शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

काँग्रेसच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरणाचा परिणाम नेमका कोणावर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 05:25 IST

चिंतन शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरण संघटनेत लागू करण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या धोरणाचा कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

आदेश रावल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : उदयपूर येथे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरात संघटनेत ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरण लागू करण्याचा निर्णय झाला. या धोरणाची अंमलबजावणी केल्यास लोकसभेतील काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी, सरचिटणीस मुकुल वासनिक, विचार विभागाच्या अध्यक्ष गिरिजा व्यास, खासदार माणिक टागोर आणि सरचिटणीस रणदीपसिंह सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांना एका पदाचा त्याग करावा लागणार आहे.

चिंतन शिबिरात ‘एक व्यक्ती, एक पद’ धोरण संघटनेत लागू करण्याच्या ठरावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या धोरणाचा कोणावर परिणाम होणार, याची चर्चा सुरू झाली आहे. सत्ता नसल्याने अधिकाधिक नेत्यांना संघटनेत पदे देऊन त्यांचे समाधान करण्याचे आव्हान सध्या पक्षासमोर आहे. जी-२३ मधील काही असंतुष्टांना स्थान देऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्नही पक्षश्रेष्ठी करत आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडून चिंतन शिबिरापूर्वीच एक पद काढून घेण्यात आले आहे. ते प्रदेशाध्यक्ष आणि विधिमंडळ पक्षाचे नेतेही होते.

या व्यक्ती, हे पद...

अधीररंजन चौधरी : लोकसभेत काँग्रेसच्या संसदीय दलाचे नेते असून पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्षही आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता; परंतु तो स्वीकारण्यात आला नाही.

मुकुल वासनिक : मध्य प्रदेशचे प्रभारी सरचिटणीस मुकुल वासनिक हे केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य आहेत.

गिरिजा व्यास : काँग्रेस विचार विभागाच्या अध्यक्ष असून केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्याही आहेत.

माणिक टागोर : तामिळनाडूचे खासदार असलेले माणिक टागोर संसदेत काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि तेलंगणचे प्रभारी आहेत.

रणदीपसिंह सुरजेवाला सरचिटणीस आणि माध्यम विभागाचे प्रमुख रणदीपसिंह सुरजेवाला हे कर्नाटकचेही प्रभारी आहेत.

या नेत्यांना संघटनेतील एका पदाचा त्याग करावा लागणार आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण