शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
2
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
3
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
4
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
5
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
6
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
7
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
8
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
9
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
10
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
11
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
12
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
13
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
14
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
15
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
16
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
17
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
18
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
19
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
20
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जर राज्यांनी CAA लागू केला नाही तर केंद्र सरकार काय करणार? अमित शाह यांनी कायदाच समजावून सांगितला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 12:25 IST

यावेळी, केरल, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने म्हटले आहे की आम्ही आमच्या राज्यात सीएए लागू होऊ देणार नाही. त्यांच्या जवळ असा अधिकार आहे? ते असे करू शकता? असा प्रश्न विचारला असता शाह म्हणाले...

देशातील विरोधीपक्ष, नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थाता CAA  संदर्भात सातत्याने भाष्य करत आहेत आणि या कायद्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. यातच तीन मुख्यमंत्र्यांनी तर आपण आपल्या राज्यात CAA लागू होऊ देणार नाहीत, असे म्हटले आहे. यासंदर्भात, एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गृहमंत्री अमित शहा म्हणाले, "निवडणुकीपर्यंत आंदोलन सुरू आहे, त्यानंतर सर्व राज्ये CAA वर सहकार्य करतील. सीएएची अंमलबजावणी रोखण्याचा अधिकार राज्यांना नाही. या प्रक्रियेशी संबंधित सर्व कामकाज भारत सरकारशी संबंधित अधिकारीच पूर्ण करतील."

यावेळी, केरल, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालने म्हटले आहे की आम्ही आमच्या राज्यात सीएए लागू होऊ देणार नाही. त्यांच्या जवळ असा अधिकार आहे? ते असे करू शकता? असा प्रश्न विचारला असता शाह म्हणाले, "त्यांनाही माहीत आहे की, अधिकार नाहीत. संविधानाच्या कलम 11 मध्ये नागरिकत्वासंदर्भात कायदे करण्याचा अधिकार केवळ भारताच्या संसदेला देण्यात आला आहे. हा केंद्राचा विषय आहे. केंद्र आणि राज्यांचा संयुक्त विषय नाही. यामुळे नागरिकत्वासंदर्भातील कायदा आणि कायद्याची अंमलबजावणी या दोन्ही बाबी आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 246/1 नुसार अनुसूची 7 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. याचे सर्व अधिकार केंद्र सरकारला देण्यात आले आहेत."

यावर, व्हेरिफिकेशन, चेकिंग आदी काम ग्राउंडवर होईल आणि तते सर्व राज्य सरकारेच पूर्ण करतील? असे विचारले असता, शाह म्हणाले, "कसलं व्हेरिफिकेशन करायचंय? ते सर्व काही मुलाखतीत सांगतील, की आम्ही बांगलादेशातून आलो आहोत. आपले जुने दस्तऐवजही दाखवतील. ती मुलाखत राज्यातही होऊ शकतो. मात्र हे काम भारत सरकार करेल." यानंतर, अर्थात कोऑपरेशनची आवश्यकता नाही, कारण हे करायचेच आहे? असे विचारले असता शाह म्हणाले, "मला असे वाटते की, निवडणुकीनंतर सर्वच पक्ष कोऑपरेट करतील. ते पॉलिटिक्ससाठी चुकीचा प्रचार  करत आहेत. हे अपीसमेंटचे राजकारण आहे.

नागरिकत्व कायद्यात कोणाचेही नागरिकत्व हिसकावून घेण्याची कोणतीही तरतूद नसल्याचे शाह यांनी आश्वासन दिले. 'सीएएच्या माध्यमातून भाजप नवी व्होट बँक तयार करत आहे' या विरोधकांच्या आरोपावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, 'विरोधकांकडे दुसरे काम नाही, त्यांचा इतिहास असा आहे की, ते जे बोलतात ते करत नाहीत. पीएम मोदींची प्रत्येक हमी पूर्ण आहे. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमध्ये राजकीय फायदा आहे, मग आम्ही दहशतवादावर कारवाई करू नये? कलम ३७० हटवणं हेही आमच्या राजकीय फायद्यासाठी होतं असंही ते म्हणाले. आम्ही कलम ३७० हटवू असे १९५० पासून सांगत आहोत, असंही अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी