शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

रेल्वेस्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासून उंची का लिहिलेली असते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 11:53 IST

समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते.

मुंबई- रेल्वेच्या प्रवासात तुम्ही प्रत्येक स्थानकाच्या दोन्ही बाजूस पिवळे फलक पाहिले असतील. त्यामध्ये साधारणतः तीन लिप्यांमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. ते स्थानक ज्या राज्यात आहे तेथील भाषेच्या लिपीमध्ये, देवनागरी म्हणजे हिंदीसाठी वापरली जाणारी लिपी आणि रोमन म्हणजे इंग्रजीसाठी वापरल्या जाणाऱ्या लिपीमध्ये त्या स्थानकाचे नाव लिहिलेले असते. त्याचप्रमाणे तेथे त्या स्थानकाची समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते.समुद्रसतहसे 500 मीटर उपर किंवा 500 एमएसएल असे तेथे लिहिलेले आपण अनेकदा पाहिलेले असते. ही उंची संबंधित स्थानकानुसार बदलत असते. भारतामध्ये रेल्वे सुरु होऊन दिडशे वर्षे उलटली आहेत. त्याकाळामध्ये स्थानकांचे काम करताना त्यांची समुद्रसपाटीपासून उंची मोजलेली असे. ही उंची नमूद करुन ठेवल्यामुळे रेल्वेरुळ टाकताना त्याचा उपयोग रेल्वेखात्याला होत असे. उंची समजल्यामुळे पावसाळ्यात ते पाण्याखाली जातील का? पूर आल्यास ते पाण्याखाली जातील का? तसेच समुद्राजवळील रेल्वेमार्गावर पाणी येईल का याचा अंदाज खात्याला येत. कालांतराने नव्या स्थानकांच्या फलकांवर अशी उंची लिहिणं बंद झाले आहे. परंतु त्याचा अपयोग खात्याच्या अंतर्गत कामांसाठी केला जातो. आजही या उंचीचा उपयोग खात्याला होतो.उदाहरणार्थ एखादे स्थानक 300 मीटर उंचीवर असेल आणि त्यापुढचे स्थानक 500 मीटर उंचीवर असेल तर दोन्ही स्थानकांमध्ये रुळ टाकताना आपल्याला आधीच्या स्थानकापेक्षा उंचावर रुळ टाकायचे आहेत याचा अंदाज रेल्वेला येतो. त्याचप्रमाणे नव्या रुळांवर येणारी वळणे किंवा तेथिल प्रदेशानुसार आखणी करण्याबाबत नियोजन करता येते.

टॅग्स :railwayरेल्वे