शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

भाजपला काँग्रेसची इतकी भीती वाटण्याचे कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 06:32 IST

काँग्रेस सत्तेत नाही, पक्षाकडे पैसा नाही; तरीही भाजपने काँग्रेसमधल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत घेण्यासाठी धडपड चालवली आहे. ही बेचैनी कसली?

अभिलाष खांडेकर, रोविंग एडिटर, लोकमत समूह

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आपल्या इतिहासात आज आहे इतकी कमजोर, दिशाहीन, निर्धन, नेतृत्वहीन कधीही नव्हती. दिल्लीत काँग्रेस दहा वर्षांपासून सत्तेच्या बाहेर आहे. तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा किंवा उत्तर प्रदेशसारख्या राज्यांत काँग्रेस अस्तित्वासाठी झगडते आहे. १९४७ पासून सातत्याने देशावर राज्य करणारा हा पक्ष आता अनेक राज्यांत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावरचा पक्ष झाला आहे. भ्रष्टाचार, अंतर्गत कलह, नेहरू-गांधी परिवारावर टोकाचे अवलंबित्व, नव्या गोष्टींना नकार ही पक्षाच्या पतनाची प्रमुख कारणे. भविष्य चिंताजनक आहे. कारण या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची  खरीद-फ़रोख़्त  कधी नव्हती एवढी वाढली आहे. त्याचे श्रेय आक्रमक भाजपच्या रणनीतीचे! 

दहा वर्षांपूर्वी दिल्लीची सत्ता मिळाल्यानंतर लगेच सत्तारूढ पक्षाने भारत काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प सोडला. काँग्रेसने ही गोष्ट हसण्यावारी नेली; परंतु भाजप गांभीर्याने काम करत राहिला. २०१८ मध्ये छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये विजय मिळाल्यामुळे काँग्रेसला थोडा दिलासा मिळाला हे खरे; पण २०२३ मध्ये तिथेही पक्षाला पराभव पाहावा लागला. कर्नाटकात आणि अगदी अलीकडे तेलंगणात पक्षाला यश मिळाले. संसदेत या पक्षाचे खासदार इतके कमी झाले  की कट्टर समर्थकांनाही घोर निराशा यावी.

- असे असूनही भाजप मात्र सतत काँग्रेसबद्दल काळजी करताना दिसतो. मधल्या काळात काँग्रेसला पक्ष संघटना मजबूत करता आली नाही. त्यामुळे पक्ष आणखीन खोल संकटात गेला. दुसरीकडे भाजप सतत प्रयोग करत राहून नवीन नेते तयार तयार करत गेला. काँग्रेसला भाजपची नक्कलही करता आली नाही. ८२ वर्षांच्या मल्लिकार्जुन खरगे यांना अध्यक्ष करणे किंवा इच्छा नसताना दिग्विजय सिंह यांना ७७ व्या वर्षी लोकसभेच्या निवडणुकीत उतरवणे हे पक्षाच्या कमजोरीचे दाखलेच! अंतर्गत कलह आणि शिस्तीचा अभाव हे शाप काँग्रेसच्या नशिबी आहेतच. असे असूनही  राजकीय निरीक्षकांना या गोष्टीचे आश्चर्य वाटते आहे की, आपला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसबद्दल भाजपला चिंता किंवा भीती वाटते आहे. 

भाजपला तिसऱ्यांदा सत्तेवर यायचे आहे. ‘इंडिया आघाडी’ मैदानात असूनही भाजपचे काम तसे सोपे आहे, असे बहुतेक निवडणूक विश्लेषकांना वाटते. आश्वासन दिल्याप्रमाणे राम मंदिराची निर्मिती झाली, कलम ३७० हटवले गेले, यातून हिंदू मतांची एकजूट झाली. चार महिन्यांपूर्वीच भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मोदींच्या गॅरंटीची मधुर फळे चाखली आहेत. पायाभूत सुविधांचा विकास होताना दिसतो आहे. ‘जी २०’च्या यशानंतर परराष्ट्र नीती वैश्विक शक्तीना मंत्रमुग्ध करीत आहे. चलनवाढीचा मुद्दा मध्यमवर्ग मांडताना दिसत नाही. योगी आणि यादव, विष्णू साई आणि शिंदे आपापल्या राज्यात चांगले काम करत आहेत. नितीश यांना मोहित करून ‘एनडीए’त पुन्हा आणले गेले आहे. मोठी व्यापारी घराणी भाजपच्या बरोबर आहेत. तर मग प्रश्न कुठे राहतो?

गेल्या पाच वर्षांतील प्रभावशाली सुशासनामुळे मोदींचे पारडे जड आहे; तरीही भाजप नेते जाता-येता काँग्रेसला कोसत आहेत. हल्ले करत आहेत. काँग्रेसला मुस्लिम समर्थक म्हणत हा पक्ष भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देतो असे सातत्याने देशाला सांगितले जाते आहे. काँग्रेस सत्तेत नाही आणि पैसा कमावण्यासाठीही सक्षम नाही हे भाजपला उत्तम प्रकारे माहीत होते. तरीही भाजपने काँग्रेसला तोडून त्या पक्षातल्या बेकार आणि कलंकित नेत्यांना आपल्या तंबूत येण्यासाठी राज्या-राज्यात आपल्या लोकांना कामाला लावले. ही बेचैनी कसली, कशामुळे आहे? जगातील सर्वांत मोठ्या पक्षाच्या टोलेजंग नेत्यांनी मरणपंथाला लागलेल्या एका पक्षावर आपली ताकद खर्च करण्यापेक्षा विकसित भारताविषयी बोलले पाहिजे, नाही का?

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस