शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 20:43 IST

Gajendra Singh Shekhawat Attack On Congress:  इतिहासात जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला. एवढेच नाही, तर काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे.

'बटेंगे तो कटेंगे' या घोषणेसंदर्भात केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी मंगळवारी भाष्य केले आहे. इतिहासात जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला. एवढेच नाही, तर काँग्रेस फोडाफोडीचे राजकारण करत असल्याचा आरोपही गजेंद्रसिंह शेखावत यांनी केला आहे. ते एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.

शेखावत म्हणाले, "काँग्रेसने नेहमीच विभाजनाचे राजकारण केले आहे. त्यांनी धर्म, संपत्ती, जात आणि भाषेच्या आधारे देशाचे विभाजन केले आहे. आता ते लोकांमध्ये फूट पाडून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आता लोकांमध्ये त्यांच्या कपड्यांचा रंगावरून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भगवा आमच्या सन्मानाचे प्रतिक आहे. हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही, तर श्रद्धेचा विषय आहे."

"आमच्याकडे कथांमध्ये लिहिलेले आहे, एकतेतच शक्ती आहे. आजपर्यंत जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा तो भाग देशापासून वेगळा झाला आहे. मध्य आशियातील पर्शियापासून ते अफगाणिस्तान आणि नेपाळपर्यंत, ज्या पद्धतीने भारतापासून वेगळे झाले, ते फुटीमुळेच झाले. हे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये लिहिलेले आहे," असेही शेखावत म्हणाले.

काँग्रेस म्हणते प्रक्षोभक घोषणा -याचवेळी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) भडकाऊ भाषणे, फुटीरतावादी घोषणांद्वारे जनतेची दिशाभूल करण्याचा आणि त्यांच्या पक्षाबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप केला आहे. खर्गे म्हणाले, भाजप फूट पाडण्यात गुंतली आहे.

ते म्हणाले, "एकीकडे योगी म्हणतात, ‘बटेंगे तो कटेंगे’, मोदी म्हणतात ‘एक हैं तो सेफ हैं.’ माझ्या दोन्ही नेत्यांना आग्रह आहे की, कुणाची घोषणा वापरायची, यावर त्यांनी एकमत करावे, योगींचा की मोदींचा" 

टॅग्स :BJPभाजपाElectionनिवडणूक 2024