शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

बाईक चालवताना ईयरफोन घालणे जीवावर बेतले, पत्नीला व्हिडीओ कॉल करुन जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 16:27 IST

बेगुसराय येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वरुन हा युवक आपल्या दुचाकीवरुन जात होता.

पाटणा - बाईकवरुन प्रवास करताना मोबाईलवर बोलणे किंवा रस्त्यावरुन चालताना इयरफोन वापरणे हे अनेकदा जीवावर बेतल्याचे आपण पाहिलं आहे. मात्र, यातून आपण काही शिकतो की नाही? हाच खरा प्रश्न आहे. बिहारमधील बेगुसराय येथे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. बाईक चालवताना ईयरफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा आवाजच या युवकाला लक्षात आला नाही. त्यामुळे, भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने तरुणाला चिरडले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

बेगुसराय येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वरुन हा युवक आपल्या दुचाकीवरुन जात होता. मात्र, कानात ईअरफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा अंदाजच या युवकाला आला नाही. ट्रकचालकाने सातत्याने हॉर्न वाजवले, पण तरुणाच्या तेही लक्षात आले नाही. त्यातच, ट्रकचालकाने गाडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात संबंधित दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. त्यामुळे गाडीसह तरुण रस्त्यावर पडला, त्यात त्याचे दोन्ही पाय ट्रकच्या पायाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. या अवस्थेतही तरुणाने आपल्या खिशातून मोबाईल काढून पत्नीला व्हिडीओ कॉल केला. आपल्या पत्नीला पाहून शेवटचे शब्द बोलत अखेरचा श्वास घेतला. तरुणाचा असा दुर्दैवी आणि मन हेलावणारा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे.

राजाराम पंडित असे या युवकाचे नाव असून तीन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. राजारामला एक 7 महिन्यांची मुलगीही आहे. मात्र, वडिलांच्या एका चुकीमुळे तिने आपले वडिल कायमचे गमावले आहेत. राजाराम आपल्या मेव्हण्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी सासूरवाडीकडे निघाला होता. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, अति रक्तश्रावामुळे त्याचा जीव गेला.  

 

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारbegusarai-pcबेगूसराय