शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

रस्ते अपघातात कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू? नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 21:20 IST

Nitin Gadkari in Lok Sabha : गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले.

Nitin Gadkari in Lok Sabha : नवी दिल्ली : लोकसभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशात होत असलेल्या रस्ते अपघातांबाबत चिंता व्यक्त केली. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर २०२४ पर्यंत रस्ते अपघात ५० टक्के कमी करण्याबाबत बोललो होतो. पण, अपघात कमी झाले नाहीत, उलट परिस्थिती पूर्वीपेक्षा वाईट झाली आहे. ज्यावेळी मी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होण्यासाठी जातो. त्यावेळी, तिथे रस्ते अपघातांचा विषय आला की, मी माझे तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.

गुरुवारी लोकसभेत शून्य प्रहरात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातांवर भाष्य केले. यावेळी,  अपघात कमी करण्यासाठी मानवी स्वभावात बदल करावा लागेल. समाजालाही बदलावे लागेल. तसेच कायद्याचा सर्वांना सन्मान करावा लागेल. जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत अपघात थांबवणे फार कठीण आहे. हा एकमेव विषय आहे, ज्यात आमच्या विभागाला यश मिळाले नाही. तेव्हा तुम्हा सर्वांच्या सहकार्याने रस्ते अपघात कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

याचबरोबर, नितीन गडकरी यांनी यावेळी एक वैयक्तिक किस्सा शेअर केला. ते म्हणाले की, अनेक वर्षांपूर्वी मी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता होतो. ज्यावेळी कुटुंबासह माझ्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली. त्यावेळी ट्रकच्या टायरखाली माझे कुटुंब आले होते. या घटनेमुळे माझे कुटुंब बराच काळ रुग्णालयात दाखल होते. मात्र, देवाच्या कृपेने मी व माझे कुटुंब वाचलो. त्यामुळे मी त्याबाबत खूप संवेदनशील आहे

पुढे नितीन गडकरी म्हणाले की, रस्त्यावर उभ्या केलेल्या ट्रक अपघातांसाठी मोठे कारण बनत आहेत. तसेच अनेक ट्रकचालक महामार्गावर लेनची शिस्त पाळत नसल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. समृद्धी महामार्गावर झालेल्या बस अपघाताचे उदाहरण देताना ते म्हणाले की, भारतात बस बनविणाऱ्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय मानकानुसार बस निर्मिती करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरून अपघातानंतर खिडकीजवळ असलेल्या हातोडीने काच फोडून प्रवाशाला तात्काळ बाहेर पडता येईल.

कोणत्या राज्यात सर्वाधिक मृत्यू?भारतात दरवर्षी रस्ते अपघातात १.७८ लाख बळी पडतात. त्यात ६० टक्के पीडित हे १८ ते ३४ वयोगटातील आहेत, अशीही माहिती नितीन गडकरी यांनी दिली. उत्तर प्रदेशमध्ये रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू झाल्याचा आकडा आहे. एकूण अपघातांपैकी १३.७ टक्के म्हणजे २३,००० मृत्यू एकट्या उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. त्यानंतर तमिळनाडूमध्ये १०.६ टक्के म्हणजे १८,००० मृत्यू झाले. तर तिसऱ्या स्थानावर महाराष्ट्र असून ९ टक्के म्हणजेच १५,००० मृत्यू झाले आहेत.शहरांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास सर्वाधिक मृत्यू दिल्लीमध्ये झाले आहेत. दिल्लीत वर्षाला १,४०० मृत्यू झाले असून त्याखालोखाल बंगळुरू(९१५ मृत्यू) आणि जयपूरचा (९१५ मृत्यू) क्रमांक लागतो, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातlok sabhaलोकसभा