शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

13 वर्षांमध्ये ममतांचा यू टर्न; घुसखोरांना विरोध करत लोकसभेत भिरकावले होते कागद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 11:48 IST

एकेकाळी घुसखोरांना विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आता अचानक भूमिका बदलली आहे.

नवी दिल्ली- आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा मसुदा प्रकाशित होताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रक्षोभक वक्तव्ये करत या प्रकरणामध्ये उडी घेतली आहे. ममतांच्या या वक्तव्यांमुळे त्यांच्याविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आसाममधील बांगलादेशी घुसखोरांना परत पाठवण्याला विरोध करणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी 13 वर्षांपूर्वी एकदम वेगळी भूमिका घेतली होती. यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी घुसखोरांना विरोध केला होता. मात्र आता अचानक त्यांनी सरकारविरोधी भूमिका घेत घुसखोरांवर कारवाई चालणार नाही अशी वक्तव्ये सुरु केली आहेत. 

ममता बॅनर्जी यांनी आसाममध्ये नागरिकत्व नोंदणीचा मसुदा स्थापन केल्यावर भारतात यादवी युद्ध पेटेल आणि रक्ताच्या अंघोळी घातल्या जातील असे टोकाचे विधानही केले आहे. त्यांनी अशाचप्रकारे नाट्यमय वर्तन 13 वर्षांपूर्वी केले होते. मात्र तेव्हा त्यांनी घुसखोरांना विरोध केला होता. त्यावेळेस लोकसभेच्या खासदार असणाऱ्या ममता यांना बंगालमध्ये बांगलादेशी नागरिकांनी घुसणे संकट वाटत होते आणि बांगलादेशींचे मतदार यादीत घुसणे त्यांना आपत्तीजनक वाटत होते.याबाबत ममता बॅनर्जी यांनी या "अत्यंत गंभीर मुद्द्यावर" चर्चा करण्यासाठी लोकसभेत प्रस्ताव मांडला होता. मात्र लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही. सोमनात चॅटर्जी हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते होते आणि त्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये डाव्यांचे सरकार होते. यामुळेच त्यांनी आपला प्रस्ताव स्वीकारला नाही व पक्षपाती भूमिका घेतली असा आरोप करत ममता यांनी संतप्त व अत्यंत मोठ्या आवाजात लोकसभेत बोलायला सुरुवात केली. यावेळेस तालिका सभापती (अधिकारी) चरणजित सिंग अटवाल सभागृहाचे संचलन करत होते. संतप्त ममतांनी अत्यंत आक्रस्ताळी भूमिका घेत अटवाल यांच्या दिशेने कागद भिरकावून तितक्याच मोठ्या आवाजात आरोप करत सभागृह सोडले होते आणि आपल्या पदाचा राजीनामाही दिला. ममतांच्या नाट्यमय भूमिकेने संपूर्ण सभागृह हादरुन गेले होते.

मात्र योग्य मसुद्यामध्ये राजीनामा नसल्याने सोमनाथ चॅटर्जी यांनी तो स्वीकारला नव्हता. आज ममता बॅनर्जी यांच्या भूमिकेत आमूलाग्र बदल झालेला आहे. आसामपाठोपाठ पश्चिम बंगालमधील घुसखोरांचा मुद्दा ऐरणीवर येईल तसेच रोहिंग्यांच्या बाबतीतही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याआधीच ममता यांनी आपल्या मूळ भूमिकेवर यू टर्न घेत एकापाठोपाठ एक वक्तव्ये करायला सुरुवात केली आहे.

 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीLoksabhaलोकसभाRohingyaरोहिंग्याAssamआसाम