शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

काँग्रेस अध्यक्षपदाचा एप्रिलमध्ये होणार निर्णय ! पक्षाला प्रतीक्षा पूर्णवेळ अध्यक्षांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:03 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षातील पूर्णवेळ अध्यक्षाची गरज अधोरेखित झाली आहे. ज्या काँग्रेसने दिल्लीत 15 वर्षे सत्ता मिळवली त्या काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा येथे खातंही उघडता आलेलं नाही.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवापासून अडचणीत सापडलेल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर युपीएच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली होती. आता काँग्रेसच्या पुढील अध्यक्षांसंदर्भात एप्रिलमध्ये निर्णय होणार आहे. 

सोनिया गांधी याच यापुढेही काँग्रेसच्या अध्यक्षा कायम राहणार की, त्यांच्या जागी दुसऱ्या कुणाला संधी मिळणार हे एप्रिलमध्ये ठरणार आहे. काँग्रेस नेतृत्वासंदर्भातील निर्णय पक्षाच्या महाधिवेशनात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. राहुल गांधी पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. या संदर्भात राहुल यांनी काहीही निर्णय़ घेतला नसल्याचे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. 

काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती पक्षासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे पक्षाला पूर्ववेळ अध्यक्षाची गरज आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस पक्षातील पूर्णवेळ अध्यक्षाची गरज अधोरेखित झाली आहे. ज्या काँग्रेसने दिल्लीत 15 वर्षे सत्ता मिळवली त्या काँग्रेसला सलग दुसऱ्यांदा येथे खातंही उघडता आलेलं नाही. तर 66 पैकी 63 जागांवर काँग्रेस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.