शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 06:03 IST

आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले.ते म्हणाले की, आता प्रकाशित झाला आहे, तो एनआरसीचा अंतिम मसुदा आहे. तो अंतिम एनआरसी नाही, हे लक्षात ठेवावे. या मसुद्यात२४ मार्च १९७१ पूर्वीपासून आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेशआहे. पण काहींनी पुरावे सादर करूनही त्यांची नावे यादीत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अवधी देण्यात आलेला आहे.आतापर्यंत ज्यांच्याकडे जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट, विमा पॉलिसी आहेत, त्यांच्या समावेश केला आहे.तसेच भारतात १९७१ वा त्याआधीपासून राहणारे व आसाममध्ये मधील काळात स्थायिक झालेले जे लोक आहेत, त्यांनी आपल्या मूळ राज्यातील वास्तव्याचे अधिकृत पुरावे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.स्व. राजीव गांधी पंतप्रधान असताना जो आसाम करार झाला, त्यानुसार हे काम सुरू झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एनआरसी अद्ययावत करण्याचा निर्णय झाला होता, याची आठवण करून देत राजनाथ सिंह म्हणाले की, हे सारे काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाले आहे आणि होणार आहे. त्यामुळे जे या देशाचे नागरिक आहेत व तसा पुरावा देतील, त्यांची नावे त्यात नोंदवली जातील.तृणमूलच्या लोकप्रतिनिधींवर टीकातृणमूल काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे सिल्चर विमानतळावरील वागणे अतिशय वाईट व नियमांना धरून नव्हते, अशी टीका गृहमंत्र्यांनी लोकसभेत केली. ते म्हणाले की, त्यांच्या आसामात जाण्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल, असा अहवाल गुप्तचरांनी दिल्यामुळे त्यांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आणि विमानतळाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला, असे ते म्हणाले.हक्कभंग प्रस्ताव आणणारतृणमूलचे जे खासदार व आमदार आसामात जाण्यासाठी सिल्चर विमानतळावर पोहोचले होते, ते रात्रभर तिथे थांबून आज पुन्हा कोलकात्याला पोहोचले. आम्हाला आसाम पोलिसांनी विमानतळावर धक्काबुक्की केली, असा आरोप त्यांनी कोलकात्यात केला.हा प्रकार म्हणजे खासदार व आमदारांच्या विशेषाधिकाराचेउल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत, असे तृणमूल काँग्रेसने जाहीर केले.ज्यांची नावे या नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्यात नाहीत, त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आणखीही मुदत देण्यात येणार आहे. या निमित्ताने काही जण मुद्दाद वातावरण बिघडवून पाहत आहेत.- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहAssamआसामNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी