शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2018 10:20 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्ली -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या मुखर्जी यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची गोची झाली असून, 7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात मुखर्जी नेमके काय बोलणार याची चिंती काँग्रेसला लागली आहे.  7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांना स्वत: निमंत्रित केले होते. हे निमंत्रण मुखर्जी यांनी स्वीकारल्याने आता प्रणव मुखर्जी आणि सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावर येणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष या कार्यक्रमाकडे असेल.  मात्र संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीकाही होत आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीका केली आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या घटनाक्रमाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले असून, त्यांच्याकडून संघाच्या कार्यक्रमाची वाट पाहिली जात आहे. याबाबत विचारणा केली असता काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनीही याबाबत अधिक बोलणे टाळले. मात्र काँग्रेस आणि संघाच्या विचारसरणीमध्ये मोठी तफावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे अन्य एक वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, "मुखर्जी यांनी राष्ट्रपती बनल्यानंतर राजकारण सोडले आहे. आता कोणत्याही समारंभात त्यांचे बोलणे हे त्यांच्या भूमिकेबाबतचा संकेत असू शकत नाही. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीदरम्यान जे राजकीय मानदंड स्थापित केले त्यावरून त्यांच्या योगदानाचे मूल्यांकन केले गेले पाहिजे." दरम्यान,  प्रणव मुखर्जींचे निकटवर्तीय असलेल्यांचे म्हणणे आहे की, माजी राष्ट्रपती या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांना राष्ट्रवादाच्या खऱ्या व्याख्येची ओळख करून देऊ शकतात. अशा परिस्थितीत मुखर्जी यांचे भाषण हिंदुत्ववाद्यांच्या राष्ट्रवादाच्या एकांगी व्याख्येवर टीका करणारेही असू शकते. मात्र असे असले तरी प्रणव मुखर्जी यांची संघाच्या कार्यक्रमातील उपस्थिती काँग्रेस आणि सेक्युलर विचारांसाठी धक्का असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे.   

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतPoliticsराजकारण