शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

सहा हजार कोटी गेले कुठे?, सबसिडीचा काळा बाजार; सरकार कठोर पावले उचलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 12:36 IST

शेतीसाठी असलेल्या १० लाख टन युरियाचा दरवर्षी काळ्या बाजाराच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात वापर केला जात आहे. यामुळे सुमारे ६ हजार कोटी रुपयांची सबसिडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही.

नवी दिल्ली : शेतीसाठी असलेल्या १० लाख टन युरियाचा दरवर्षी काळ्या बाजाराच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात वापर केला जात आहे. यामुळे सुमारे ६ हजार कोटी रुपयांची सबसिडी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. हा काळा बाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. मागील अडीच महिन्यांत सरकारने विभिन्न गुप्त अभियानांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांची सबसिडीची गळती शोधून काढली आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना २६६ रुपये प्रतिगोणी (४५ किलो) दराने युरिया उपलब्ध करून देते. युरियाच्या एका गोणीवर जवळपास २,७०० रुपयांची सबसिडी असते. यास कृषी-ग्रेड युरिया म्हणतात. उद्योगासाठी दरवर्षी १३-१४ लाख टन युरियाची गरज लागते. यास तांत्रिक-ग्रेड युरिया म्हटले जाते. तांत्रिक ग्रेडच्या युरियाचे देशात केवळ १.५ लाख टनच उत्पादन होते. उरलेल्या युरियाची उद्योगांनी आयात करावी, असे अपेक्षित आहे. तथापि, प्रत्यक्षातील आयात केवळ २ लाख टनच होते. याचाच अर्थ जवळपास १० लाख टन कृषी-ग्रेड युरिया उद्योगांकडून वापरला जातो. यावरील ६ हजार कोटी रुपयांच्या सबसिडीचा गैरवापर होत आहे. 

रसायन व खत मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, खत विभागाच्या वतीने युरियाचा गैरवापर करणाऱ्या दोषींना शोधून काढण्यासाठी देशव्यापी मोहीम राबविली जात आहे. त्यासाठी ‘खत भरारी पथके’ स्थापन करण्यात आली आहेत. दोषींविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना राज्य सरकारांना करण्यात आल्या आहेत.

कुठे होतोय वापर?राळ अथवा डिंक, प्लायवूड, क्रॉकरी, मोल्डिंग पावडर, पशुखाद्य, डेअरी आणि औद्योगिक खनन स्फोटके आदी क्षेत्रात युरियाचा वापर केला जातो. कृषी-ग्रेड युरिया नीम-लेपित असतो. तांत्रिक-ग्रेड युरिया तसा नसतो. काही रासायनिक प्रक्रिया करून नीम कोटिंग हटवून युरिया औद्योगिक उद्देशासाठी वापरला जातो.

टॅग्स :FarmerशेतकरीGovernmentसरकार