शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
3
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
4
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
5
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
6
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
7
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
8
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
9
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
10
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
11
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
12
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
13
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
14
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
15
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
16
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
17
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
18
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
19
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
20
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा अन् बीजेडीत कुठे बिनसले? इगो आड आला की जागा? 'महाराष्ट्रासारखीच' इनसाईड स्टोरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 09:51 IST

BJP-BJD alliance talks failed in Odisha: भाजपा-बीजेडी पैकी पहिली घोषणा कोणी केली याला महत्व नसून ही युती तुटण्यामागची कारणे महत्वाची मानली जात आहेत. 

एकीकडे इंडिया आघाडीतील पक्ष आपापले इगो, महत्वाकांक्षांमुळे फुटले असताना तिकडे एनडीएमध्ये देखील ओडिशामध्ये युती तुटली आहे. भाजपा आणि बिजु जनता दलामध्ये जागावाटपावरून बिनसले आहे. पहिली घोषणा कोणी केली याला महत्व नसून ही युती तुटण्यामागची कारणे महत्वाची मानली जात आहेत. 

भाजपाचे ओडिशाचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी पोस्ट करून याची माहिती दिली आणि लोकसभाच नाही तर विधानसभा देखील एकट्याने लढण्याची घोषणा केली. यावरून काहीतरी मोठा वाद झाला असण्याची शक्यता राजकीय धुरिणांनी व्यक्त केली होती. भाजपा आणि बीजेडी आता स्वतंत्रपणे ओडिशातील २१ लोकसभा मतदारसंघात आणि १४७ विधानसभा मतदारसंघांत लढणार आहेत. दोन्ही पक्षांनी ओडिशाच्या लोकांच्या विकासाची, भविष्याची चिंता असल्याचे दाखविले असले तरी युती तुटण्यामागे कारण वेगळे आहे. 

२०१४ मध्ये महाराष्ट्रात असाच घटनाक्रम घडला होता. ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपामध्ये युती तोडण्यात आली होती. यामध्ये दोन्ही पक्षांच्या महत्वाकांक्षा कारणीभूत होत्या. २०१९ मध्ये हे दोघे पुन्हा एकत्र आले खरे परंतु ठाकरेंच्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या खेळीमुळे महाराष्ट्रात वेगळ्या राजकारणाची सुरुवात झाली. 

ओडिशातील युती तुटण्यामागे भाजपाच्या नेत्यांनी दोन कारणे दिली आहेत. नवीन पटनायक यांच्या बीजेडीने भाजपाला जेवढ्या जागा देऊ केल्या त्यावर भाजपा खूश नव्हती. बीजेडीने २१ पैकी ११ जागा भाजपाला दिल्या होत्या. काही राजकीय विष्लेशकांनुसार भाजपाला यापेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असे भाजपाला वाटत होते. 

दुसरे कारण असे की ओडिशामध्ये आम्ही नाही तर बीजेडी आमच्यासोबत युती करण्यासाठी इच्छुक आहे, असे भाजपाच्या नेत्यांनी पसरविले. यामुळे बीजेडीने भाजपाला एक का होईना जास्त जागा दिल्या, असा संदेश लोकांत पोहोचविला जात होता. या दोन कारणांमुळे भाजपा-बीजेडी युती तुटल्याचे भाजपातील सुत्रांनी सांगितले आहे. 

भाजपाचा स्वार्थ काय...बीजेडीने ११ लोकसभा जागा दिल्या होत्या, खासगी सर्व्हेनुसार त्यापेक्षा जास्त जागा भाजपाला जिंकता येणार होत्या. तसेच विधानसभेत बीजेडी भाजपाला ३५-४० जागांवर सीमित ठेवू इच्छित होती. तर भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेनुसार भाजपा बहुमताच्या दिशेने जात होती. भाजपाचे यापेक्षाही मोठे लक्ष्य होते ते म्हणजे लोकसभेत ४०० पारचे. बीजेडीसोबत युती ठेवली असती तर भाजपाला ४०० जागांचे लक्ष्य गाठता आले नसते, असे भाजपाला वाटले, यामुळेच युती तोडण्यात आली. 

टॅग्स :Biju Janata Dalबिजू जनता दलBJPभाजपाOdishaओदिशाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४