शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भारतातून नक्षलवादाचा सफाया केव्हा होणार? अमित शाह यांनी वर्ष अन् महिनाही सांगून टाकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 13:12 IST

Naxalism: डाव्याच्या नक्षलवादापासून केव्हापर्यंत मुक्ती मिळेल? यासंदर्भात मोदी सरकारने हिंट दिली आहे.

भारताच्या काही भागात गेल्या पाच दशकांपासून नक्षलवादाचे थैमान सुरू आहे. या काळात नक्षलडवाद्यांनी हजारो लोकांचा बळी घेतला आहे. केंद्र आणि राज्यांतील चांगल्या समन्वयामुळे, महाराष्ट्र ते ओडिशापर्यंतचा रेड कॉरिडॉर शांत आहे. सुरक्षा दलांना फ्री हँड देण्यात आले आहे. सरकार नक्षलवाद्यांसोबत केवळ बोलतच नाही, तर त्यांच्याकडून सूचनाही मागवत आहे. यातच आता, डाव्याच्या नक्षलवादापासून केव्हापर्यंत मुक्ती मिळेल? याच्या डेडलाईनसंदर्भातही मोदी सरकारने हिंट दिली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी म्हणाले, भारत मार्च 2026 पर्यंत डाव्यांच्या कट्टरवादापासून मुक्त होईल. या धोक्याविरुद्ध अखेरची लढाई सुरू करण्यासाठी मजबूत रणनीती आवश्यक आहे. एवढेच नाही, तर त्यांनी नक्षलवाद्यांना हिंसाचार सोडण्याचे आवाहनही केले. तसेच, छत्तीसगड सरकार एक-दोन महिन्यात नवीन आत्मसमर्पण धोरण जाहीर करणार असल्याचेही सांगितले. शाह, नवापूर येथे छत्तीसगड आणि शेजारील राज्यांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत डाव्या कट्टरतावादासंदर्भात आढावा बैठक घेतल्यानंतर आणि आंतरराज्य समन्वय बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते.

शाह म्हणाले, "आज लढाई अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही मार्च 2026 पर्यंत देशाला डाव्या उग्रवादापासून अथवा कट्टरतावादापासून मुक्त करू शकू. 2019 पासून आतापर्यंत नक्षलग्रस्त भागांत 277 सीआरपीएफ कॅम्प स्थापन करण्यात आले आहेत आणि सुरक्षेची कमतरता दूर करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत. महत्वाचे म्हणजे, सुरक्षादलासोबतच NIA आणि ED सारख्या केंद्रीय संस्थांनीदेखील माओवाद्यांचे आर्थिक तंत्र संपवण्याचे कामही केले आहे."

गृहमंत्री म्हणाले, 'नक्षलवादी हिंसाचार हे लोकशाहीसमोरील एक मोठे आव्हान असून गेल्या 40 वर्षांत माओवाद्यांच्या हिंसाचारात 17,000 सुरक्षा कर्मचारी आणि नागरिकांनी प्राण गमावले आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर नक्षलवादाकडे एक आव्हान म्हणून बघितले गेले. आम्ही दोन उद्देशाने काम केले, एक म्हणजे नक्षलग्रस्त भागात कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आणि दुसरे म्हणजे लोकांचा विश्वास जिंकून विकासाला चालना देण्यासाठी. याचबरोबर 2014 ते 2024 या काळात नक्षलवादी घटनांमध्ये 53 टक्के घट झाल्याचेही शाह यांनी यावेळी सांगितले.

शाह म्हणाले, 2019 ते 2024 दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश नक्षलवादमुक्त झाले, तर गडचिरोली वगळता महाराष्ट्रही या संकटातून मुक्त झाला आहे. केंद्रासाठी ही मोठी उपलब्धी आहे. छत्तीसगडमध्ये माओवादी हिंसाचाराचा सामना करण्यासाठी नवीन निमलष्करी बटालियन तैनात केल्या जातील. यावेळी शाह यांनी, माओवाद्यांना शस्त्रे सोडून मुख्यधारेत येण्याचे आवाहनही केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहnaxaliteनक्षलवादीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी