शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी काय बोलणार? काँग्रेसला चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:20 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्ली -  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्ग समारोपाच्या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे मुख्य अतिथी म्हणून राहणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या मुखर्जी यांच्या निर्णयामुळे काँग्रेसची गोची झाली असून, 7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात मुखर्जी नेमके काय बोलणार याची चिंती काँग्रेसला लागली आहे.  7 जून रोजी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रणव मुखर्जी यांना स्वत: निमंत्रित केले होते. हे निमंत्रण मुखर्जी यांनी स्वीकारल्याने आता प्रणव मुखर्जी आणि सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हे एकाच मंचावर येणार आहेत. एकेकाळी कॉंग्रेसचे दिग्गज नेते राहिलेले मुखर्जी संघाच्या कार्यक्रमात येणार असल्याचे निश्चित झाल्यामुळे संपूर्ण देशाच्या राजकारणाचे लक्ष या कार्यक्रमाकडे असेल.  मात्र संघाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच्या प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीकाही होत आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी प्रणव मुखर्जींच्या निर्णयावर टीका केली आहे. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने या घटनाक्रमाबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणे टाळले असून, त्यांच्याकडून संघाच्या कार्यक्रमाची वाट पाहिली जात आहे. याबाबत विचारणा केली असता काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडक्कन यांनीही याबाबत अधिक बोलणे टाळले. मात्र काँग्रेस आणि संघाच्या विचारसरणीमध्ये मोठी तफावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसचे अन्य एक वरिष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, "मुखर्जी यांनी राष्ट्रपती बनल्यानंतर राजकारण सोडले आहे. आता कोणत्याही समारंभात त्यांचे बोलणे हे त्यांच्या भूमिकेबाबतचा संकेत असू शकत नाही. प्रणव मुखर्जी यांनी आपल्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीदरम्यान जे राजकीय मानदंड स्थापित केले त्यावरून त्यांच्या योगदानाचे मूल्यांकन केले गेले पाहिजे." दरम्यान,  प्रणव मुखर्जींचे निकटवर्तीय असलेल्यांचे म्हणणे आहे की, माजी राष्ट्रपती या कार्यक्रमात संघाच्या स्वयंसेवकांना राष्ट्रवादाच्या खऱ्या व्याख्येची ओळख करून देऊ शकतात. अशा परिस्थितीत मुखर्जी यांचे भाषण हिंदुत्ववाद्यांच्या राष्ट्रवादाच्या एकांगी व्याख्येवर टीका करणारेही असू शकते. मात्र असे असले तरी प्रणव मुखर्जी यांची संघाच्या कार्यक्रमातील उपस्थिती काँग्रेस आणि सेक्युलर विचारांसाठी धक्का असल्याचे काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे.   

टॅग्स :Pranab Mukherjeeप्रणव मुखर्जीcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतPoliticsराजकारण