शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

"कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 13:55 IST

कंगनावर कारवाई करणाऱ्या उद्धव ठाकरेंना श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये येऊ देणार नाही, असा पवित्रा काही संतांनी घेतला होता

ठळक मुद्देअयोध्येमधील साधूसंतांनीही या कारवाईला विरोध करत उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाहीश्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव असलेल्या चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना दिले समर्थनकुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे की जो उद्धव ठाकरेंचा सामना करणार आहे, तेही अयोध्येमध्ये

अयोध्या - सध्या सिनेअभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेनेमध्ये सुरू असलेल्या वादामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातच कंगनावर कारवाई करणाऱ्या उद्धव ठाकरेंना श्रीरामजन्मभूमी असलेल्या अयोध्येमध्ये येऊ देणार नाही, असा पवित्रा काही संतांनी घेतला होता. दरम्यान, या वादात आता श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमचे सरचिटणीस असलेल्या चंपत राय यांनी उडी घेतली आहे. कुणामध्ये एकढी हिंमत झाली आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखेल, असे सांगत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आणि ड्रग्स रॅकेटच्या मुद्द्यावरून कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप होऊन वाद विकोपाला गेला होता. त्यानंतर कंगनाने आपण मुंबईत येत असून हिंमत असेल तर मला रोखून दाखवा असे आव्हान शिवसेनेला दिले होते. तसेच शिवसेनेवर आरोप करताना मुंबईला पीओकेची उपमा दिली होती. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम तोडले होते. या कारवाईविरोधात अनेकांनी टीका केली होती. अयोध्येमधील साधूसंतांनीही या कारवाईला विरोध करत उद्धव ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव असलेल्या चंपत राय यांनी उद्धव ठाकरेंना समर्थन दिले आहे.चंपत राय म्हणाले की, कुणामध्ये एवढी हिंमत झाली आहे की जो उद्धव ठाकरेंचा सामना करणार आहे, तेही अयोध्येमध्ये. कुणाच्या आईने एवढं जिरं खाल्लंय कि तिचा मुलगा एवढा शक्तिशाली जन्मला आहे जो गंगेला रोखून दाखवेल. कुणाच्या आईंच असं अपत्य आहे जो उद्धव ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखून दाखवेल.कंगनाला समर्थन देत अनेक साधूसंतांनी केला होता उद्धव ठाकरेंना विरोधकंगनाच्या मुंबईतील कार्यालयामधील अनधिकृत बांधकामावर मुंबई महानगरपालिकेने करवाई केल्यानंतर या प्रकरणी आता विश्व हिंदू परिषदेनं कंगनाची बाजू घेतली होती. अयोध्येतील संतांनीही कंगनाचं समर्थन करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. "उद्धव ठाकरेंनी अयोध्येला येऊ नये. यापुढे अयोध्येत उद्धव ठाकरेंचं स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार" असल्याचं त्यांनी म्हटलं होते.अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी कंगनाला देशाची मुलगी म्हटलं असून उद्धव ठाकरेंना अयोध्येत न येण्याचा सल्लावजा इशारा दिला. हनुमान गढी मंदिराचे पुजारी महंत राजू दास यांनी कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईचा विरोध केला होता. तसेच कार्यालय तोडून चांगलं केलं नाही असं म्हटलं होतं.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरPoliticsराजकारण