शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

"गँगस्टर, शोधूनही सापडणार नाहीत"; राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाबा बालकनाथांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:43 IST

तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी राजभवन गाठून राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता राजस्थानमधील विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नवे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याच दरम्यान तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. 

कन्हैया लालच्या हत्येच्या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, आम्ही या प्रकरणात पूर्ण न्यायपर्यंत पोहोचू. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार झाले. गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल, तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, हा माझा विषय नाही. निवडणूक जिंकणं हे माझं काम होतं आणि आता पुढे सेवा करेन.

उत्तर आणि दक्षिणेच्या राजकारणावर बाबा बालकनाथ म्हणाले की, तेलंगणात मतांची टक्केवारी वाढली आहे. भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. भाजपा लोकांपर्यंत पोहोचत आहे. नरेंद्र मोदी तिथेही खूप लोकप्रिय आहेत, देशात आणि परदेशात सर्वत्र लोकप्रिय आहेत. हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ असून तिजारा विधानसभेच्या जनतेने मला साथ दिली असल्याचं ते म्हणाले. 

या विजयामागचे मुख्य कारण काय, असे त्यांना विचारले असता, गेहलोत यांच्याकडे कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. ती फक्त खोट्या गोष्टींची पेटी होती, प्रत्यक्षात काहीही नव्हतं. पहिल्या 10 दिवसात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे ते म्हणाले. आम्हाला सेवा कशी करायची हे माहित आहे. संपूर्ण देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आहे आणि सर्व नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असं ही त्यांनी म्हटलं. न्‍यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा