शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

'मियां-बीवी राजी तो क्या करेगा काझी' - SC

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 14:17 IST

दोन सुज्ञ व्यक्ती लग्न करत असतील तर आई-वडील, नातेवाईक, समाज किंवा अन्य कोणालाही त्याबाबत बोलण्याचा किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये

नवी दिल्ली : 'मियां-बीवी राजी तो क्या करेगा काझी' हा हिंदी चित्रपटांमधील प्रसीद्ध डायलॉग नेहमीच आपल्या कानावर येत असतो.  पण आता सर्वोच्च न्यायालयानेही असंच मत व्यक्त केलं आहे. कारण दोन सुज्ञ व्यक्ती जर लग्न करत असतील तर कोणाही तिस-या व्यक्तीला त्याबाबत बोलण्याचा किंवा त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये असं स्पष्ट मत सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलं आहे. तसंच प्रेमविवाह करणा-या जोडप्यांना संपूर्ण सुरक्षा मिळायला हवी असं एका याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी स्पष्ट केलं. आई-वडील, नातेवाईक, समाज किंवा अन्य कोणालाही अशा प्रकारच्या घटनांमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही. लग्नाच्या बाबतीत दखल देण्याचा अधिकार कोणालाही नाही असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. शक्ती वाहिनी नावाच्या एका संघटनेने खाप पंचायत यांसारख्या स्वयंघोषीत न्यायालयांवर बंदी घालावी व ऑनर किलींग सारख्या घटनांना आळा बसावा यासाठी एक याचिका दाखल केली आहे. त्यावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने हे स्पष्ट केलं तसंच नैतिकतेचे स्वयंघोषित रक्षक बनू नका, असे कोर्टाने खाप पंचायतींना सुनावले . जर काही बेकायदा कृत्य होत असेल तर न्यायव्यवस्था आणि कायदा त्यावर कारवाई करेल, खाप पंचायतींना तो अधिकार नाही, असेही कोर्टाने स्पष्ट केले.16 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी - या दरम्यान न्यायालयाने केंद्र सरकार आणि याचिकाकर्त्यांना अशाप्रकारे प्रेमविवाह करणा-या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात त्याबाबत उपाय सुचवण्यास सांगितले आहेत. या जोडप्यांना सुरक्षा देणं हे पोलिसांची जबाबदारी आहे असंही न्यायालयाने स्पष्ट केलं.  याबाबत पुढील सुनावणी 16 फेब्रुवारीला होणार आहे. सुनावणी दरम्यान दिल्लीमध्ये सध्या चर्चेत असलेलं अंकित सक्सेना याच्या खुनाचा मुद्दा आला, पण त्या प्रकरणावर आता सुनावणी सुरू नसल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय