शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'मियां-बीवी राजी तो क्या करेगा काझी' - SC

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 14:17 IST

दोन सुज्ञ व्यक्ती लग्न करत असतील तर आई-वडील, नातेवाईक, समाज किंवा अन्य कोणालाही त्याबाबत बोलण्याचा किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये

नवी दिल्ली : 'मियां-बीवी राजी तो क्या करेगा काझी' हा हिंदी चित्रपटांमधील प्रसीद्ध डायलॉग नेहमीच आपल्या कानावर येत असतो.  पण आता सर्वोच्च न्यायालयानेही असंच मत व्यक्त केलं आहे. कारण दोन सुज्ञ व्यक्ती जर लग्न करत असतील तर कोणाही तिस-या व्यक्तीला त्याबाबत बोलण्याचा किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. तसंच प्रेमविवाह करणा-या जोडप्यांना संपूर्ण सुरक्षा मिळायला हवी असं एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलं. आई-वडील, नातेवाईक, समाज किंवा अन्य कोणालाही अशा प्रकारच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. लग्नाच्या बाबतीत दखल देण्याचा अधिकार कोणालाही नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. शक्ती वाहिनी नावाच्या एका संघटनेने खाप पंचायत यांसारख्या स्वयंघोषीत न्यायालयांवर बंदी घालावी व ऑनर किलींग सारख्या घटनांना आळा बसावा यासाठी एक याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे स्पष्ट केलं तसंच नैतिकतेचे स्वयंघोषित रक्षक बनू नका, असे कोर्टाने खाप पंचायतींना सुनावले . जर काही बेकायदा कृत्य होत असेल तर न्यायव्यवस्था आणि कायदा त्यावर कारवाई करेल, खाप पंचायतींना तो अधिकार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले.16 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी - या दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार आणि याचिकाकर्त्यांना अशाप्रकारे प्रेमविवाह करणा-या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात त्याबाबत उपाय सुचवण्यास सांगितले आहेत. या जोडप्यांना सुरक्षा देणं हे पोलिसांची जबाबदारी आहे असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.  याबाबत पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला होणार आहे. सुनावणी दरम्यान दिल्लीमध्ये सध्या चर्चेत असलेलं अंकित सक्सेना याच्या खुनाचा मुद्दा आला, पण त्या प्रकरणावर आता सुनावणी सुरू नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय