शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

बाईक चालवताना ईयरफोन घालणे जीवावर बेतले, पत्नीला व्हिडीओ कॉल करुन जीव सोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 16:27 IST

बेगुसराय येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वरुन हा युवक आपल्या दुचाकीवरुन जात होता.

पाटणा - बाईकवरुन प्रवास करताना मोबाईलवर बोलणे किंवा रस्त्यावरुन चालताना इयरफोन वापरणे हे अनेकदा जीवावर बेतल्याचे आपण पाहिलं आहे. मात्र, यातून आपण काही शिकतो की नाही? हाच खरा प्रश्न आहे. बिहारमधील बेगुसराय येथे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. बाईक चालवताना ईयरफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा आवाजच या युवकाला लक्षात आला नाही. त्यामुळे, भरधाव वेगात येणाऱ्या या ट्रकने तरुणाला चिरडले. या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. 

बेगुसराय येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 28 वरुन हा युवक आपल्या दुचाकीवरुन जात होता. मात्र, कानात ईअरफोन घालून गाणे ऐकत असल्याने पाठीमागून येणाऱ्या ट्रकचा अंदाजच या युवकाला आला नाही. ट्रकचालकाने सातत्याने हॉर्न वाजवले, पण तरुणाच्या तेही लक्षात आले नाही. त्यातच, ट्रकचालकाने गाडी पुढे नेण्याच्या प्रयत्नात संबंधित दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. त्यामुळे गाडीसह तरुण रस्त्यावर पडला, त्यात त्याचे दोन्ही पाय ट्रकच्या पायाखाली आल्याने तो गंभीर जखमी झाला. या अवस्थेतही तरुणाने आपल्या खिशातून मोबाईल काढून पत्नीला व्हिडीओ कॉल केला. आपल्या पत्नीला पाहून शेवटचे शब्द बोलत अखेरचा श्वास घेतला. तरुणाचा असा दुर्दैवी आणि मन हेलावणारा मृत्यू सर्वांच्याच मनाला चटका लावून गेला आहे.

राजाराम पंडित असे या युवकाचे नाव असून तीन वर्षांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. राजारामला एक 7 महिन्यांची मुलगीही आहे. मात्र, वडिलांच्या एका चुकीमुळे तिने आपले वडिल कायमचे गमावले आहेत. राजाराम आपल्या मेव्हण्याच्या वर्षश्राद्ध कार्यक्रमासाठी सासूरवाडीकडे निघाला होता. दरम्यान, अपघातानंतर स्थानिकांनी युवकाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, अति रक्तश्रावामुळे त्याचा जीव गेला.  

 

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारbegusarai-pcबेगूसराय