शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
2
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
3
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
4
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
5
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
6
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
7
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
8
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
9
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
10
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
11
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
12
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
13
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
14
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
15
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
16
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
17
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
18
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
19
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
20
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी

Wheat ban: गहू निर्यातीवर सरकारनं घातली बंदी; जाणून घ्या शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 10:10 IST

जानेवारी २०१० पासून पिठाच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ९ मे रोजी देशात एक किलो पिठाची सरासरी किंमत ३२.९१ रुपये होती. केवळ एका वर्षात एक किलो मैद्याच्या दरात चार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

नवी दिल्ली - भारताने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. देशात गव्हाचे संकट असल्याने ही बंदी घालण्यात आल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सरकारी योजनांसाठीही गहू कमी येण्याची शक्यता असल्याचा दावा केला जात आहे. गव्हाची निर्यात करून भारत जगाचे पोट भरत असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते आणि त्यानंतर अचानक दोन दिवसांपूर्वी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्याचा संबंध गव्हाच्या संकटाशी जोडला जात आहे.

गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्याने प्रश्नचिन्ह

गव्हाच्या कमी उत्पादनाचा अंदाज वर्तवण्यात विलंब झाला का? गव्हाच्या सरकारी खरेदीत वाढ झाली नाही का? याआधी जगातील सर्व देशांमध्ये गहू निर्यात करण्याची घाई होती का? गव्हाच्या निर्यातीवर बंदी आल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे का आणि गव्हाची निर्यात बंद करूनही पीठ-बिस्किट-ब्रेडची भाववाढ थांबणार नाही का? असे विविध प्रश्न सरकारच्या निर्णयामुळे तयार झाले आहेत.

२०१० नंतर पिठाचे भाव गगनाला भिडले

जानेवारी २०१० पासून पिठाच्या किमती विक्रमी पातळीवर आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ९ मे रोजी देशात एक किलो पिठाची सरासरी किंमत ३२.९१ रुपये होती. केवळ एका वर्षात एक किलो मैद्याच्या दरात चार रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. मुंबईसह अनेक ठिकाणी एक किलो पीठ ४९ रुपये किलोवर पोहोचल्याचा दावा करण्यात आला. अशा स्थितीत देशातील गहू आणि पिठाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने रविवारी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यानंतर देशात सर्वाधिक गहू पिकवणाऱ्या पंजाब आणि हरियाणातील शेतकरीच प्रश्न उपस्थित करू लागले.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

गव्हाच्या निर्यातीवर बंदी आल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फटका बसला आहे. प्रत्यक्षात दुष्काळामुळे धान्याचा आकार कमी झाला. पीक कमी झाले आणि आता निर्यातीवर बंदी आली, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल ४०० रुपयांचे नुकसान होत आहे. कृषी तज्ज्ञ देवेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना हवामानाचा फटका बसला आहे, मार्चमध्ये तापमानात वाढ झाल्यामुळे नुकसान झाले आहे. एकरी पाच क्विंटलचे नुकसान झाल्याची माहिती आहे. हरियाणातही असेच झाले असून, देशातील उत्पादनातही हाच तोटा दिसून आला आहे.

सरकारला किती गरज आहे?

केंद्र सरकारला PDS अंतर्गत गरजूंना अन्नधान्य देण्यासाठी २६ दशलक्ष टन गव्हाची गरज आहे. तसेच, एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेसाठी ५.४ दशलक्ष टन गव्हाची गरज आहे. तर यावर्षी १४ मे पर्यंत केवळ १८ दशलक्ष टन गहू शासकीय गोदामात खरेदी करण्यात आला आहे. गेल्या वर्षी सरकारने ३७ दशलक्ष टन गहू खरेदी केला होता. म्हणजेच यंदा शासकीय गोदामात कमी गहू आला आहे. कारण सरकारी एजन्सीऐवजी व्यापाऱ्यांनी २०१५ रुपये प्रति क्विंटल एमएसपीपेक्षा जास्त रक्कम देऊन आधीच शेतकऱ्यांकडून गहू खरेदी केल्याचे बोलले जात आहे.

सरकार काय पावले उचलत आहे?

जून ते सप्टेंबर दरम्यान आठ राज्यांमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत गव्हाचा पुरवठा बंद करून त्या जागी तांदूळ दिला जाईल. यासोबतच गहू उत्पादक ६ मोठ्या राज्यांमध्ये गव्हाच्या सरकारी खरेदीची मर्यादा ३१ मे पर्यंत वाढवण्यात आली आहे. सरकारी खरेदीत दिसणाऱ्या गव्हाचा दर्जाही शिथिल करण्यात आला असून १३ मेपासून गव्हाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी