शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून नक्षलवादाचा सफाया केव्हा होणार? अमित शाह यांनी वर्ष अन् महिनाही सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 13:12 IST

Naxalism: डाव्याच्या नक्षलवादापासून केव्हापर्यंत मुक्ती मिळेल? यासंदर्भात मोदी सरकारने हिंट दिली आहे.

भारताच्या काही भागात गेल्या पाच दशकांपासून नक्षलवादाचे थैमान सुरू आहे. या काळात नक्षलडवाद्यांनी हजारो लोकांचा बळी घेतला आहे. केंद्र आणि राज्यांतील चांगल्या समन्वयामुळे, महाराष्ट्र ते ओडिशापर्यंतचा रेड कॉरिडॉर शांत आहे. सुरक्षा दलांना फ्री हँड देण्यात आले आहे. सरकार नक्षलवाद्यांसोबत केवळ बोलतच नाही, तर त्यांच्याकडून सूचनाही मागवत आहे. यातच आता, डाव्याच्या नक्षलवादापासून केव्हापर्यंत मुक्ती मिळेल? याच्या डेडलाईनसंदर्भातही मोदी सरकारने हिंट दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी म्हणाले, भारत मार्च 2026 पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे. एवढेच नाही, तर त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहनही केले. तसेच, छत्तीसगड सरकार एक-दोन महिन्यात नवीन आत्मसमर्पण धोरण जाहीर करणार असल्याचेही सांगितले. शाह, नवापूर येथे छत्तीसगड आणि शेजारील राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत डाव्या कट्टरतावादासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर आणि आंतरराज्य समन्वय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

शाह म्हणाले, "आज लढाई अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही मार्च 2026 पर्यंत देशाला डाव्या उग्रवादापासून अथवा कट्टरतावादापासून मुक्त करू शकू. 2019 पासून आतापर्यंत नक्षलग्रस्त भागांत 277 सीआरपीएफ कॅम्प स्थापन करण्यात आले आहेत आणि सुरक्षेची कमतरता दूर करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, सुरक्षादलासोबतच NIA आणि ED सारख्या केंद्रीय संस्थांनीदेखील माओवाद्यांचे आर्थिक तंत्र संपवण्याचे कामही केले आहे."

गृहमंत्री म्हणाले, 'नक्षलवादी हिंसाचार हे लोकशाहीसमोरील एक मोठे आव्हान असून गेल्या 40 वर्षांत माओवाद्यांच्या हिंसाचारात 17,000 सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांनी प्राण गमावले आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर नक्षलवादाकडे एक आव्हान म्हणून बघितले गेले. आम्ही दोन उद्देशाने काम केले, एक म्हणजे नक्षलग्रस्त भागात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोकांचा विश्वास जिंकून विकासाला चालना देण्यासाठी. याचबरोबर 2014 ते 2024 या काळात नक्षलवादी घटनांमध्ये 53 टक्के घट झाल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले.

शाह म्हणाले, 2019 ते 2024 दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश नक्षलवादमुक्त झाले, तर गडचिरोली वगळता महाराष्ट्रही या संकटातून मुक्त झाला आहे. केंद्रासाठी ही मोठी उपलब्धी आहे. छत्तीसगडमध्ये माओवादी हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नवीन निमलष्करी बटालियन तैनात केल्या जातील. यावेळी शाह यांनी, माओवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्यधारेत येण्याचे आवाहनही केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी