शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

कुटुंब कमकुवत, तेव्हा मूल्ये नष्ट होतात : मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2024 09:22 IST

'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : युवकांना व्यसनांच्या विळख्यापासून वाचवण्याची गरज असून, व्यसन सोडविण्यासाठी कुटुंबांच्या भक्कम पाठिंब्याची आवश्यकता असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. 

'गायत्री परिवारा'तर्फे आयोजित'अश्वमेध यज्ञ' कार्यक्रमाला व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित करताना पंतप्रधान बोलत होते. औषधमुक्त भारत घडविण्यासाठी, मजबूत कुटुंबसंस्था आवश्यक आहे. जेव्हा कुटुंब कमकुवत होते तेव्हा मूल्ये नष्ट होऊ लागतात आणि नंतर त्याचा परिणाम व्यापक होतो. कुटुंब या संकल्पनेच्या महत्त्वावर चर्चा करताना पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा कुटुंबातील सदस्य अनेक दिवस एकमेकांना भेटत नाहीत, तेव्हा धोके निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबे मजबूत करण्याची आणि देशाला व्यसनमुक्त करण्याची गरज आहे. नवमतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

'मन की बात'ला तीन महिने अवकाशआगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीय नीतिमत्तेनुसार पुढील तीन महिने 'मन की बात'चे प्रसारण होणार नाही, असे मोदी म्हणाले, आम्ही पुढच्या वेळी भेटू तेव्हा तो 'मन की बात'चा १११ वा भाग असेल. संख्याशी संबंधित शुभ लक्षात घेऊन, यापेक्षा चांगले काय असू शकते, असे ते म्हणाले, सत्ता कायम ठेवण्याचा विश्वास पंतप्रधानांनी वारंवार व्यक्त केला आहे.

केवळ एका कुटुंबाची प्रगती होण्यासाठी...काँग्रेसने आपली सर्व शक्त्ती केवळ एका कुटुंबाची प्रगती साधण्यावर खर्च केली, असा घणाघात मोदींनी येथे केला, काँग्रेसच्या काळात सर्व प्रकारचे घोटाळे होत होते. गेल्या दहा वर्षात आपल्या सरकारने ते थांबवले आहेत. द्वारका येथे विविध प्रकल्पांचे उ‌द्घाटन व पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. उ‌द्घाटन झालेल्या प्रकल्पांत गुजरातमधील ओखा ते बेट द्वारका या भारतातील सर्वात लांब केबल-स्टेड पुलाचाही समावेश आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी