शहरं
Join us  
Trending Stories
1
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
2
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
3
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
5
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
6
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
7
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
8
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन
9
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
10
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
11
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
12
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
13
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
14
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
15
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
16
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
17
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
18
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
19
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
20
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली

कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 18:21 IST

या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

मुंबई - ५०० रुपयांच्या नोटा अचानक बाजारातून गायब झाल्यात. जवळपास ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा कुठे गेल्यात हा प्रश्न उभा राहिला आहे. गायब झालेल्या या पैशाचा हिशोब लागत नाही. RBI ने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ मिलियन नोटा छापल्या होत्या. परंतु बँकांकडे सध्या ७२६० मिलियन नोटाच आहेत. म्हणजे जवळपास १७६ कोटी ५०० रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्या आहेत. या गायब झालेल्या नोटांची किंमत तब्बल ८८ हजार कोटी आहे. हा खुलासा RTI च्या एका रिपोर्टमधून झाला आहे. 

नोटा छपाई देशात फक्त ४ ठिकाणी होते. देवास, नाशिक, म्हैसूर आणि सालबोनी इथं आरबीआय नोटा छपाईचे काम करते. अशात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकच्या प्रेसमधून २१० मिलियन ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. Free Press Journal रिपोर्टनुसार, आरटीआयमधून ही बाब उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी या नोटांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

रिपोर्टनुसार, आरटीआयच्या माध्यमातून मनोरंजन रॉय यांनी गायब झालेल्या नोटांबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार, २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकमध्ये ३७५.४५० मिलियन ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. परंतु RBI च्या रेकॉर्डमध्ये केवळ ३४५ मिलियन नोटा आहेत. २०१५-२०१६ या काळात रघुराम राजन हे RBI चे गर्व्हनर होते. RTI मध्ये एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात २१० मिलियन नोटा छापल्या गेल्याचे सांगितले ज्या RBI ला पाठवण्यात आल्यात. तर नाशिकमधील प्रेसने सांगितले की, आम्ही नवीन ५०० च्या नोटा सेंट्रल बँकेला पाठवल्या होत्या. परंतु याचा उल्लेख RBI च्या वार्षिक रिपोर्टमध्ये कुठेही नाही. 

अजित पवारांचा सरकारवर निशाणानोटांची छपाई झाली पण नोटा आरबीआयकडे पोहचल्या नाहीत. अशा हजारो कोटी नोटा गायब झाल्याची बातमी समोर आलीय. त्याबाबत अर्थ विभाग, आरबीआयनं लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी. बनावट नोटा बाजारात आल्या, नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढायचा असं सरकारने सांगितले होते. देशाच्या भल्यासाठी काय करायचे ते करू द्या, पण हे केल्यानंतर २ हजारांची नोट काढली, पुन्हा ती बंद केली. हा पोरखेळ सुरू आहे का? या बातमीत किती तथ्य आहे हे सरकारने सांगावे. काहीच सांगायला सरकार तयार नाही. जनतेचा अधिकार आहे. या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकAjit Pawarअजित पवार