शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

'आपण जे गमावले, ते लवकरच परत मिळवू', नाव न घेता अमित शाहांचे Pok वर भाष्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:31 IST

Amit Shah On Pok: 'सूफी, बौद्ध आणि शैल मठांनी काश्मीरमध्ये विकास केला. 8,000 वर्षे जुन्या प्राचीन ग्रंथांत उल्लेख.'

Amit Shah At Book Launch : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरबाबत एक मोठे विधान केले आहे. आज, (02 जानेवारी, 2025) दिल्ली येथे 'जम्मू-काश्मीर आणि लडाख: हिस्टोरिकल अकाउंट ऑफ कंटिन्युटी अँड कनेक्टिव्हिटी' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात बोलताना त्यांनी कलम 370 आणि दहशतवादावर प्रतिक्रिया दिली. तसेच, अप्रत्यक्षपणे पाकव्याप्त काश्मीरही लवकरच भारताचा भाग होईल, असे विधान केले.

अमित शाह म्हणतात, ब्रिटिशांच्या काळात लिहिलेल्या इतिहासाची व्याख्याच चुकीचा होती. संपूर्ण जगाशी भारताचे संस्कृतीचे नाते आहे. या देशाकडे फक्त भूराजकीय दृष्टिकोनातून पाहणाऱ्यांना देशाने, भारताची व्याख्या करू नये. काश्मीरमध्ये जी कला, वाणिज्य आणि संस्कृती होती, ती हळूहळू संपूर्ण भारतात पसरली गेली, ती आजही भारताचा अविभाज्य भाग होती आणि कायम राहील.

370 ने दहशतवादाची बीजे पेरलीमोदी सरकारने कलम 370 रद्द करण्याचे काम केले. या 370 ने काश्मीरमध्ये दहशतवाद आणि फुटीरतावादाची बीजे पेरली. 370 हटवल्यानंतर दहशतवादी घटना कमी झाल्या. खोऱ्यातील दहशतवादाची परिसंस्था उद्ध्वस्त झाली. अनेकदा लोक मला विचारतात की, कलम 370 आणि दहशतवादाचा काय संबंध आहे? त्यांना कदाचित माहित नसेल की, कलम 370 नेच खोऱ्यातील तरुणांच्या मनात फुटीरतावादाची बीजे पेरण्याचा प्रयत्न केला. देशाच्या इतर भागात दहशतवाद का आला नाही? गुजरात आणि पंजाब पाकिस्तानला लागून आहेत.

कलम 370 ने भारत आणि काश्मीरमधील संबंध तात्पुरते असल्याचा गैरसमज पसरवण्याचे काम केले. यामुळे अलिप्ततावादाची बीजे पेरली गेली आणि पुढे त्याचे रूपांतर दहशतवादात झाले. 40 हजारांहून अधिक लोक बळी पडले. कलम 370 हटवल्यानंतर दहशतवादात 70 टक्क्यांहून अधिक घट झाली. 370 हा दहशतवादाचा स्रोत होता हे सिद्ध करते, असेही शाह यावेळी म्हणाले.

आम्ही जे गमावले, ते लवकरच परत मिळवूपीओकेचे नाव न घेता गृहमंत्री म्हणाले, आजकाल काश्मीरमध्ये विकास होताना दिसत आहे आणि मला याचा आनंद आहे. मला विश्वास आहे की आपण जे काही गमावले आहे, ते लवकरात लवकर परत मिळेल. केवळ भौतिक विकासच नाही, तर काश्मीरची सांस्कृतिक उंचीही लवकरच गाठली जाईल. काश्मीरचे नाव कश्यप होऊ शकते. शंकराचार्यांचा उल्लेख, रेशीम मार्ग, हेमिष मठ यावरून काश्मीरमध्येच भारताच्या संस्कृतीचा पाया घातला गेला होता, हे सिद्ध होते. सूफी, बौद्ध आणि शैल मठांनी काश्मीरमध्ये विकास केला.  8,000 वर्षे जुन्या प्राचीन ग्रंथांत जम्मू-काश्मीर आणि लडाखचा उल्लेख आहे, असेही शाह यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद