शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:32 IST

काँग्रेस सत्तेत नाही, पक्षाकडे पैसा नाही; तरीही भाजपने काँग्रेसमधल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत घेण्यासाठी धडपड चालवली आहे. ही बेचैनी कसली?

अभिलाष खांडेकर, रोविंग एडिटर, लोकमत समूह

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या इतिहासात आज आहे इतकी कमजोर, दिशाहीन, निर्धन, नेतृत्वहीन कधीही नव्हती. दिल्लीत काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत काँग्रेस अस्तित्वासाठी झगडते आहे. १९४७ पासून सातत्याने देशावर राज्य करणारा हा पक्ष आता अनेक राज्यांत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष झाला आहे. भ्रष्टाचार, अंतर्गत कलह, नेहरू-गांधी परिवारावर टोकाचे अवलंबित्व, नव्या गोष्टींना नकार ही पक्षाच्या पतनाची प्रमुख कारणे. भविष्य चिंताजनक आहे. कारण या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची  खरीद-फ़रोख़्त  कधी नव्हती एवढी वाढली आहे. त्याचे श्रेय आक्रमक भाजपच्या रणनीतीचे! 

दहा वर्षांपूर्वी दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर लगेच सत्तारूढ पक्षाने भारत काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प सोडला. काँग्रेसने ही गोष्ट हसण्यावारी नेली; परंतु भाजप गांभीर्याने काम करत राहिला. २०१८ मध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये विजय मिळाल्यामुळे काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला हे खरे; पण २०२३ मध्ये तिथेही पक्षाला पराभव पाहावा लागला. कर्नाटकात आणि अगदी अलीकडे तेलंगणात पक्षाला यश मिळाले. संसदेत या पक्षाचे खासदार इतके कमी झाले  की कट्टर समर्थकांनाही घोर निराशा यावी.

- असे असूनही भाजप मात्र सतत काँग्रेसबद्दल काळजी करताना दिसतो. मधल्या काळात काँग्रेसला पक्ष संघटना मजबूत करता आली नाही. त्यामुळे पक्ष आणखीन खोल संकटात गेला. दुसरीकडे भाजप सतत प्रयोग करत राहून नवीन नेते तयार तयार करत गेला. काँग्रेसला भाजपची नक्कलही करता आली नाही. ८२ वर्षांच्या मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष करणे किंवा इच्छा नसताना दिग्विजय सिंह यांना ७७ व्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणे हे पक्षाच्या कमजोरीचे दाखलेच! अंतर्गत कलह आणि शिस्तीचा अभाव हे शाप काँग्रेसच्या नशिबी आहेतच. असे असूनही  राजकीय निरीक्षकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते आहे की, आपला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबद्दल भाजपला चिंता किंवा भीती वाटते आहे. 

भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर यायचे आहे. ‘इंडिया आघाडी’ मैदानात असूनही भाजपचे काम तसे सोपे आहे, असे बहुतेक निवडणूक विश्लेषकांना वाटते. आश्वासन दिल्याप्रमाणे राम मंदिराची निर्मिती झाली, कलम ३७० हटवले गेले, यातून हिंदू मतांची एकजूट झाली. चार महिन्यांपूर्वीच भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोदींच्या गॅरंटीची मधुर फळे चाखली आहेत. पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसतो आहे. ‘जी २०’च्या यशानंतर परराष्ट्र नीती वैश्विक शक्तीना मंत्रमुग्ध करीत आहे. चलनवाढीचा मुद्दा मध्यमवर्ग मांडताना दिसत नाही. योगी आणि यादव, विष्णू साई आणि शिंदे आपापल्या राज्यात चांगले काम करत आहेत. नितीश यांना मोहित करून ‘एनडीए’त पुन्हा आणले गेले आहे. मोठी व्यापारी घराणी भाजपच्या बरोबर आहेत. तर मग प्रश्न कुठे राहतो?

गेल्या पाच वर्षांतील प्रभावशाली सुशासनामुळे मोदींचे पारडे जड आहे; तरीही भाजप नेते जाता-येता काँग्रेसला कोसत आहेत. हल्ले करत आहेत. काँग्रेसला मुस्लिम समर्थक म्हणत हा पक्ष भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो असे सातत्याने देशाला सांगितले जाते आहे. काँग्रेस सत्तेत नाही आणि पैसा कमावण्यासाठीही सक्षम नाही हे भाजपला उत्तम प्रकारे माहीत होते. तरीही भाजपने काँग्रेसला तोडून त्या पक्षातल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत येण्यासाठी राज्या-राज्यात आपल्या लोकांना कामाला लावले. ही बेचैनी कसली, कशामुळे आहे? जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या टोलेजंग नेत्यांनी मरणपंथाला लागलेल्या एका पक्षावर आपली ताकद खर्च करण्यापेक्षा विकसित भारताविषयी बोलले पाहिजे, नाही का?

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस