शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
2
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
3
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
4
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
5
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
6
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
7
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
8
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
9
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
11
तेव्हा गरजेपेक्षा जास्त कर्मचारी भरले, आता त्यांना बेरोजगार करणार; ॲमेझॉनमध्ये ३०,००० नोकऱ्या धोक्यात
12
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
13
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
14
Shani Gochar 2025: शनिचा फेरा आपल्या राशीसाठी नेहमीच तापदायक ठरतो का? पाहूया भावानुसार फळ
15
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
16
मतदाराचे आणि त्याच्या वडिलाचे आडनाव वेगवेगळे, २० हजार मतदारांची नावे संशयास्पद: आदित्य ठाकरे
17
शाळेची नव्हे, धोक्याची घंटा! सरकारी अनास्था आणि 'विनाअनुदानित' इंग्रजी शाळांचा वाढता बाजार
18
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
19
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
20
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका

भाजपा अन् बीजेडीत कुठे बिनसले? इगो आड आला की जागा? 'महाराष्ट्रासारखीच' इनसाईड स्टोरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 09:51 IST

BJP-BJD alliance talks failed in Odisha: भाजपा-बीजेडी पैकी पहिली घोषणा कोणी केली याला महत्व नसून ही युती तुटण्यामागची कारणे महत्वाची मानली जात आहेत. 

एकीकडे इंडिया आघाडीतील पक्ष आपापले इगो, महत्वाकांक्षांमुळे फुटले असताना तिकडे एनडीएमध्ये देखील ओडिशामध्ये युती तुटली आहे. भाजपा आणि बिजु जनता दलामध्ये जागावाटपावरून बिनसले आहे. पहिली घोषणा कोणी केली याला महत्व नसून ही युती तुटण्यामागची कारणे महत्वाची मानली जात आहेत. 

भाजपाचे ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी पोस्ट करून याची माहिती दिली आणि लोकसभाच नाही तर विधानसभा देखील एकट्याने लढण्याची घोषणा केली. यावरून काहीतरी मोठा वाद झाला असण्याची शक्यता राजकीय धुरिणांनी व्यक्त केली होती. भाजपा आणि बीजेडी आता स्वतंत्रपणे ओडिशातील २१ लोकसभा मतदारसंघात आणि १४७ विधानसभा मतदारसंघांत लढणार आहेत. दोन्ही पक्षांनी ओडिशाच्या लोकांच्या विकासाची, भविष्याची चिंता असल्याचे दाखविले असले तरी युती तुटण्यामागे कारण वेगळे आहे. 

२०१४ मध्ये महाराष्ट्रात असाच घटनाक्रम घडला होता. ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपामध्ये युती तोडण्यात आली होती. यामध्ये दोन्ही पक्षांच्या महत्वाकांक्षा कारणीभूत होत्या. २०१९ मध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले खरे परंतु ठाकरेंच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेळीमुळे महाराष्ट्रात वेगळ्या राजकारणाची सुरुवात झाली. 

ओडिशातील युती तुटण्यामागे भाजपाच्या नेत्यांनी दोन कारणे दिली आहेत. नवीन पटनायक यांच्या बीजेडीने भाजपाला जेवढ्या जागा देऊ केल्या त्यावर भाजपा खूश नव्हती. बीजेडीने २१ पैकी ११ जागा भाजपाला दिल्या होत्या. काही राजकीय विष्लेशकांनुसार भाजपाला यापेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे भाजपाला वाटत होते. 

दुसरे कारण असे की ओडिशामध्ये आम्ही नाही तर बीजेडी आमच्यासोबत युती करण्यासाठी इच्छुक आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी पसरविले. यामुळे बीजेडीने भाजपाला एक का होईना जास्त जागा दिल्या, असा संदेश लोकांत पोहोचविला जात होता. या दोन कारणांमुळे भाजपा-बीजेडी युती तुटल्याचे भाजपातील सुत्रांनी सांगितले आहे. 

भाजपाचा स्वार्थ काय...बीजेडीने ११ लोकसभा जागा दिल्या होत्या, खासगी सर्व्हेनुसार त्यापेक्षा जास्त जागा भाजपाला जिंकता येणार होत्या. तसेच विधानसभेत बीजेडी भाजपाला ३५-४० जागांवर सीमित ठेवू इच्छित होती. तर भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपा बहुमताच्या दिशेने जात होती. भाजपाचे यापेक्षाही मोठे लक्ष्य होते ते म्हणजे लोकसभेत ४०० पारचे. बीजेडीसोबत युती ठेवली असती तर भाजपाला ४०० जागांचे लक्ष्य गाठता आले नसते, असे भाजपाला वाटले, यामुळेच युती तोडण्यात आली. 

टॅग्स :Biju Janata Dalबिजू जनता दलBJPभाजपाOdishaओदिशाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४