शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा...! ८ दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
2
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
3
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
4
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
5
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
6
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
7
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
8
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
9
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
10
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
11
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं
12
जेपी इन्फ्राटेकचे एमडी मनोज गौर यांना अटक; १२,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराचा आहे आरोप
13
डॉलरसमोर रुपयाची मोठी घसरण! तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होईल? बाजारात काय स्थिती?
14
Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती
15
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
16
विसरभोळे प्रवासी! ‘इतक्या’ कोटींच्या वस्तू रेल्वेत विसरले, रोज घेता येईल मोठी कार; पाहा, आकडा
17
Court: भटक्या कुत्र्यांमुळे संसारात विघ्न; पत्नीच्या एका सवयीमुळे पतीचा घटस्फोटासाठी अर्ज, नेमकं प्रकरण काय? 
18
आधीच BCCIची रोहित शर्माला 'वॉर्निंग'; त्यात आता MCAच्या 'त्या' विधानाने वाढवलं 'टेन्शन'
19
Groww Share Price Today : Groww च्या शेअर्सची दुसऱ्या दिवशीही जोरदार घोडदौड! गुंतवणूकदारांना ५०% हून अधिक फायदा, केलं मालामाल
20
Bhagvadgeeta: कोणतेही काम एका झटक्यात पूर्ण व्हावे, यासाठी 'हा' श्लोक २१ वेळा म्हणा!

कशी असेल करुणानिधी आणि जयललिता यांच्या पश्चात तामिळ राजकारणाची दिशा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2018 11:17 IST

गेल्या काही दशकांमध्ये तामिळी अस्मितेच्या राजकारणाबरोबर इतर अनेक विषयही जोडले गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर या राजकारणाची दिशा कशी असेल हे पाहाणे आवश्यक आहे.

चेन्नई- द्राविडी चळवळीतील अत्यंत महत्त्वाचे नेते असणाऱ्या करुणानिधी यांनी काल संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने गेली सलग सहा दशके तामिळ राजकारणाची दिशा ठरवणारा एक अग्रगण्य नेताच तामिळनाडूने गमावला आहे. गेल्या काही दशकांमध्ये तामिळी अस्मितेच्या राजकारणाबरोबर कावेरी पाणीवाटप, श्रीलंकेत तमिळ मच्छिमारांना अटक होणे, दुष्काळ असे इतर अनेक विषयही जोडले गेले आहेत. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर या राजकारणाची दिशा कशी असेल हे पाहाणे आवश्यक आहे.

तामिळनाडूच्या या विधानसभेचे वैशिष्ट्य म्हणजे या विधानसभेच्या कार्यकाळातच द्रमुक आणि अण्णाद्रमुक पक्षाचे नेते म्हणजे करुणानिधी आणि जयललिता यांचे निधन झाले. नेते गेल्यामुळे संबंधित पक्षांमध्ये एकप्रकारची पोकळीही निर्माण झाली आहे. त्यातच 2014 च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाने पी. राधाकृष्णन यांच्यारुपाने तामिळनाडूतील एक लोकसभेची जागा मिळवली आहे. अभिनेता रजनीकांत यांनी राजकारणात केलेला प्रवेश तसेच कमल हसन यांनी राजकीयदृष्ट्या कार्यरत होणे द्रमुक, अण्णाद्रमुकला चिंता करायला लावणारे आहे.

करुणानिधी यांच्यानंतर द्रमुक पक्षाचे नेते म्हणून स्टॅलिन यांच्याकडे पाहिले जाते. मात्र गेल्या चार वर्षांमध्ये राजकीय पातळीवर द्रमुकला एकापाठोपाठ एक धक्के सहन करावे लागले आहेत. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला. 2016च्या विधानसभा निवडणुकीतही जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाने द्रमुकला मोठा धक्का देत सत्तेमध्ये प्रवेश केला. जयललिता यांच्या निधनानंतर आर. के. नगर येथे झालेल्या पोटनिवडणुकीत द्रमुकच्या उमेदवाराचे डिपॉझिटही जप्त झाले.

जयललिता यांच्या पश्चात शशिकला यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याऐवजी कारागृहात जावे लागले. तर मुख्यमंत्रीपद पलानीस्वामी यांच्याकडे आले. सुरुवातीचा गोंधळाचा काळ सोडल्यास अण्णाद्रमुकने आपले पाय पुन्हा रोवायला सुरुवात केली आहे. आर. के नगर च्या पोटनिवडणुकीमध्ये टीटीव्ही दिनकरन यांच्यारुपाने एक लोकप्रिय नेताही अण्णाद्रमुकला मिळाला. तसेच अण्णाद्रमुकने केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकारशीही जुळवून घ्यायला सुरुवात केली आहे. अर्थात टीटीव्ही दिनकरन आणि पलानीस्वामी, ओ.पी. पनीरसेल्वन यांच्यामध्ये मतभेद झाल्यास अण्णाद्रमुकमध्येही बेबनाव होऊ शकतो.

स्टॅलिन यांचे भाऊ अळगिरी हे करुणानिधींच्या हयातीतच नेतृत्वाला आव्हाने देत होते. स्वतंत्र निर्णय घेण्याच्या स्वभावाने अळगिरी यांनी करुणानिधींची नाराजीही ओढावून घेतली. आता करुणानिधींच्या पश्चात ते कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागेल. तर स्टॅलिन यांची बहिण कनिमोळी, माजी केंद्रीय मंत्री ए. राजा व दयानिधी मारन हे दुसऱ्या फळीतील नेते स्टॅलिन यांना आव्हान देतील अशी स्थिती नाही. राज्यात स्टॅलिन आणि केंद्रात कनिमोळी अशी राजकारणाची स्वच्छ विभागणी झाल्याचे येथे दिसते.

टॅग्स :KarunanidhiकरुणानिधीDravid Munnetra Kazhagamद्रविड मुनेत्र कझागमAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम