शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
5
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
6
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
7
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
8
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
9
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
10
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
11
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
12
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
13
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
14
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
15
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
16
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
17
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
18
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
19
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
20
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

13 वर्षांमध्ये ममतांचा यू टर्न; घुसखोरांना विरोध करत लोकसभेत भिरकावले होते कागद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 11:48 IST

एकेकाळी घुसखोरांना विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आता अचानक भूमिका बदलली आहे.

नवी दिल्ली- आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मसुदा प्रकाशित होताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करत या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ममतांच्या या वक्तव्यांमुळे त्यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आसाममधील बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी 13 वर्षांपूर्वी एकदम वेगळी भूमिका घेतली होती. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी घुसखोरांना विरोध केला होता. मात्र आता अचानक त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेत घुसखोरांवर कारवाई चालणार नाही अशी वक्तव्ये सुरु केली आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये नागरिकत्व नोंदणीचा मसुदा स्थापन केल्यावर भारतात यादवी युद्ध पेटेल आणि रक्ताच्या अंघोळी घातल्या जातील असे टोकाचे विधानही केले आहे. त्यांनी अशाचप्रकारे नाट्यमय वर्तन 13 वर्षांपूर्वी केले होते. मात्र तेव्हा त्यांनी घुसखोरांना विरोध केला होता. त्यावेळेस लोकसभेच्या खासदार असणाऱ्या ममता यांना बंगालमध्ये बांगलादेशी नागरिकांनी घुसणे संकट वाटत होते आणि बांगलादेशींचे मतदार यादीत घुसणे त्यांना आपत्तीजनक वाटत होते.याबाबत ममता बॅनर्जी यांनी या "अत्यंत गंभीर मुद्द्यावर" चर्चा करण्यासाठी लोकसभेत प्रस्ताव मांडला होता. मात्र लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. सोमनात चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते आणि त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार होते. यामुळेच त्यांनी आपला प्रस्ताव स्वीकारला नाही व पक्षपाती भूमिका घेतली असा आरोप करत ममता यांनी संतप्त व अत्यंत मोठ्या आवाजात लोकसभेत बोलायला सुरुवात केली. यावेळेस तालिका सभापती (अधिकारी) चरणजित सिंग अटवाल सभागृहाचे संचलन करत होते. संतप्त ममतांनी अत्यंत आक्रस्ताळी भूमिका घेत अटवाल यांच्या दिशेने कागद भिरकावून तितक्याच मोठ्या आवाजात आरोप करत सभागृह सोडले होते आणि आपल्या पदाचा राजीनामाही दिला. ममतांच्या नाट्यमय भूमिकेने संपूर्ण सभागृह हादरुन गेले होते.

मात्र योग्य मसुद्यामध्ये राजीनामा नसल्याने सोमनाथ चॅटर्जी यांनी तो स्वीकारला नव्हता. आज ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेत आमूलाग्र बदल झालेला आहे. आसामपाठोपाठ पश्चिम बंगालमधील घुसखोरांचा मुद्दा ऐरणीवर येईल तसेच रोहिंग्यांच्या बाबतीतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच ममता यांनी आपल्या मूळ भूमिकेवर यू टर्न घेत एकापाठोपाठ एक वक्तव्ये करायला सुरुवात केली आहे.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीLoksabhaलोकसभाRohingyaरोहिंग्याAssamआसाम