शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही सोबत नसतो तर काँग्रेसनं इतक्या जागा जिंकल्या असत्या का?; संजय राऊतांचा प्रश्न
2
"नाना पटोलेंनी कठीण काळात काँग्रेसला राज्यात उभं केलं हे कुणीही विसरू शकणार नाही"
3
"थोडं थांबा, मोदींच्या शपथविधीनंतर ..."; राजीनाम्याच्या तयारीतील फडणवीसांना अमित शाह यांनी काय सांगितलं?
4
"महाराष्ट्र काँग्रेस विचाराचं राज्य; लोकसभेची लढाई जिंकली आता लक्ष्य विधानसभा"
5
विधानसभा मनसे स्वबळावर लढणार?; राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर नेते म्हणाले...
6
हुथी बंडखोरांची मुजोरी! सागरी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्रसंघाच्या ९ कर्मचाऱ्यांना बनवले बंदी
7
मोठी बातमी: महाराष्ट्रात हादरा, दिल्लीत बैठक; शिंदे-फडणवीस-अजितदादांमध्ये खलबतं सुरू
8
शरद पवारांच्या पक्षातील ३ आमदार आमच्यासोबत येणार; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा
9
शेअर बाजार घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या राहुल गांधींनी 'त्या' दिवशी बक्कळ कमाई केली; पाहा...
10
मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल
11
ईव्हीएम जिवंत आहे का? म्हणणाऱ्या मोदींना काँग्रेसचे प्रत्युत्तर; म्हणाले, "पुरावे घेऊन तुमच्याकडे..."
12
अजित पवारांनंतर प्रफुल्ल पटेल यांना मोठा दिलासा; ईडीने परत केली १८० कोटींची संपत्ती
13
शेअर मार्केटने मोडला 3 जूनचा रेकॉर्ड; सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाढ, Sensex 76000 पार...
14
जितते कम है, हारते जादा...! पाकिस्तानच्या पराभवानंतर बिचाऱ्या या तरुणीची व्यथा ऐका, Video 
15
लोकसभेतल्या विजयानंतर शिंदेंच्या मतदारसंघावर राणेंचा दावा; उदय सामंत म्हणाले, "फडणवीसांकडे..."
16
याला म्हणतात 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! 4 वर्षांत ₹1 लाखाचे झाले ₹47 लाख; दिला 4500% चा बंपर परतावा
17
NDA च्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी घेतले लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद
18
NDA नं राष्ट्रपतींकडे केला सरकार बनवण्यासाठी दावा; तिसऱ्यांदा PM बनणार नरेंद्र मोदी
19
नरेंद्र मोदींचा शपथविधी ९ जूनलाच का?; माजी पंतप्रधानांसोबत आहे कनेक्शन
20
...आणि तू विराट कोहलीशी स्पर्धा करतोस! IShowSpeed ने पाकिस्तानी संघाची पार लाज काढली

निवडणुकीपूर्वीची आचारसंहिता म्हणजे काय, त्याचे नियम कोणते? समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2024 11:59 AM

लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच संपूर्ण देशात एकाच वेळी आचारसंहिता लागू होते. या अंतर्गत राजकीय पक्षांव्यतिरिक्त इतर लोकांवर अनेक निर्बंध आहेत.

देशात लोकसभा निवडणूका जाहीर होणार आहेत. आज केंद्रीय निवडणूक आयोग दुपारी ३ वाजता निवडणुकीची घोषणा करणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम केले आहेत,याचे  पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे लागते. याशिवाय आचारसंहितेत अनेक निर्बंधांचा समावेश आहे, त्याचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करू शकते. उमेदवार अपात्रही होऊ शकतो.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केंद्रानेही मोठ्या प्रकल्पांना दिली मंजूरी; मध्यरात्री घेतले निर्णय

निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू होते. विधानसभा निवडणुका झाल्या तर ते संपूर्ण राज्याला लागू होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होते. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत ही आचारसंहिता लागू राहते. या काळात अनेक अधिकार निवडणूक आयोगाच्या हातात जातात.

आचारसंहितेचे नियम काय असतात?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारी पैसा कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा व्यक्तीच्या फायद्यासाठी वापरता येत नाही. याशिवाय निवडणूक प्रचारात सरकारी वाहने, बंगले, विमान किंवा सरकारी सुविधांचा वापर करता येत नाही. आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही सरकारी घोषणा, पायाभरणी किंवा उद्घाटन होत नाही. याशिवाय कोणतीही रॅली किंवा जाहीर सभा घेण्यासाठी पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणूक रॅलींमध्ये पैसा, धर्म, जात यांच्या नावावर मते मागणे पूर्णपणे निषिद्ध आहे. निवडणुकीशी कोणत्याही प्रकारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. त्यासाठी गरज भासल्यास निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

आचारसंहितेच्या काळात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमात सरकारी खर्चाच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास मनाई आहे. याशिवाय राजकारणी मंदिरे, मशिदी किंवा इतर प्रार्थनास्थळांचा निवडणूक प्रचारासाठी वापर करु नये.

बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक 

आचारसंहितेच्या नियमांनुसार मतदानाच्या ४८ तास आधी निवडणूक प्रचार थांबतो. याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या जमिनीवर, इमारतीच्या किंवा जागेच्या भिंतींवर ध्वज किंवा बॅनर लावण्यासाठी मालकाची परवानगी घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या दिवशी मतदारांना दिलेल्या स्लिप्स साध्या कागदावर असल्याची खात्री राजकीय पक्षांना करावी लागते. त्यावर उमेदवाराचे कोणतेही चिन्ह किंवा नाव लिहिलेले नसावे. मतदारांशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीने बूथमध्ये प्रवेश करू नये. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगElectionनिवडणूक