शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 21:25 IST

उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी जिल्ह्यात असलेल्या धराली गावात भयंकर दुर्घटना घडली. ५ ऑगस्ट रोजी धराली गावावर मोठं संकट कोसळलं. 

ते तिथे थांबले असते, तर मृत्यूने त्यांच्यावरही झडप घातली असती; पण म्हणतात ना की काळ आला होता पण वेळ नाही... तसंच काहीसं त्यांच्यासोबत घडलं. ते धरालीतून निघाले. त्यावेळी तिथे सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं. बाजार होता, तिथे अनेक लोक होते. पण, परत आले तेव्हा त्या जागेचं स्मशान झालं होतं. जिकडे बघावं, तिकडे फक्त चिखल. तेही या आपत्तीमुळे धरातील अडकले होते. धरालीमध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल २२ पर्यटकांनी थरारक अनुभव सांगितला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

केरळातील काही भाविक गंगोत्री दर्शनासाठी उत्तराखंडमध्ये होते. धरालीतून त्यांना मातलीमध्ये हलवण्यात आले. तिथे त्यांनी माध्यमांशी बोलताना कधीही विसरता येणाऱ्या घटनेबद्दल सांगितलं. 

नाश्ता केला, चहा घेतला आणि निघालो

रामचंद्र नाय म्हणाले, '५ ऑगस्ट रोजी आम्ही सकाळी ८ वाजता नाश्ता करण्यासाठी धरालीमध्ये थांबलो. नंतर बाहेर पडलो. तेव्हा सगळं सुरळीत सुरू होतं. पाऊसही नव्हता. तिथून आम्ही निघालो आणि गंगोत्रीला पोहोचलो. दुपारी २ वाजता तिथून परत निघालो. गंगोत्रीवरून दहा किमी खाली आलो.'

'पोलिसांनी तिथेच आमच्या गाड्या थांबवल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं की, पुढे भूस्खलन झाले आहे. मोठंमोठे दगड रस्त्यावर आले आहेत. मग म्हणाले तुम्हाला इथेच थांबावं लागेल. मग आम्ही गाडी बाजूला उभी केली आणि तिथे थांबलो. आमच्याप्रमाणे तिथे खूप लोक होते. नंतर आम्हाला कळलं की धराली गावच मलब्याखाली दबले गेले आहे', असे नायर यांनी सांगितले.

परत आलो तेव्हा स्मशान झाले होते

'आम्ही धरालीमध्ये नाश्ता केला. चहा घेतला. सगळीकडे वर्दळ होती. लोक बाजारात फिरत होती. पण, जेव्हा आम्ही गंगोत्रीवरून परत धराली गावाजवळ आलो, तेव्हा सगळं भयावह दृश्य होतं. सगळीकडे स्मशानासारखी परिस्थिती झाली होती. ती जागा ओळखणंही अवघड झालं होतं. ती जागा खूपच भयंकर दिसत होती', असे ते म्हणाले. 

टॅग्स :RainपाऊसUttarakhandउत्तराखंडDeathमृत्यूlandslidesभूस्खलन