शहरं
Join us  
Trending Stories
1
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
2
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
3
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
4
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
5
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
6
Travel : मन मोहून टाकतील असे भारतातील 'हिडन' हिल स्टेशन्स; ९०% लोकांना या जागांबद्दल माहितीच नाही!
7
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
8
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
9
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
10
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
11
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
12
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
13
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
14
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
15
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
16
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
17
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
18
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
19
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
20
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

पाकव्याप्त काश्मीर कधी होणार भारताचा हिस्सा?; केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केले सूतोवाच 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 17:56 IST

त्याचसोबत काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे.

नवी दिल्ली - उरी आणि बालाकोट हल्ल्यानंतर मोदी सरकारने पाकिस्तानला चोख उत्तर देत एकप्रकारे हे सरकार गंभीर आहे असे संकेत दिले. पाकिस्तानच्या मनात भीती आहे की, भारत पाकव्याप्त काश्मीर परत घेईल. त्यासाठी पाकिस्तान पीओकेचं स्वरुप बदलण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. भारताचं पुढील पाऊल पाकव्याप्त काश्मीर असेल ही चिंता पाकिस्तानला आहे असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केला. 

आजतक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना जितेंद्र सिंह म्हणाले की, पीओकेबाबत एक प्रस्ताव १९९४ मध्ये पारित करण्यात आला होता. मात्र काँग्रेस सरकारने याकडे दुर्लक्ष केले. मात्र आता तसं होणार नाही. आता पीओके भारताचं आहे. आता पाकिस्तानही याबाबतीत मोदी सरकारला गंभीरतेने घेत आहे. असं त्यांनी सांगितले. 

कलम ३७० हटविण्यावरुन अनेक चर्चा झाली. पीओके भारताचा भाग कधी झाला यावर मी बोलणं उचित राहणार नाही. हा अधिकार माझा नाही. मात्र कलम ३७० हटविताना त्याला कसं संपुष्टात आणणार? काही तरतुदी वगळणार का? मात्र काही न बोलता सगळं झालं. तसेच पीओकेच्या बाबतीत होईल तेव्हा आपण चर्चा करु असे संकेत जितेंद्र सिंह यांनी दिले. 

त्याचसोबत काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर शांतता प्रस्थापित झाली आहे. तेथील जनजीवन पुर्वपदावर आलं आहे. मागील ६ महिन्यापासून तिथे कोणतीही हिंसा झाली नाही. गेल्या ३० वर्षात हे पहिल्यांदा असं घडलं आहे. पाकिस्तानला डिवचल्यानंतर काश्मीरात हिंसा होत होती. मात्र आता तसं होत नाही. श्रीनगरच्या बाजारपेठेत गर्दीही होत असते असं सांगत जितेंद्र सिंह यांनी काश्मीरमध्ये सगळं सुरळीत सुरु असल्याचा दावा केला. 

मात्र काश्मीरात सगळं सुरळीत असेल तर तेथील नेत्यांना नजरकैदेत का ठेवलं असा प्रश्न केला त्यावर जितेंद्र सिंह म्हणाले की, यात काही तथ्य नाही. अमित शहा सर्वात दयाळू गृहमंत्री आहेत. ज्यावेळी पंडित नेहरु पंतप्रधान होते त्यावेळी शेख अब्दुला यांना तामिळनाडूत नजरकैदेत ठेवलं होतं. शेख अब्दुला आणि नेहरु यांच्यात चांगले संबंध होते. त्यावेळी इंटरनेट नव्हते, फोनही नव्हता. हाऊस अरेस्ट म्हणजे त्या व्यक्तीचा संपर्क कमी करावा. राजकीय कैदी असतील तर त्यांना घरातच ठेवलं जातं. काश्मीरात त्यांच्या घरात ४ पोलीस ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवलंय असं बोलता येत नाही. मात्र काही जणांचे म्हणणे आहे की, हे नजरकैदेत आहेत म्हणून काश्मीरात शांतता आहे असं त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370POK - pak occupied kashmirपीओके