शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

एनआरसीत कोणाशी भेदभाव केलेला नाही! - राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 06:03 IST

आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्याचे काम आसाम करारानुसार तयार करण्यात आले असून, त्यात कोणाबाबतही भेदभाव करण्यात आलेला नाही वा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केले.ते म्हणाले की, आता प्रकाशित झाला आहे, तो एनआरसीचा अंतिम मसुदा आहे. तो अंतिम एनआरसी नाही, हे लक्षात ठेवावे. या मसुद्यात२४ मार्च १९७१ पूर्वीपासून आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेशआहे. पण काहींनी पुरावे सादर करूनही त्यांची नावे यादीत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अवधी देण्यात आलेला आहे.आतापर्यंत ज्यांच्याकडे जमिनीची कागदपत्रे, पासपोर्ट, विमा पॉलिसी आहेत, त्यांच्या समावेश केला आहे.तसेच भारतात १९७१ वा त्याआधीपासून राहणारे व आसाममध्ये मधील काळात स्थायिक झालेले जे लोक आहेत, त्यांनी आपल्या मूळ राज्यातील वास्तव्याचे अधिकृत पुरावे सादर करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.स्व. राजीव गांधी पंतप्रधान असताना जो आसाम करार झाला, त्यानुसार हे काम सुरू झाले. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात एनआरसी अद्ययावत करण्याचा निर्णय झाला होता, याची आठवण करून देत राजनाथ सिंह म्हणाले की, हे सारे काम सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली झाले आहे आणि होणार आहे. त्यामुळे जे या देशाचे नागरिक आहेत व तसा पुरावा देतील, त्यांची नावे त्यात नोंदवली जातील.तृणमूलच्या लोकप्रतिनिधींवर टीकातृणमूल काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचे सिल्चर विमानतळावरील वागणे अतिशय वाईट व नियमांना धरून नव्हते, अशी टीका गृहमंत्र्यांनी लोकसभेत केली. ते म्हणाले की, त्यांच्या आसामात जाण्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा येईल, असा अहवाल गुप्तचरांनी दिल्यामुळे त्यांना विमानतळावर ताब्यात घेण्यात आले आणि विमानतळाच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला, असे ते म्हणाले.हक्कभंग प्रस्ताव आणणारतृणमूलचे जे खासदार व आमदार आसामात जाण्यासाठी सिल्चर विमानतळावर पोहोचले होते, ते रात्रभर तिथे थांबून आज पुन्हा कोलकात्याला पोहोचले. आम्हाला आसाम पोलिसांनी विमानतळावर धक्काबुक्की केली, असा आरोप त्यांनी कोलकात्यात केला.हा प्रकार म्हणजे खासदार व आमदारांच्या विशेषाधिकाराचेउल्लंघन आहे. त्यामुळे आम्ही हक्कभंग प्रस्ताव आणणार आहोत, असे तृणमूल काँग्रेसने जाहीर केले.ज्यांची नावे या नॅशनल रिजिस्टर आॅफ सिटिझन्स अंतिम मसुद्यात नाहीत, त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आणखीही मुदत देण्यात येणार आहे. या निमित्ताने काही जण मुद्दाद वातावरण बिघडवून पाहत आहेत.- राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहAssamआसामNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी