही भाजपाचे सदस्य होते, त्यांचे जिल्हाध्यक्ष होते. तर दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे कार्यकर्ते होते. हा दोन राजकीय पक्षांमधील संघर्ष होता. तो सांप्रदायिक तणाव नव्हता, असे पंजाबचे मुख्यमंत्री मान यांनी सांगितले.

मान यांनी पुढे सांगितले की, पंजाबचे लोक शांतता आणि सद्भावनेमध्ये विश्वास ठेवतात. आम्ही पंजाबमध्ये कुठल्याही प्रकारचे ध्रुवीकरण होऊ देणार नाही. आम्ही कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू देणार नाही. पंजाब हे सरहद्दीवरील राज्य आहे. तसेच पतियाळामधील परिस्थिती आहा सामान्य आहे.

दरम्यान, आज सकाळी मान यांनी हिंसाचारप्रकरणी तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली होती. यामध्ये पोलीस महासंचालक (पतियाळा रेंज), पतियाळाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षकांना पदावरून हटवण्यात आले होते. तर मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रवक्त्य़ांनी सांगितले की,  मुखविंदर सिंह चिन्ना यांची पतियाळा रेंजचे नवे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  

टॅग्स :PunjabपंजाबBhagwant Mannभगवंत मान