शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाकव्याप्त काश्मीर कधी होणार भारताचा हिस्सा?; केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले सूतोवाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:56 IST

त्याचसोबत काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे.

नवी दिल्ली - उरी आणि बालाकोट हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर देत एकप्रकारे हे सरकार गंभीर आहे असे संकेत दिले. पाकिस्तानच्या मनात भीती आहे की, भारत पाकव्याप्त काश्मीर परत घेईल. त्यासाठी पाकिस्तान पीओकेचं स्वरुप बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताचं पुढील पाऊल पाकव्याप्त काश्मीर असेल ही चिंता पाकिस्तानला आहे असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केला. 

आजतक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, पीओकेबाबत एक प्रस्ताव १९९४ मध्ये पारित करण्यात आला होता. मात्र काँग्रेस सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता तसं होणार नाही. आता पीओके भारताचं आहे. आता पाकिस्तानही याबाबतीत मोदी सरकारला गंभीरतेने घेत आहे. असं त्यांनी सांगितले. 

कलम ३७० हटविण्यावरुन अनेक चर्चा झाली. पीओके भारताचा भाग कधी झाला यावर मी बोलणं उचित राहणार नाही. हा अधिकार माझा नाही. मात्र कलम ३७० हटविताना त्याला कसं संपुष्टात आणणार? काही तरतुदी वगळणार का? मात्र काही न बोलता सगळं झालं. तसेच पीओकेच्या बाबतीत होईल तेव्हा आपण चर्चा करु असे संकेत जितेंद्र सिंह यांनी दिले. 

त्याचसोबत काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. तेथील जनजीवन पुर्वपदावर आलं आहे. मागील ६ महिन्यापासून तिथे कोणतीही हिंसा झाली नाही. गेल्या ३० वर्षात हे पहिल्यांदा असं घडलं आहे. पाकिस्तानला डिवचल्यानंतर काश्मीरात हिंसा होत होती. मात्र आता तसं होत नाही. श्रीनगरच्या बाजारपेठेत गर्दीही होत असते असं सांगत जितेंद्र सिंह यांनी काश्मीरमध्ये सगळं सुरळीत सुरु असल्याचा दावा केला. 

मात्र काश्मीरात सगळं सुरळीत असेल तर तेथील नेत्यांना नजरकैदेत का ठेवलं असा प्रश्न केला त्यावर जितेंद्र सिंह म्हणाले की, यात काही तथ्य नाही. अमित शहा सर्वात दयाळू गृहमंत्री आहेत. ज्यावेळी पंडित नेहरु पंतप्रधान होते त्यावेळी शेख अब्दुला यांना तामिळनाडूत नजरकैदेत ठेवलं होतं. शेख अब्दुला आणि नेहरु यांच्यात चांगले संबंध होते. त्यावेळी इंटरनेट नव्हते, फोनही नव्हता. हाऊस अरेस्ट म्हणजे त्या व्यक्तीचा संपर्क कमी करावा. राजकीय कैदी असतील तर त्यांना घरातच ठेवलं जातं. काश्मीरात त्यांच्या घरात ४ पोलीस ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवलंय असं बोलता येत नाही. मात्र काही जणांचे म्हणणे आहे की, हे नजरकैदेत आहेत म्हणून काश्मीरात शांतता आहे असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370POK - pak occupied kashmirपीओके