शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
2
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
6
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
7
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
8
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
9
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
10
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
11
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
12
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
13
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
14
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
15
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
16
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
17
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
18
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
19
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
20
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेल्या ५०० रुपयाच्या नोटा?; छापलेल्या ८८००० कोटींचा हिशोबच नाही, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2023 18:21 IST

या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

मुंबई - ५०० रुपयांच्या नोटा अचानक बाजारातून गायब झाल्यात. जवळपास ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा कुठे गेल्यात हा प्रश्न उभा राहिला आहे. गायब झालेल्या या पैशाचा हिशोब लागत नाही. RBI ने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ मिलियन नोटा छापल्या होत्या. परंतु बँकांकडे सध्या ७२६० मिलियन नोटाच आहेत. म्हणजे जवळपास १७६ कोटी ५०० रुपयांच्या नोटा चलनातून गायब झाल्या आहेत. या गायब झालेल्या नोटांची किंमत तब्बल ८८ हजार कोटी आहे. हा खुलासा RTI च्या एका रिपोर्टमधून झाला आहे. 

नोटा छपाई देशात फक्त ४ ठिकाणी होते. देवास, नाशिक, म्हैसूर आणि सालबोनी इथं आरबीआय नोटा छपाईचे काम करते. अशात एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकच्या प्रेसमधून २१० मिलियन ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. Free Press Journal रिपोर्टनुसार, आरटीआयमधून ही बाब उघडकीस आली आहे. आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी या नोटांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

रिपोर्टनुसार, आरटीआयच्या माध्यमातून मनोरंजन रॉय यांनी गायब झालेल्या नोटांबाबत माहिती मागवली होती. त्यानुसार, २०१५ ते मार्च २०१६ या काळात नाशिकमध्ये ३७५.४५० मिलियन ५०० रुपयांच्या नोटांची छपाई केली होती. परंतु RBI च्या रेकॉर्डमध्ये केवळ ३४५ मिलियन नोटा आहेत. २०१५-२०१६ या काळात रघुराम राजन हे RBI चे गर्व्हनर होते. RTI मध्ये एप्रिल २०१५ ते मार्च २०१६ या काळात २१० मिलियन नोटा छापल्या गेल्याचे सांगितले ज्या RBI ला पाठवण्यात आल्यात. तर नाशिकमधील प्रेसने सांगितले की, आम्ही नवीन ५०० च्या नोटा सेंट्रल बँकेला पाठवल्या होत्या. परंतु याचा उल्लेख RBI च्या वार्षिक रिपोर्टमध्ये कुठेही नाही. 

अजित पवारांचा सरकारवर निशाणानोटांची छपाई झाली पण नोटा आरबीआयकडे पोहचल्या नाहीत. अशा हजारो कोटी नोटा गायब झाल्याची बातमी समोर आलीय. त्याबाबत अर्थ विभाग, आरबीआयनं लोकांच्या मनातील शंका दूर करायला हवी. बनावट नोटा बाजारात आल्या, नोटाबंदी करून काळा पैसा बाहेर काढायचा असं सरकारने सांगितले होते. देशाच्या भल्यासाठी काय करायचे ते करू द्या, पण हे केल्यानंतर २ हजारांची नोट काढली, पुन्हा ती बंद केली. हा पोरखेळ सुरू आहे का? या बातमीत किती तथ्य आहे हे सरकारने सांगावे. काहीच सांगायला सरकार तयार नाही. जनतेचा अधिकार आहे. या प्रकाराचा बारकाईने तपास करून वस्तूस्थिती समोर आणावी असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. 

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकAjit Pawarअजित पवार