शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Fact Check : कोरोनाच्या संकटात मोदी सरकार सर्वांना देणार 4000 रुपये?; जाणून घ्या 'त्या' मेसेजमागचं नेमकं 'सत्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 20:14 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनाच्या संकटात लोकांसाठी विविध योजना लाँच करण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 4,00,312 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,04,58,251 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 46,617 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 853 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात लोकांसाठी विविध योजना लाँच करण्यात आल्या आहेत. तसेच सरकारच्या वतीने गरजुंना, गरिबांना मदत करण्यात येत आहे. अनेक स्वयंसेवी संस्थांनीही लोकांना मदतीचा हात दिला आहे. अशातच सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवणारे मेसेज हे व्हायरल होत आहेत. असाच एक मेसेज सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये कोरोना केअर फंडमधून सर्वांना 4000 रुपये देण्यात येणार आहेत. खाली देण्यात आलेला फॉर्म भरून अर्ज करा आणि 4000 रुपये मिळवा असं म्हटलं आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो देखील वापरण्यात आला आहे. प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने (Press Information Bureau) व्हायरल होणारा हा मेसेज खोटा असल्याचं म्हटलं आहे. तसेच असून केंद्र सरकारने अशाप्रकारची कोणतीही घोषणा केलेली नाही असं स्पष्टीकरण पीआयबीने दिलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. असाच एक मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमुळे लोकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवरच सध्या पुन्हा एकदा देशभरात संपूर्ण लॉकडाऊनची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबतचे अनेक मेसेजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका न्यूज चॅनलचा स्क्रीनशॉट आहे. यामध्ये देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे 1 जुलै ते 31 जुलै कडक लॉकडाऊन असंही यात लिहिण्यात आलं आहे. मात्र 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान देशात संपूर्ण लॉकडाऊन लागू होत असल्याचं वृत्त खोटं असल्याचं आता समोर आलं आहे.

धोका कायम! कोरोनाचा वेग मंदावताना देशातील 'या' 6 राज्यांनी वाढवलं टेन्शन; तज्ज्ञांची टीम रवाना

देशातील सहा राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये तज्ज्ञांच्या विशेष टीम रवाना केल्या आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं आणि उपाययोजनांसाठी या टीम पाठवण्यात आल्या आहेत. केरळ, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मणिपूर, ओडिशा, आणि छत्तीसगडचा यात समावेश आहे. विशेष टीम राज्यांमध्ये कोरोना व्यवस्थापन, देखरेख, कंटेन्मेंटची प्रक्रिया आणि टेस्टिंग सारख्या बाबी पाहणार आहे. केंद्रीय टीम या राज्यांमधील कोविड स्थितीचे मूल्यांकन करतील आणि आवश्यक उपयायोजना सुचवतील, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीMONEYपैसा