शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

‘यूपीए’ आता आहेच कुठे ? ममता बॅनर्जींचा सवाल; शरद पवार यांच्याशी पर्यायांविषयी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 07:37 IST

Mamata Banerjee News: ‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर बुधवारी दिले.

मुंबई : ‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही’, असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चेनंतर बुधवारी दिले. या भेटीनंतर दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार यांच्याकडे आपण यूपीएचे नेतृत्व देणार का, असा प्रश्न विचारला असता ममता बॅनर्जी यांनी, पर्यायाच्या नेतृत्वाबाबत आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. त्याच वेळी शरद पवार यांनी ‘भाजपला मजबूत पर्याय देताना काँग्रेसला वगळण्याची चर्चाच नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आहे. त्यासाठी जो मेहनत करेल आणि सर्वांसोबत यायला तयार आहे, त्या सर्वांना घेऊन आम्ही ुढे जाणार आहोत’, अशी भूमिका मांडली.

भाजपला पर्याय देऊ शकेल आणि ज्यावर लोकांचा विश्वास आहे अशा रस्त्याने आम्ही जाऊ. आमच्यात नेतृत्वाचा विषय नाही. नेतृत्व कोणाचे ही दुय्यम बाब आहे, असेही पवार म्हणाले. काँग्रेसच्या नेतृत्वात संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) कार्यरत असताना ममता यांनी,‘आता यूपीए अस्तित्वात नाही’ असे विधान करून पुढील काळात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए ऐवजी भाजप विरोधात अन्य पर्याय उभा करण्याचे सूचित केले.

सिल्व्हर ओक या पवार यांच्या निवासस्थानी दोघा नेत्यांची तासभर चर्चा झाली. प्रफुल्ल पटेल यांच्यासह राज्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्या शरद पवार यांना भेटल्या. मुंबईच्या दौऱ्यात त्यांनी एकाही काँग्रेस नेत्याशी चर्चा केली नाही. यावरूनही त्या काँग्रेसला वगळून भाजपविरोधात आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आरोग्य लवकरच ठणठणीत होवो, अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करते, या शब्दांत बॅनर्जी यांनी मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

ममता म्हणाल्या...-‘यूपीए आता आहे कुठे?, यूपीए आता नाही.’- फॅसिझमच्या विरोधात मजबूत पर्याय द्यावा लागेल.- कोणताही नेता विदेशात राहणार असेल तर, भाजपशी कसे काय लढणार?, फिल्डमध्ये राहूनच लढावे लागेल. 

सामूहिक नेतृत्वाची रणनीती-यूपीए अस्तित्वात नसल्याच्या ममता बॅनर्जी यांच्या विधानाला शरद पवार यांनी छेद दिला नाही. काँग्रेसच्या नेतृत्वातच भाजपला पर्याय दिला जाईल, असेही पवार यांनी म्हटले नाही. - सामूहिक नेतृत्वाची संकल्पना मांडत त्यांनी  ममता यांच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचे समजते. सामूहिकरित्या भाजपच्या विरोधात उभे राहावे व काँग्रेसने त्यात सहभागी व्हावे, अशी ममता व पवार यांची रणनीती दिसत आहे. 

शरद पवार म्हणाले...-फिल्डमध्ये राहूनच जिंकता येते, हे त्यांचे म्हणणे बरोबर आहे.-पश्चिम बंगालमध्ये त्यांनी व त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी ते सिद्धदेखील केले आहे.-समविचारी पक्षांनी आज आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपच्या विरोधात एकत्र आले पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न आहे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

काँग्रेसविना भाजपचा पराभव हे दिवास्वप्नचकाँग्रेसला बरोबर घेतल्याशिवाय भाजपचा पराभव करण्याची भाषा कोणी करीत असेल, तर ते दिवास्वप्नच ठरेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. सध्या जवळपास सर्वच विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएचा भाग आहे. तरी ममता यांनी हे वक्तव्य केल्याची संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसमध्ये उमटली. वेणुगोपाल म्हणाले की, भारतीय राजकारणाची ज्यांना माहिती आहे, त्यांना काँग्रेसविना भाजपशी लढता येणे शक्य नाही, हे समजते. काँग्रेसविना भाजपच्या पराभवाचा विचार हे दिवास्वप्नच ठरेल.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीSharad Pawarशरद पवारcongressकाँग्रेसPoliticsराजकारण