शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"गँगस्टर, शोधूनही सापडणार नाहीत"; राजस्थानमध्ये मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बाबा बालकनाथांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 13:43 IST

तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. 

राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रविवारी राजभवन गाठून राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता राजस्थानमधील विजयानंतर भारतीय जनता पक्षाचे नवे सरकार स्थापन होणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याच दरम्यान तिजारा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले बाबा बालकनाथ यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. 

कन्हैया लालच्या हत्येच्या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, आम्ही या प्रकरणात पूर्ण न्यायपर्यंत पोहोचू. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारच्या काळात राज्यात महिलांवर अत्याचार झाले. गँगस्टर, गुंड आता शोधूनही सापडणार नाहीत आणि जनतेला न्याय मिळेल, तुम्ही मुख्यमंत्री होणार का, या प्रश्नावर बाबा बालकनाथ म्हणाले की, हा माझा विषय नाही. निवडणूक जिंकणं हे माझं काम होतं आणि आता पुढे सेवा करेन.

उत्तर आणि दक्षिणेच्या राजकारणावर बाबा बालकनाथ म्हणाले की, तेलंगणात मतांची टक्केवारी वाढली आहे. भविष्यात त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. भाजपा लोकांपर्यंत पोहोचत आहे. नरेंद्र मोदी तिथेही खूप लोकप्रिय आहेत, देशात आणि परदेशात सर्वत्र लोकप्रिय आहेत. हा विजय कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ असून तिजारा विधानसभेच्या जनतेने मला साथ दिली असल्याचं ते म्हणाले. 

या विजयामागचे मुख्य कारण काय, असे त्यांना विचारले असता, गेहलोत यांच्याकडे कोणतीही योजना नसल्याचे त्यांनी सांगितले. ती फक्त खोट्या गोष्टींची पेटी होती, प्रत्यक्षात काहीही नव्हतं. पहिल्या 10 दिवसात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे ते म्हणाले. आम्हाला सेवा कशी करायची हे माहित आहे. संपूर्ण देश पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आहे आणि सर्व नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आहेत असं ही त्यांनी म्हटलं. न्‍यूज 18 हिंदीने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपा