शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

रस्ते अपघातात कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू? नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:20 IST

Nitin Gadkari in Lok Sabha : गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले.

Nitin Gadkari in Lok Sabha : नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात होत असलेल्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर २०२४ पर्यंत रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याबाबत बोललो होतो. पण, अपघात कमी झाले नाहीत, उलट परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी जातो. त्यावेळी, तिथे रस्ते अपघातांचा विषय आला की, मी माझे तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.

गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले. यावेळी,  अपघात कमी करण्यासाठी मानवी स्वभावात बदल करावा लागेल. समाजालाही बदलावे लागेल. तसेच कायद्याचा सर्वांना सन्मान करावा लागेल. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत अपघात थांबवणे फार कठीण आहे. हा एकमेव विषय आहे, ज्यात आमच्या विभागाला यश मिळाले नाही. तेव्हा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने रस्ते अपघात कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

याचबरोबर, नितीन गडकरी यांनी यावेळी एक वैयक्तिक किस्सा शेअर केला. ते म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता होतो. ज्यावेळी कुटुंबासह माझ्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली. त्यावेळी ट्रकच्या टायरखाली माझे कुटुंब आले होते. या घटनेमुळे माझे कुटुंब बराच काळ रुग्णालयात दाखल होते. मात्र, देवाच्या कृपेने मी व माझे कुटुंब वाचलो. त्यामुळे मी त्याबाबत खूप संवेदनशील आहे

पुढे नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रक अपघातांसाठी मोठे कारण बनत आहेत. तसेच अनेक ट्रकचालक महामार्गावर लेनची शिस्त पाळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताचे उदाहरण देताना ते म्हणाले की, भारतात बस बनविणाऱ्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय मानकानुसार बस निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून अपघातानंतर खिडकीजवळ असलेल्या हातोडीने काच फोडून प्रवाशाला तात्काळ बाहेर पडता येईल.

कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू?भारतात दरवर्षी रस्ते अपघातात १.७८ लाख बळी पडतात. त्यात ६० टक्के पीडित हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत, अशीही माहिती नितीन गडकरी यांनी दिली. उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाल्याचा आकडा आहे. एकूण अपघातांपैकी १३.७ टक्के म्हणजे २३,००० मृत्यू एकट्या उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. त्यानंतर तमिळनाडूमध्ये १०.६ टक्के म्हणजे १८,००० मृत्यू झाले. तर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र असून ९ टक्के म्हणजेच १५,००० मृत्यू झाले आहेत.शहरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सर्वाधिक मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत वर्षाला १,४०० मृत्यू झाले असून त्याखालोखाल बंगळुरू(९१५ मृत्यू) आणि जयपूरचा (९१५ मृत्यू) क्रमांक लागतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातlok sabhaलोकसभा